शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

गोवा : सरकार खनिज लिजांचा लिलाव करणार, आमदारांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 23:22 IST

राज्याच्या खाणग्रस्त भागांमधील आमदारांनी खनिज लिजांचा लिलाव पुकारू नये, असा आग्रह धरलेला असला तरी लिलाव कायद्यानुसार टाळता येत नाही याची कल्पना सरकारला आलेली आहे.

पणजी : राज्याच्या खाणग्रस्त भागांमधील आमदारांनी खनिज लिजांचा लिलाव पुकारू नये, असा आग्रह धरलेला असला तरी लिलाव कायद्यानुसार टाळता येत नाही याची कल्पना सरकारला आलेली आहे. यामुळे गोवा सरकारने आमदारांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष करून लिजांचा लिलावच पुकारावा असे तत्त्वत: ठरविले असल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली. भाजपाचे आमदार लिजांच्या लिलावासाठी जास्त विरोध करत नाहीत. फक्त कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी एकटय़ानेच लिलावाविरुद्ध टोकाची भूमिका घेतली आहे.

लिलाव पुकारण्याचा पर्याय जर सरकारने स्वीकारला तर पुढील पाच वर्षे गोव्यात खनिज खाणी सुरूच होऊ शकणार नाहीत असे काब्राल यांनी भाजपच्या व काँग्रेसच्याही दोघा आमदारांच्या उपस्थितीत गेल्या बुधवारी मुख्यमंत्री र्पीकर याना सांगितले तेव्हा मुख्यमंत्री संतप्त बनले. आपण इंजिनियर असून आपल्याला खाण विषय जास्त ब-यापैकी कळतो असे काब्राल यांनी पर्रीकर यांना सांगून हातातील काही कागदपत्रे दाखवली व लिलावाचा पर्याय स्वीकारणे हे गोव्यासाठी घातक ठरेल असा मुद्दा मांडला. यावेळी एक ज्येष्ठ सरकारी वकीलही उपस्थित होते. मुख्यमंत्री भडकले व त्यांनी आपण तुम्हाला आव्हान देतो व येत्या डिसेंबर्पयत लिलावाद्वारे खाणी सुरू करून दाखवतो असे काब्राल याना सांगितले. खाणपट्टय़ातील आमदार प्रमोद सावंत, प्रविण झाटय़े, काँग्रेसचे नेते प्रतापसिंग राणे, मगोपचे दीपक पाऊसकर आदी यावेळी उपस्थित होते.

सरकार लिजांचा लिलाव पुकारणार आहे हे स्पष्ट झाल्याचे काही आमदारांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे आमदार लिलाव नको असे म्हणतात. लिलाव पुकारला तर बाहेरच्या कंपन्या येतील असाही दावा केला जातो पण सेझा-वेदांता ही काही गोव्यातील कंपनी नव्हे या वस्तूस्थितीकडे काही आमदार दुर्लक्ष करतात. मुख्यमंत्री पर्रीकर व अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांच्यात यापूर्वी चर्चा झाली असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा व केंद्रीय खनिज विकास व नियमन कायद्यानुसार लिजांचा लिलाव पुकारणो योग्य ठरेल असे दोघांचे मत बनले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मी स्वत: खनिज लिजांच्या लिलावाला पाठींबा देत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही लिलाव पुकारावा असेच म्हटले आहे. राज्यात सरकारकडे सध्या जो 30 लाख टन माल आहे, त्याचा ई-लिलाव सरकार करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे सांगितले आहे. त्यामुळे गोव्याची खनिज वाहतूक ही सुरूच राहील. ती बंद होणार नाही. सरकार लिजांचा लिलाव करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करील. - दीपक प्रभू पाऊसकर, आमदार, सावर्डे मतदारसंघ

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर