शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गोवा : किनारी भागात गोमंतकीयांच्या घरांचे रुपांतर काश्मिरींच्या व्यवसाय केंद्रांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 12:32 IST

उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये काश्मिरी व्यापा-यांची संख्या खूपच वाढत चालली आहे.

पणजी : उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये काश्मिरी व्यापा-यांची संख्या खूपच वाढत चालली आहे. 10 वर्षापूर्वी 10 ते 12 हजार काश्मिरी पूर्ण किनारपट्टीत व्यवसाय करताना आढळून यायचे. आता हे प्रमाण 40 हजारांच्या पुढे गेले आहे. गोमंतकीयांनी आपली घरे काश्मिरींना व्यवसाय करण्यासाठी भाडेपट्टीवर देणे सुरू केले आहे.

काश्मिरींनी प्रथम उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत आपले बस्तान मांडले. त्यानंतर दक्षिण गोव्यात काश्मिरी व्यवसायिकांची संख्या वाढू लागली. प्रस्तुत प्रतिनिधीने कोणकोण तालुक्यासह दक्षिण गोव्यातील अन्य काही किना-यांना भेट दिली असता हजारो काश्मिरी व्यवसायिक विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री करताना दिसून आले. बहुतांश काश्मिरी उत्तर गोव्यातही कपडे विक्रीचे काम करतात. दक्षिण गोव्याच्या राजबाग, पाळोळे, आगोंद या किना-यांवर बहुतांश काश्मिरी कपड्यांसह आकर्षक शोभेच्या वस्तू, विविध प्रकारच्या चहा यांची विक्री करतात.

गोमंतकीयांनी आपल्या घरचा पुढील भाग काश्मिरी व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी दिला असून घराच्या मागील भागात ही गोमंतकीय कुटुंबे राहतात. काही भागांत तर गोमंतकीयांनी किना-यांवरील आपली जुनी घरे सोडली व मडगाव आणि अन्य भागांमध्ये फ्लॅट घेऊन राहणो पसंत केले आहे. अशा गोमंतकीयांकडून किना-यांवरील पूर्ण घरे काश्मिरींना भाडेपट्टीवर दिली गेली आहेत.

विदेशी पर्यटकांसाठी अनेक काश्मिरी योगाचे वर्ग चालवतात. विदेशींना काही भागात योगाच्या नावाखाली काहीही शिकविले जाते अशा प्रकारच्या देखील तक्रारी येतात. स्थानिकांपेक्षा विदेशी पर्यटकच काश्मिरी उत्पादने व कपडे जास्त खरेदी करताना दिसून आले. दक्षिण गोव्याच्या किना-यांवर बहुतांश रशियन पर्यटकांची सध्या गर्दी आहे. राजबाग, पाळोळे व आंगोद या तीन किना-यांवर देशी पर्यटक संख्येने खूपच कमी आहेत. विदेशी पर्यटक हजारोंच्या संख्येने आढळून आले. काही काश्मिरी व्यक्ती रेस्टॉरंट्स चालवत आहेत तर काहींनी किना-यांवर लाकडी कॉटेजीस उभे करून तिथे विदेशी पर्यटकांची सोय केली आहे. 

उत्तरेत कळंगुट, कांदोळी, बागा, हरमल, अंजुणा, सिकेरी या किना-यांवर किमान पंचवीस हजार काश्मिरी व्यवसाय करत आहेत. स्थानिक विरुद्ध काश्मिरी व्यवसायिक असे तंटे जास्त प्रमाणात अजून तरी गोव्यात घडत नाहीत. मात्र पूर्ण किनारपट्टी काश्मिरी व्यवसायिकांच्या ताब्यात कधी गेली ते गोमंतकीयांना कळले देखील नाही.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन