शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

Goa: गोव्यातील 'एकमेव संजीवनी सहकारी साखर कामगारांना सरकारचा दिलासा, इथेनॉल प्रकल्पात सामावून घेणार

By किशोर कुबल | Updated: August 9, 2023 23:32 IST

Goa: कारखान्यातील कोणाही कामगाराला सेवेतून कमी केलेले नाही किंवा कमी केलेही जाणार नाही. या कामगारांना तेथे येणार असलेल्या इथेनॉल प्रकल्पात सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

- किशोर कुबल पणजी  - गोव्यातील सहकार क्षेत्रात असलेल्या एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्याला 'मरणकळा' लागल्या असताना कारखान्यातील कोणाही कामगाराला सेवेतून कमी केलेले नाही किंवा कमी केलेही जाणार नाही. या कामगारांना तेथे येणार असलेल्या इथेनॉल प्रकल्पात सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

रात्री उशिरा विधानसभेत कृषी, नागरी पुरवठा तसेच स्वतःकडे असलेल्या अन्य खात्यांच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना नाईक  बोलत होते.ते म्हणाले की, 'जी कंपनी इथेनॉल प्रकल्प थाटणार आहे, त्या कंपनीला या कामगारांना सेवेत घ्यावे लागेल. कामगारांवर अन्याय होणार नाही.' मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की,'प्रकल्पासाठी दोन वेळा निविदा काढल्या परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढल्या जातील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षात अन्य राज्यांमध्ये कुठेही मिळाला नाही एवढा भाव ऊसाला आम्ही दिला. प्रति तर ३ हजार रुपये दिले. शेतकऱ्यांची चिंता तसरकारला आहे.' मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ,खाजन  जमिनींच्या बाबतीत ३६४ कोटी रुपये खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केलेला असून केंद्राच्या मंजुरीची आम्ही वाट पाहत आहोत. खाजन बांधांसंबंधी असलेले सर्व प्रश्न ही मंजुरी मिळाल्यानंतर मिटतील.'

विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांना वेळेवर सबसिडी मिळत नाही, ऊस उत्पादनांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका केली. नागरी पुरवठा खात्याच्या अनुदान मागण्यांवर बोलताना विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी रेशनवरील तांदळाला लागलेल्या किडीचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की स्वस्त धान्य दुकानांमधून सरकारने चांगल्या दर्जाचा तांदूळ पुरवावा. स्वस्त धान्य दुकानांची वेळच्यावेळी तपासणी करावी तसेच तेथे कीटकनाशके फवारणी वगैरे गोष्टी हाती घ्याव्यात. सहा महिन्यात सर्व ११ गोदामे तीही ३.५ कोटी रुपयांमध्ये दुरुस्त करण्याचे जी भाषा सरकार करत आहेत ती दिशाभूल करणारी आहे. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी तांदूळ गहू तस्करीचे मोठे प्रकरण उघड झाले. परंतु नागरिक पुरवठा खात्याने काहीच कारवाई केलेली नाही.'

सरदेसाई यांनी स्वस्त धान्य दुकानातील तांदळाची  तीन वेगवेगळी पाकिटे सभागृहासमोर ठेवली. एक पाकीट मुख्यमंत्र्यांनी, एक नागरी पुरवठा खात्याच्या मंत्र्यांनी आणि एक नागरी पुरवठा संचालकांनी न्यावे आणि तांदूळ शिजवून बघावा. तो किती निकृष्ट दर्जाचा आहे, हे दिसून येईल असे सरदेसाई म्हणाले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेgoaगोवा