शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

गोव्यातही सॅन्ड माफिया, कामुर्ली पंचायतीचे आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 16:45 IST

प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बार्देस तालुक्यातील कामुर्ली पंचायत क्षेत्रात सॅन्ड माफियांकडून बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप या पंचायतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

ठळक मुद्दे-  प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बार्देस तालुक्यातील कामुर्ली पंचायत क्षेत्रात सॅन्ड माफियांकडून बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप या पंचायतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. प्रशासनातील विविध खात्यांच्या नजरेला हा प्रकार आणून सुद्धा त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे.वेळीच आवर न घातल्यास केरळ, तामिळनाडूसारखी परिस्थिती उद्भवण्यास वेळ लागणार नसल्याचे मत पंचायतीकडून व्यक्त करण्यात आले आहे. 

म्हापसा -  प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बार्देस तालुक्यातील कामुर्ली पंचायत क्षेत्रात सॅन्ड माफियांकडून बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप या पंचायतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. प्रशासनातील विविध खात्यांच्या नजरेला हा प्रकार आणून सुद्धा त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यावर वेळीच आवर न घातल्यास केरळ, तामिळनाडूसारखी परिस्थिती उद्भवण्यास वेळ लागणार नसल्याचे मत पंचायतीकडून व्यक्त करण्यात आले आहे. 

सात पंचसदस्य असलेल्या या पंचायतीचे सरपंच विशांत गावकर, उपसरपंच दिव्या परब, पंचसदस्य तुषार नाईक, शरद गाड, दशरथ हळर्णकर तसेच अभय पेडणेकर उपस्थित होते. या प्रश्नावर स्थानिक आमदार नीळकंठ हळर्णकर हे गप्प असून प्रश्नावर तोडग्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्याचा तसेच गरज पडल्यास हरित लवादात सुद्धा जाण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती सरपंच विशांत गावकर यांनी दिली. 

ज्या भागात रेती उत्खनन सुरू आहे तो भाग अतिसंवेदनशील भाग आहे. ज्या प्रमाणावर सध्या उत्खनन सुरू आहे ते पाहता तेथील जलसंपदेवर परिणाम होणार असल्याचा इशाराही यावेळी दिला. भागातील नदीला लागून असलेला बांध सुद्धा कमकुवत झाला असून त्यातील शेती व्यवसायावर सुद्धा परिणाम होण्याची भीती गावकर यांनी व्यक्त केली. मच्छीमारी सुद्धा बंद करण्याची पाळी आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

15 वर्षांपूर्वी कुचेली भागात फक्त दोन व्यावसायिक होते. आजच्या घडीला अगणित असे व्यावसायिक तयार झाले आहेत. दिवसाला किमान दीडशे ट्रक रेती वाहतूक या भागातून केली जात असल्याची माहिती दिली. ज्यावेळी सरकारी अधिकारी तपासणीसाठी किंवा छापा मारण्यासाठी येतात त्यावेळी त्यांना आगाऊ कल्पना दिली जात असल्याने तेथील व्यवसाय बंद ठेवली जातो. हा प्रकार फक्त प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच होऊ शकते असेही ते म्हणाले. 

उत्खननाचे विपरीत परिणाम गावावर व्हायला लागले आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असून शांतता भंग होण्याच्या मार्गावर असल्याचे गाड म्हणाले. होत असलेल्या वाहतुकीमुळे गावातून वाहने चालवणे सुद्धा कठीण झाले आहे. मुलांच्या अभ्यासावर, जेष्ठांवर सुद्धा परिणाम व्हायला लागल्याची माहिती यावेळी दिली. 

या मुद्यावर नदीच्या दुसऱ्या बाजूला पेडणे तालुक्यात असलेल्या पार्से पंचायतीने विशेष ग्रामसभा घेवून सदर प्रकाराला विरोध केला होता. कामुर्ली पंचायतीने सुद्धा ग्रामसभेतून विरोध दर्शवून कसलाच फायदा झाला नसल्याची माहिती सरपंच विशांत गावकर यांनी दिली. काही लोक मात्र पंचायतीवर दोषारोप करु लागले असून अशा प्रकारावर नियंत्रण ठेवणे पंचायतीच्या आवाक्या बाहेरील असल्याची माहिती पत्रकारांना दिली. 

टॅग्स :goaगोवा