शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गोवा : किनारी भागात गोमंतकीयांच्या घरांचे रुपांतर काश्मिरींच्या व्यवसाय केंद्रांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 12:32 IST

उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये काश्मिरी व्यापा-यांची संख्या खूपच वाढत चालली आहे.

पणजी : उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये काश्मिरी व्यापा-यांची संख्या खूपच वाढत चालली आहे. 10 वर्षापूर्वी 10 ते 12 हजार काश्मिरी पूर्ण किनारपट्टीत व्यवसाय करताना आढळून यायचे. आता हे प्रमाण 40 हजारांच्या पुढे गेले आहे. गोमंतकीयांनी आपली घरे काश्मिरींना व्यवसाय करण्यासाठी भाडेपट्टीवर देणे सुरू केले आहे.

काश्मिरींनी प्रथम उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत आपले बस्तान मांडले. त्यानंतर दक्षिण गोव्यात काश्मिरी व्यवसायिकांची संख्या वाढू लागली. प्रस्तुत प्रतिनिधीने कोणकोण तालुक्यासह दक्षिण गोव्यातील अन्य काही किना-यांना भेट दिली असता हजारो काश्मिरी व्यवसायिक विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री करताना दिसून आले. बहुतांश काश्मिरी उत्तर गोव्यातही कपडे विक्रीचे काम करतात. दक्षिण गोव्याच्या राजबाग, पाळोळे, आगोंद या किना-यांवर बहुतांश काश्मिरी कपड्यांसह आकर्षक शोभेच्या वस्तू, विविध प्रकारच्या चहा यांची विक्री करतात.

गोमंतकीयांनी आपल्या घरचा पुढील भाग काश्मिरी व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी दिला असून घराच्या मागील भागात ही गोमंतकीय कुटुंबे राहतात. काही भागांत तर गोमंतकीयांनी किना-यांवरील आपली जुनी घरे सोडली व मडगाव आणि अन्य भागांमध्ये फ्लॅट घेऊन राहणो पसंत केले आहे. अशा गोमंतकीयांकडून किना-यांवरील पूर्ण घरे काश्मिरींना भाडेपट्टीवर दिली गेली आहेत.

विदेशी पर्यटकांसाठी अनेक काश्मिरी योगाचे वर्ग चालवतात. विदेशींना काही भागात योगाच्या नावाखाली काहीही शिकविले जाते अशा प्रकारच्या देखील तक्रारी येतात. स्थानिकांपेक्षा विदेशी पर्यटकच काश्मिरी उत्पादने व कपडे जास्त खरेदी करताना दिसून आले. दक्षिण गोव्याच्या किना-यांवर बहुतांश रशियन पर्यटकांची सध्या गर्दी आहे. राजबाग, पाळोळे व आंगोद या तीन किना-यांवर देशी पर्यटक संख्येने खूपच कमी आहेत. विदेशी पर्यटक हजारोंच्या संख्येने आढळून आले. काही काश्मिरी व्यक्ती रेस्टॉरंट्स चालवत आहेत तर काहींनी किना-यांवर लाकडी कॉटेजीस उभे करून तिथे विदेशी पर्यटकांची सोय केली आहे. 

उत्तरेत कळंगुट, कांदोळी, बागा, हरमल, अंजुणा, सिकेरी या किना-यांवर किमान पंचवीस हजार काश्मिरी व्यवसाय करत आहेत. स्थानिक विरुद्ध काश्मिरी व्यवसायिक असे तंटे जास्त प्रमाणात अजून तरी गोव्यात घडत नाहीत. मात्र पूर्ण किनारपट्टी काश्मिरी व्यवसायिकांच्या ताब्यात कधी गेली ते गोमंतकीयांना कळले देखील नाही.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन