शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

गोवा फाउंडेशनने आरोप फेटाळले!

By admin | Updated: December 9, 2015 02:08 IST

पणजी : गोवा फाउंडेशन संस्था यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळेच न्यायालयीन निवाड्यानंतर सरकारला १५ दशलक्ष टन

पणजी : गोवा फाउंडेशन संस्था यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळेच न्यायालयीन निवाड्यानंतर सरकारला १५ दशलक्ष टन खनिज माल जप्त करावा लागला. तसेच त्यापैकी ५ दशलक्ष टन खनिज मालाचा सरकारने लिलाव केला व आतापर्यंत ७५० कोटींचा महसूल मिळाला. अशा प्रकारचे कार्य करणारी गोवा फाउंडेशन संस्था ही राज्याच्या अर्थव्यवस्थेची शत्रू आणि अराष्ट्रीय कशी काय ठरते, अशी विचारणा संस्थेने केली आहे. सर्वोच्च न्यायालयात संस्थेने मंगळवारी आपले जोडप्रतिज्ञापत्र सादर केले. खाण खात्याने यापूर्वी प्रतिज्ञापत्रातून केलेले सर्व आरोप त्या जोडप्रतिज्ञापत्रातून फेटाळण्यात आले आहेत. गोवा फाउंडेशन संस्था ही तिसऱ्या मांडवी पुलाविरुद्ध, तेरेखोलच्या पुलाविरुद्ध तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्पाविरुद्धही न्यायालयात व हरित लवादाकडे गेली असल्याचे खाण खात्याने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. राज्याचा विकास ही संस्था अडवते, असे खात्याने नमूद करून संस्थेच्या हेतूबाबत शंका व प्रश्न उपस्थित केले होते. त्या अनुषंगाने गोवा फाउंडेशनने जोडप्रतिज्ञापत्र सादर करून आपण सगळे आरोप फेटाळत असल्याचे म्हटले आहे. आपण तिसऱ्या मांडवी पुलाविरुद्ध तसेच कचरा प्रक्रियेसह अन्य काही प्रकल्पांविरुद्ध हरित लवादाकडे दाद मागण्यासाठी का गेलो आहोत, हेही गोवा फाउंडेशनने जोडप्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. कचरा प्रकल्पाचे कंत्राट हे भाजपच्या लाभार्थी कंत्राटदारास देण्यात आले असल्याचेही फाउंडेशनने नमूद केले आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर आलेल्या निवाड्यामुळे खनिजाचा जो लिलाव झाला त्यातून ७५० कोटी शासकीय तिजोरीत आले. शिवाय कायमस्वरूपी निधीत ५० कोटी रुपये जमा झाले. अजून १० दशलक्ष टन खनिज मालाचा लिलाव व्हायचा आहे. कायमस्वरूपी निधीत जमा होणारा पैसा हा आगामी पिढ्यांच्या हितासाठी वापरता येईल. प्रबळ असे खाणमालक व राजकारणी यांच्या चुका सुधारण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेतो. आम्ही अर्र्थव्यवस्थेचे शत्रू व अराष्ट्रीय कसे ठरतो ते न्यायालयानेच पाहावे, असे फाउंडेशनने म्हटले आहे. दरम्यान, बुधवारी ९ रोजी सर्वोच्च न्यायालयात गोव्याच्या खाणप्रश्नी अंतिम सुनावणी होणे अपेक्षित होते; पण न्यायालयाच्या बुधवारच्या कामकाज पत्रिकेवर हा विषय आलेला नाही. त्यामुळे गोव्याच्या खाणप्रश्नी बुधवारी सुनावणी होऊ शकणार नाही. पुढील तारीख अजून निश्चित झालेली नाही. खाणप्रकरणी अन्य एक याचिकादार असलेले सुदीप ताम्हणकर यांनीही मंगळवारी न्यायालयास जोडप्रतिज्ञापत्र सादर केले. (खास प्रतिनिधी)