शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

Goa : मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत अनेक मंत्री सैरभैर, सरकारी परिपत्रकाने वाढवला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:08 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दैनंदिन कामांमध्ये सक्रिय नाहीत, ते सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकत नाहीत, अधूनमधून त्यांना इस्पितळातही जाऊन यावे लागते या सर्व स्थितीत सध्या त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सैरभैर झालेले आहेत.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दैनंदिन कामांमध्ये सक्रिय नाहीत, ते सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकत नाहीत, अधूनमधून त्यांना इस्पितळातही जाऊन यावे लागते या सर्व स्थितीत सध्या त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सैरभैर झालेले आहेत. तशात वीजमंत्री निलेश काब्राल यांच्यामार्फतच यापुढे सर्व सरकारी फाईल्स, कागदपत्रे वगैरे जायला हवीत, असे परिपत्रक सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने जारी करून गोंधळ वाढविला. काही मंत्र्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवला आणि परिपत्रक मागे घेण्यास मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांना भाग पाडले आहे.

राज्यातील काही तालुक्यांत पिण्याचे पाणी बंद झालेले आहे, राज्यात मासळीच्या आयात बंदीवरून वाद पेटला आहे, खनिज खाणी बंद असल्याने राजकीय नेत्यांच्या घरांवर व कार्यालयांवर शेकडो खाण अवलंबित मोर्चे नेऊ लागले आहेत. पण या स्थितीत प्रशासनाची सगळी सूत्रे हाती घेऊन समस्यांवर कायमस्वरुपी उपाय काढणारा कोणीच नेता मंत्रालयात किंवा सचिवालयात नाही, असा अनुभव गोव्याला येत आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत जर खाणी सुरू झाल्या नाहीत, तर मगोप सरकारमधून बाहेर पडेल असा इशारा मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी देऊन दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

आपली कामे वेगाने होत नाहीत, नोकरशाही हवे तेवढे सहकार्य करत नाही असा सूर काही मंत्र्यांनी लावला आहे. सरकारमधील महत्त्वाचे मंत्री विजय सरदेसाई यांनी तर नोकरशाही कार्यक्षम नाही असे जाहीरपणे दोनवेळा नमूद केले. स्थिती गोंधळाची असतानाच सरकारने काल-परवाच एक परिपत्रक जारी केले व सर्व सरकारी फाईल्स व कागदपत्रे व पत्रे यापुढे वीज मंत्री काब्राल यांच्याच कार्यालयामार्फतच जावीत असे स्पष्ट केले. म्हणजेच कोणत्याही सचिवाला, कोणत्याही महामंडळाला किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिका-याला जो नोट किंवा पत्र येईल ते वीज मंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठविले जावे असे बजाविले गेले.

यामुळे काही मंत्री संतप्त बनले. काब्राल हे पर्रीकर यांच्या गैरहजेरीत प्रभारी सीएम झालेले आहेत काय असा प्रश्न मंत्र्यांना पडला व त्यांनी मुख्य सचिव शर्मा यांच्याशी संपर्क साधला. परिपत्रक त्वरित मागे घ्या अशी मागणी मंत्र्यांनी केली. परिपत्रकात तांत्रिक चुका राहिल्या असून ते परिपत्रक मागे घेतले जाईल किंवा पूर्ण दुरुस्त केले जाईल,अशी ग्वाही मुख्य सचिवांनी दोघा मंत्र्यांना दिली. आता हे नवे परिपत्रक कधी येते याकडे सगळे मंत्री लक्ष ठेवून बसले आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर हे अजून काही दिवस सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकणार नाहीत. ते आपल्या घरीच विश्रंती घेत आहेत. अधूनमधून थोडे कामही ते करतात पण त्यांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा आहे. पूर्वीच्या तुलनेत आरोग्य आता सुधारले आहे, असे सांगितले जाते.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर