शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Goa: गोव्यातील 'एकमेव संजीवनी सहकारी साखर कामगारांना सरकारचा दिलासा, इथेनॉल प्रकल्पात सामावून घेणार

By किशोर कुबल | Updated: August 9, 2023 23:32 IST

Goa: कारखान्यातील कोणाही कामगाराला सेवेतून कमी केलेले नाही किंवा कमी केलेही जाणार नाही. या कामगारांना तेथे येणार असलेल्या इथेनॉल प्रकल्पात सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

- किशोर कुबल पणजी  - गोव्यातील सहकार क्षेत्रात असलेल्या एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्याला 'मरणकळा' लागल्या असताना कारखान्यातील कोणाही कामगाराला सेवेतून कमी केलेले नाही किंवा कमी केलेही जाणार नाही. या कामगारांना तेथे येणार असलेल्या इथेनॉल प्रकल्पात सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

रात्री उशिरा विधानसभेत कृषी, नागरी पुरवठा तसेच स्वतःकडे असलेल्या अन्य खात्यांच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना नाईक  बोलत होते.ते म्हणाले की, 'जी कंपनी इथेनॉल प्रकल्प थाटणार आहे, त्या कंपनीला या कामगारांना सेवेत घ्यावे लागेल. कामगारांवर अन्याय होणार नाही.' मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की,'प्रकल्पासाठी दोन वेळा निविदा काढल्या परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढल्या जातील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षात अन्य राज्यांमध्ये कुठेही मिळाला नाही एवढा भाव ऊसाला आम्ही दिला. प्रति तर ३ हजार रुपये दिले. शेतकऱ्यांची चिंता तसरकारला आहे.' मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ,खाजन  जमिनींच्या बाबतीत ३६४ कोटी रुपये खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केलेला असून केंद्राच्या मंजुरीची आम्ही वाट पाहत आहोत. खाजन बांधांसंबंधी असलेले सर्व प्रश्न ही मंजुरी मिळाल्यानंतर मिटतील.'

विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांना वेळेवर सबसिडी मिळत नाही, ऊस उत्पादनांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका केली. नागरी पुरवठा खात्याच्या अनुदान मागण्यांवर बोलताना विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी रेशनवरील तांदळाला लागलेल्या किडीचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की स्वस्त धान्य दुकानांमधून सरकारने चांगल्या दर्जाचा तांदूळ पुरवावा. स्वस्त धान्य दुकानांची वेळच्यावेळी तपासणी करावी तसेच तेथे कीटकनाशके फवारणी वगैरे गोष्टी हाती घ्याव्यात. सहा महिन्यात सर्व ११ गोदामे तीही ३.५ कोटी रुपयांमध्ये दुरुस्त करण्याचे जी भाषा सरकार करत आहेत ती दिशाभूल करणारी आहे. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी तांदूळ गहू तस्करीचे मोठे प्रकरण उघड झाले. परंतु नागरिक पुरवठा खात्याने काहीच कारवाई केलेली नाही.'

सरदेसाई यांनी स्वस्त धान्य दुकानातील तांदळाची  तीन वेगवेगळी पाकिटे सभागृहासमोर ठेवली. एक पाकीट मुख्यमंत्र्यांनी, एक नागरी पुरवठा खात्याच्या मंत्र्यांनी आणि एक नागरी पुरवठा संचालकांनी न्यावे आणि तांदूळ शिजवून बघावा. तो किती निकृष्ट दर्जाचा आहे, हे दिसून येईल असे सरदेसाई म्हणाले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेgoaगोवा