शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

Goa: खराब रस्त्याचे पर्यटनावर परिणाम- कळंगुट पंचायतीने व्यक्त केली चिंता

By काशिराम म्हांबरे | Updated: September 30, 2023 13:06 IST

Goa: कमी होत असलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे इथल्या पर्यटन व्यवसायावर  भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा कळंगुट पंचायतीने दिला आहे.

- काशीराम म्हांबरे म्हापसा - कळंगुट पंचायत क्षेत्रातील खराब रस्त्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. रस्ते खराब असल्याने पर्यटक कळंगुटकडेपाठ फिरवली आहे. कमी होत असलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे इथल्या पर्यटन व्यवसायावर  भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा कळंगुट पंचायतीने दिला आहे.

कळंगुट पंचायत मंडळाने सरपंच जोझफ सिक्वेरा यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिशदेत हा इशारा दिला आहे. यावेळी उपसरपंचा गीता परब तसेच इतर पंच सदस्य उपस्थित होते.

सुमारे तीन महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी नागरिकांच्या समस्यांवर तोडग्यासाठी म्हापसा शहरात जनता दरबार भरवला होता. त्यात खराब रस्त्यांचा मुद्या पंचायतीकडून उपस्थित करण्यात आलेला. मंत्र्यांनी खात्याच्या अभियंत्यांना तातडीने उपाय योजना हाती घेण्याचे आदेश दिलेले पण तीन महिन्यानंतर आजही त्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे सिक्वेरांनी निदर्शनाला आणून दिले.

रस्ते पंचायत क्षेत्रातील असले तरी ते सार्वजनिक बांधकाम खात्या अंतर्गत येत असल्याने त्यांची दुरुस्ती सरकारकडून केली जाते. खात्याच्या तसेच त्यातील अभियंत्यांच्या या निष्क्रियतेवर नागरिक लोक प्रतिनिधींना जबाबदार धरतात. उत्तर जाप लोकप्रतिनिधींना द्यावा लागतो . पंचायतीकडून दुरुस्ती हाती घेतल्यास मंडळा विरोधात तक्रारी दाखल केल्या जातात. अशावेळी सरकारकडून त्यात हस्तक्षेप करून दुरुस्ती हाती घेण्यात यावी अशी सुचना सिक्वेरा यांनी केली. 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन