शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

गोवा सरकारचे आणखी १५0 कोटी रुपयांचे कर्जरोखे,आर्थिक कसरती चालूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 19:42 IST

गोवा सरकारने आर्थिक कसरती करताना आणखी १५0 कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत.

पणजी : गोवा सरकारने आर्थिक कसरती करताना आणखी १५0 कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत. दहा वर्षांच्या मुदतीच्या या रोख्यांसाठी येत्या १३ रोजी बोली स्वीकारल्या जातील. रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात लिलांव होईल. यशस्वी बोलिधारकाने १४ मार्च रोजी रोख्यांची रक्कम भरावी लागेल. वित्त खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारला एकूण घरेलू उत्पन्नाच्या ३ टक्क्यांपर्यंत कर्ज काढता येते. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षासाठी सुमारे २१00 कोटी रुपये कर्जाची मर्यादा घालून दिली होती आणि या मर्यादेच्या चौकटीत राहूनच हे कर्ज काढलेले आहे, असा दावा त्याने केला. आर्थिक वर्ष संपत आले आहे. आतापर्यंत केवळ १३५0 कोटी रुपये कर्ज घेतलेले आहे. चालू आर्थिक वर्षातील हे अखेरच्या टप्प्यातील कर्ज आहे. रोख्यांचे सर्व व्यवहार भारतीय रिझर्व्ह बॅन्केतर्फेच केले जातात. या अधिकाऱ्याचा असाही दावा होता की, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कर्ज घेणे स्वाभाविक आहे. कर्ज घेतले नाही तर विकास होणार नाही आणि विकास झाला नाही तर एकूण घरेलू उत्पन्नही वाढणार नाही.दरम्यान, सरकारच्या डोक्यावर आतापर्यंत तब्बल १३ हजार कोटी रुपये कर्ज झाल्याचे नुकतेच विधानसभेत मांडण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले होते. राज्य सरकारने आतापर्यंत केंद्र सरकारकडून तसेच खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलले आहे.