शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

गोव्यात आर्थिक आणीबाणीच : काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 20:28 IST

राज्यावर 2012 सालापर्यंत फक्त सात हजार कोटींचे कर्ज होते.

पणजी : राज्यावर 2012 सालापर्यंत फक्त सात हजार कोटींचे कर्ज होते. आता एकूण 22 हजार कोटींचे कर्ज आहे. यापुढील तीन वर्षात ते पंचवीस हजार कोटींपर्यंत जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारने गोव्यावर आर्थिक आणीबाणी लादली आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.गोव्यात अत्यंत वाईट आर्थिक स्थिती निर्माण झाली असल्याचे आम्ही गेल्या ऑक्टोबर महिन्यात दाखवून दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्री निलेश काब्राल यांना पुढे केले व काब्राल यांच्यामार्फत आमच्यावर टीका केली. आमचे दावे खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला पण गेल्या 24 डिसेंबर रोजी अर्थ खात्याने परिपत्रक जारी केले आणि सर्व खात्यांना वीस टक्क्यांनी खर्च कमी करण्याचा आदेश दिला आहे. यावरून राज्यातील आर्थिक आणीबाणीच स्पष्ट होत आहे, असे चोडणकर म्हणाले. वास्तविक पावसाच्या मोसमात रस्ते व अन्य विकास कामे करता येत नाहीत. त्यांचा वेग मंदावतो.खर्चाची सगळी कामे ही डिसेंबरपासून सुरू होत असतात पण सरकारने खर्च करून नका असा आदेश आता जारी केला आहे. कारण सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. ही चिंताजनक स्थिती असल्याने मुख्यमंत्र्यांनी यावर स्वत: भाष्य करावे. त्यांनी श्वेतपत्रिका जारी करावी, असे चोडणकर म्हणाले. गोव्यावरील कर्जाचे प्रमाण 22 हजार कोटींवर पोहचल्याचे आरबीआयने दाखवून दिले आहे. सरकार प्रचंड कर्ज घेत असून प्रथमच महिन्याभरात 681 कोटींचे कर्ज सरकारने घेतले. यापुढे जानेवारी व फेब्रुवारीत मिळून सरकार आणखी सातशे कोटींचे कर्ज काढील. राज्य वित्त आयोगालाही सामोरे जाण्यास सरकार घाबरत आहे, अशी टीका चोडणकर यांनी केली व सध्याच्या आर्थिक आणीबाणीला स्व. मनोहर र्पीकर व प्रमोद सावंत हे दोघेही जबाबदार असल्याचे ते म्हणाले.