शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा कार्यकाळ मध्यावर; मंत्र्यांच्या कामाचा आढावा हवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2024 11:13 IST

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दिले मंत्रिमंडळ बदलाचे संकेत, आता चतुर्थीनंतरच राज्यात होणार मोठ्या घडामोडी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बदलाचे पुन्हा एकदा संकेत दिले आहेत. सरकारचा कार्यकाळ मध्यावर आला की मंत्र्यांच्या कामाचा आढावा घ्यायलाच हवा व कोणताही सत्ताधारी पक्ष अशा प्रकारचा आढावा घेतच असतो, असे सावंत म्हणाले.

प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक मंत्र्याची प्रशासनातील कामगिरी, त्याचा कामाचा वेग, खात्यांतर्गत कामगिरी, लोकांनी मंत्र्यांबद्दल नोंदवलेली मते आदी गोष्टी विचारात घेऊन पक्षाशी सल्लामसलत करूनच मंत्रिमंडळ फेररचना केली जाते. सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ मध्यावर आला की मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणे आवश्यक आहे. कारण, अडीच वर्षांनंतर निवडणुकीला सामोरे जायचे असते, असे सावंत म्हणाले.

सरकारमधील काही मंत्री वादग्रस्त बनले आहेत. या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, २०१२ पूर्वी आधीच्या . सरकारमध्ये मंत्री कसे होते हे जनतेने अनुभवले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात लूट चालली होती. कला अकादमी, स्मार्ट सिटी, राज्यभरात रस्त्यांची झालेली दुरवस्था, डॉगरफोड प्रकरणांबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने कामे हाती घेतली नसती तर हे प्रश्नच उद्भवले नसते. पणजी शहर स्मार्ट सिटी व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून निधी आणून कामे करण्यास सुरुवात केली. रस्ते खोदावे लागल्यामुळे लोकांना त्रास झाला, हे मान्य आहे; परंतु दरवर्षी पावसात शहर बुडत होते, तसे यंदा झाले नाही. दर्जेदार वीज मिळावी, यासाठी भूमिगत वीजवाहिन्या घालाव्याच लागणार त्यासाठी खोदकाम केल्यावर काही प्रमाणात त्रास होणारच, हे लक्षात घेतले पाहिजे. पूर्वीच्या सरकारने कामेच केली नाहीत म्हणून कोणाला त्रास झाले नाहीत. आता आम्ही कामे करत आहोत. त्यामुळे सर्वकाही मार्गी लागेपर्यंत लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

आरोग्य पर्यटनास सरकार प्रोत्साहन देत आहे. वेलनेस टुरिझमखाली १४ ते १५ हॉटेलांची नोंदणी झालेली आहे. गोव्यात स्वस्तात वैद्यकीय उपचारांची सोय झाल्यास विदेशातूनही पर्यटक येथे येऊ लागतील. मुख्यमंत्री एका प्रश्नावर म्हणाले की, मरीना प्रकल्प गरजेचा आहे. यामुळे येथे रोजगाराच्या संधी निर्माण होतीलच शिवाय आखातात जहाजांवर नोकरीसाठी येथील अनुभव उपयोगी ठरेल. ते पुढे म्हणाले की, सीएम हेल्पलाइनचा लोक उपयोग करू लागले आहेत. आतापर्यंत २९० तक्रारी निकालात काढलेल्या आहेत.

...म्हणून मी बोलतो 

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काही मंत्र्यांची कामगिरी खराब झाली व मुख्यमंत्र्यांना अनेकदा हस्तक्षेप करावा लागला. त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, मी कोणतीही फाइल माझ्याकडे आली की पूर्णपणे अभ्यास करून विषय समजून घेतो. त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर उत्तर देणे मला सुलभ होते.

आम्ही कामे करतोय... 

सुरळीत वीज पुरवठा व्हावा, भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ते खोदले जात आहे. या कामांमुळे लोकांची गैरसोय होत आहे. मात्र पूर्वीच्या सरकारने कामेच केली नाहीत त्यामुळे कोणाला यापूर्वी त्रास सहन करावा लागला नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

निधीचा योग्य वापर करा

वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने तसेच वेळेवर व्हायला हवा. पंचायती, पालिका आदी स्थानिक स्वराज संस्थांनी निधी विनावापर ठेवू नये, यासाठी पावले उचलली आहेत. हा निधी बँकेत कायम ठेव म्हणून ठेवण्यासाठी नव्हे, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत