शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

Goa: राखीव व्याघ्रक्षेत्र आदेशास गोवा सरकारचे सुप्रिम कोर्टात आव्हान

By किशोर कुबल | Updated: September 13, 2023 14:14 IST

Goa: म्हादई अभयारण्य तीन महिन्यांच्या आत राखीव व्याघ्रक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशास राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

- किशोर कुबल पणजी : म्हादई अभयारण्य तीन महिन्यांच्या आत राखीव व्याघ्रक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशास राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

गोव्याची बाजू मांडण्यासाठी सरकारने वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांची नियुक्ती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गेल्या २४ जुलै रोजी म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्याचे आदेश दिले होते. वाघांच्या सुरक्षेसाठी आराखडा तयार करावा. तो निश्चित कालमर्यादेत केंद्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाला मंजुरीसाठी पाठवून द्यावा. प्राधिकरणानेही लवकरात लवकर त्याला मान्यता द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.

दरम्यान, केंद्रीय व्याघ्र प्रकल्प प्राधिकरणाने ३१ मार्च २०१६ रोजी राज्य सरकारला पत्र लिहून व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यास सांगितले परंतु तसा कोणताही अधिकृत ठराव हे पत्र पाठवण्यापूर्वी प्राधिकरणाने घेतलेला नाही हा मुद्दा युक्तिवादासाठी मांडला जाण्याची शक्यता आहे.अभयारण्याची अंतिम अधिसूचना काढण्याआधी व्याघ्र प्रकल्प अधिसूचित करणे बेकायदा ठरेल. वन्य जीव संरक्षण कायद्याच्या कलम २६ (अ) नुसार अभयारण्याची अंतिम अधिसूचना काढणे आवश्यक आहे. अभयारण्यात निवास करणाय्रांचे वन हक्क दावे निकालात काढलेले नाहीत. हे कामही बाकी आहे. वन्य जीव संरक्षण कायद्याचे कलम ३८ (व्ही) गोव्यासाठी अनिवार्य नाही, आदी युक्तिवाद केले जातील.

 विश्वजित, दिव्या राणे यांचा विरोधवाळपईचे आमदार तथा वनमंत्री विश्वजित राणे तसेच त्यांची पत्नी पर्येंच्या आमदार दिव्या राणे यांनी राखीव व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्यास तीव्र विरोध केला आहे. हायकोर्टाचा आदेश आला त्याचवेळी सरकार या आदेशाला सुप्रिम कोर्टात आव्हान देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. राखीव व्याघ्रक्षेत्र झाल्यास अनेक निर्बंध येतील. पर्यें व वाळपई मतदारसंघातील लोकांना त्याचा फटका बसेल. अभयारण्यातील लोकांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात पुनर्वसन करणे शक्य होणार नाही. लोकांवर अन्याय होईल, त्यामुळे राखीव व्याघ्रक्षेत्र नकोच अशी भूमिका या दोघांनी घेतली आहे.

गोवा फाऊंडेशन या संघटनेने  उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर राज्य सरकारने पुढील तीन महिन्यांत म्हादई अभयारण्य क्षेत्र आणि आजूबाजूचा परिसर व्याघ्र क्षेत्र म्हणून अधिसू‌चित करावा, असा आदेश दिला होता. हा आदेश देताना हायकोर्टाने असे नमूद केले होते की,‘गेल्या ७६ वर्षात वाघांची संख्या देशात ९२ टक्क्यांनी घटली. वन नसल्यास वाघ मृत्यू पावतात आणि वाघ नसल्यास वने नष्ट होतात. वाघ वनांचे रक्षण करतात. व्याघ्र क्षेत्र अधिसूचित होणे गरजेचे आहे.’

टॅग्स :goaगोवाTigerवाघ