शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

'सौर, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सरकारचे अपयश उघड, मुख्यमंत्र्यांनी न बोललेलेच बरे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 12:15 IST

सरकारकडे कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी पैसे असतील तर ते इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी का देऊ शकत नाहीत? असा सवाल विचारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: मागील निराशाजनक आकडेवारी पाहिल्यास २०५० पर्यंत १५ हजार नोकऱ्यांसह शंभर टक्के सौर व अक्षय ऊर्जेचे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी न बोललेलेच बरे. अपयशी भाजप सरकार दिवास्वप्ने पाहत असताना गोमंतकीयांना वारंवार वीज कपात आणि प्रस्तावित वीज दरवाढीचा सामना करावा लागत आहे, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लगावला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०५० पर्यंत गोवा राज्य सौर व हरित ऊर्जा हब म्हणून पुढे येईल. या केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेत्यांनी अक्षय आणि हरित ऊर्जा निर्मितीबाबत भाजप सरकारची खराब कामगिरी उघडकीस आणली आहे.

माझ्या विधानसभेच्या तारांकित प्रश्नांच्या उत्तरातील तथ्ये आणि आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, गोव्याने ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत केवळ ३३.३४४ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठले आहे. भारत देशासमोर असलेले १७५ मेगावॅट सौर व अक्षय ऊर्जेचे राष्ट्रीय एकत्रित लक्ष्य साध्य करण्यासाठी ३५८ मेगावॅटचे लक्ष्य गाठणे गोव्यावर बंधनकारक होते. आता परत एकदा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढील २ वर्षांत ५०० नोकऱ्यांच्या निर्मितीसह १५० मेगावॅटचे नवे उद्दिष्ट ठेवले आहे, जे पूर्णपणे अवास्तव आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

भाजप सरकारने विध्वंसक तमनार प्रकल्प सुलभ करण्यासाठीच सौर आणि अक्षय ऊर्जा निर्मितीवर वेळकाढू धोरण ठेवले आहे. जर सरकारने तमनार प्रकल्पाला लागणाऱ्या एकंदर निधीपैकी फक्त अर्धा निधी गोव्यात अक्षय ऊर्जा निर्मितीवर गुंतवला तर सौर व अक्षय ऊर्जेतून संपूर्ण गोव्यातील विजेची गरज पूर्ण करता येईल, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

सबसिडी का देऊ शकत नाहीत? 

सरकारकडे कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी पैसे असतील तर ते इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी का देऊ शकत नाहीत? असा सवाल युरी आलेमाव यांनी विचारला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत