शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

Goa : मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत अनेक मंत्री सैरभैर, सरकारी परिपत्रकाने वाढवला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:08 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दैनंदिन कामांमध्ये सक्रिय नाहीत, ते सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकत नाहीत, अधूनमधून त्यांना इस्पितळातही जाऊन यावे लागते या सर्व स्थितीत सध्या त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सैरभैर झालेले आहेत.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दैनंदिन कामांमध्ये सक्रिय नाहीत, ते सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकत नाहीत, अधूनमधून त्यांना इस्पितळातही जाऊन यावे लागते या सर्व स्थितीत सध्या त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सैरभैर झालेले आहेत. तशात वीजमंत्री निलेश काब्राल यांच्यामार्फतच यापुढे सर्व सरकारी फाईल्स, कागदपत्रे वगैरे जायला हवीत, असे परिपत्रक सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने जारी करून गोंधळ वाढविला. काही मंत्र्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवला आणि परिपत्रक मागे घेण्यास मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांना भाग पाडले आहे.

राज्यातील काही तालुक्यांत पिण्याचे पाणी बंद झालेले आहे, राज्यात मासळीच्या आयात बंदीवरून वाद पेटला आहे, खनिज खाणी बंद असल्याने राजकीय नेत्यांच्या घरांवर व कार्यालयांवर शेकडो खाण अवलंबित मोर्चे नेऊ लागले आहेत. पण या स्थितीत प्रशासनाची सगळी सूत्रे हाती घेऊन समस्यांवर कायमस्वरुपी उपाय काढणारा कोणीच नेता मंत्रालयात किंवा सचिवालयात नाही, असा अनुभव गोव्याला येत आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत जर खाणी सुरू झाल्या नाहीत, तर मगोप सरकारमधून बाहेर पडेल असा इशारा मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी देऊन दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

आपली कामे वेगाने होत नाहीत, नोकरशाही हवे तेवढे सहकार्य करत नाही असा सूर काही मंत्र्यांनी लावला आहे. सरकारमधील महत्त्वाचे मंत्री विजय सरदेसाई यांनी तर नोकरशाही कार्यक्षम नाही असे जाहीरपणे दोनवेळा नमूद केले. स्थिती गोंधळाची असतानाच सरकारने काल-परवाच एक परिपत्रक जारी केले व सर्व सरकारी फाईल्स व कागदपत्रे व पत्रे यापुढे वीज मंत्री काब्राल यांच्याच कार्यालयामार्फतच जावीत असे स्पष्ट केले. म्हणजेच कोणत्याही सचिवाला, कोणत्याही महामंडळाला किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिका-याला जो नोट किंवा पत्र येईल ते वीज मंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठविले जावे असे बजाविले गेले.

यामुळे काही मंत्री संतप्त बनले. काब्राल हे पर्रीकर यांच्या गैरहजेरीत प्रभारी सीएम झालेले आहेत काय असा प्रश्न मंत्र्यांना पडला व त्यांनी मुख्य सचिव शर्मा यांच्याशी संपर्क साधला. परिपत्रक त्वरित मागे घ्या अशी मागणी मंत्र्यांनी केली. परिपत्रकात तांत्रिक चुका राहिल्या असून ते परिपत्रक मागे घेतले जाईल किंवा पूर्ण दुरुस्त केले जाईल,अशी ग्वाही मुख्य सचिवांनी दोघा मंत्र्यांना दिली. आता हे नवे परिपत्रक कधी येते याकडे सगळे मंत्री लक्ष ठेवून बसले आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर हे अजून काही दिवस सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकणार नाहीत. ते आपल्या घरीच विश्रंती घेत आहेत. अधूनमधून थोडे कामही ते करतात पण त्यांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा आहे. पूर्वीच्या तुलनेत आरोग्य आता सुधारले आहे, असे सांगितले जाते.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर