शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

गोवा : खनिज लीज नूतनीकरणप्रश्नी माजी मुख्यमंत्र्यांची कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 12:33 IST

केंद्र सरकारने खाण व खनिज नियमन आणि विकास कायदा (एमएमडीआर) दुरुस्त करणारा वटहुकूम जानेवारी 2015 मध्ये जारी केला व त्याच काळात गोवा सरकारने 88 खनिज लीजचे अत्यंत घाईघाईत नूतनीकरण केले.

पणजी : केंद्र सरकारने खाण व खनिज नियमन आणि विकास कायदा (एमएमडीआर) दुरुस्त करणारा वटहुकूम जानेवारी 2015 मध्ये जारी केला व त्याच काळात गोवा सरकारने 88 खनिज लीजचे अत्यंत घाईघाईत नूतनीकरण केले. या प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याविरुद्ध गोवा फाउंडेशन या पर्यावरणवादी संस्थेने प्रथमच लोकायुक्तांकडे तक्रार सादर केली आहे. लोकायुक्तांनी या तक्रारीच्या अनुषंगाने लीज नूतनीकरणप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. पार्सेकर यांची या एकूण प्रकरणी कसोटी लागणार असे दिसू लागले आहे.

पार्सेकर यांच्यापूर्वी मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री होते व त्यांच्याकडे खाण खाते होते. लीज नूतनीकरण करता यावे म्हणून पर्रीकर यांनी एक धोरणही तयार केले होते. लीज नूतनीकरणाच्या कामाची नांदी पर्रीकर यांनी सुरू केली होती. त्यानंतर पार्सेकर मुख्यमंत्री झाले व त्यांच्याकडेही खाण खाते होते. पार्सेकर यांच्या काळात खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांनी 75 पेक्षा जास्त लीजचे नूतनीकरण केले. काही लीजचे नूतनीकरण पर्रीकर सरकारच्या काळात झाले होते. मात्र गोवा फाउंडेशन संस्थेचे प्रमुख डॉ. क्लॉड अल्वारीस यांनी लोकायुक्तांकडे तक्रार सादर करताना पर्रीकर यांच्याविरुद्ध तक्रार केली नाही. त्यांनी पार्सेकर, माजी खाण सचिव पवनकुमार सेन आणि संचालक आचार्य यांच्याविरुद्ध तक्रार दिली. यामुळे पार्सेकर यांच्या भुवयाही आश्चर्याने उंचावल्या गेल्या आहेत.

पर्रीकर यांच्याविरोधात अल्वारीस यांनी तक्रार सादर न करणो तसेच माजी अॅडव्हकेट जरनल आत्माराम नाडकर्णी यांनी लिजांचा लिलाव करावा असा सल्ला आपण सरकारला दिला होता अशी विधाने आता करणे हा सगळा विषय पार्सेकर यांच्या समर्थकांमध्ये चर्चेचा बनला आहे. पर्रीकर हे इस्पितळात उपचार घेत असल्याने त्यांच्याविरोधात तूर्त तक्रार सादर केलेली नाही, असे अल्वारीस यांनी म्हटले आहे. मात्र पार्सेकर यांना अल्वारीस यांचे हे म्हणणे पटलेले दिसत नाही. 

केंद्र सरकारने एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करणारा वटहुकूम 12 जानेवारी 2015 रोजी जारी केला. देशभरातील कोळसा, खनिज वगैरे लिजांचे लिलाव पुकारणे त्या वटहुकूमाद्वारे बंधनकारक केले गेले पण त्याच दिवशी म्हणजे 12 जानेवारी रोजीच गोवा सरकारच्या खाण खात्याने एकूण 31 लिजांच्या नूतनीकरणावर सह्या केल्या व लिलाव टाळला. अल्वारीस यांनी भ्रष्टाचाराचा गुन्हा संबंधितांविरुद्ध नोंद केला जावा अशी मागणी केली आहे. खासगी खाण कंपन्यांना सरकारने मोठा फायदा करून दिला व गोवा सरकारच्या तिजोरीला 1 लाख 44 हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचे अल्वारीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आम्ही खाण अवलंबितांच्या तथा खाणपट्टय़ातील लोकांच्या हितासाठी लिजांचे नूतनीकरण करून दिल्याचे पार्सेकर यांनी म्हटले असून आपण कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे.

टॅग्स :goaगोवा