शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Goa Election 2022: ठरलं! लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्षच लढणार; अनेक पक्ष संपर्कात असल्याचाही दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 09:33 IST

Goa Election 2022: भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांना संपर्क केला, परंतु त्यांनी अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे संपर्क केला, परंतु त्यांनी अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रतिनिधीशी बोलताना पार्सेकर यांनी यास दुजोरा दिला. ते म्हणाले की, कार्यकर्त्यांकडे चर्चा केल्यानंतर मी सध्या तरी अपक्ष म्हणूनच पुढे जायचा निर्णय घेतला आहे. एका पक्षाचा शेला उतरवून ठेवल्यानंतर अन्य पक्षांनी माझ्याशी संपर्क केला; परंतु मला अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरायचे आहे. माझ्या मागे जनमत आहे की नाही किंवा मी किती पाण्यात आहे, हे मलाही पाहायचे आहे. कारण २०१७ मध्ये माझा पराभव झाला, तेव्हा काही स्वकीय माझे जनमत गेले असे म्हणू लागले, परंतु वस्तुस्थिती तशी नाही.

‘मांद्रे मतदारसंघात ३३५ मतांपासून मी पक्ष मोठा गेला, परंतु गेल्या पाच वर्षांत जे काही मी पाहिले ते अनपेक्षित होते. मंडल, बूथ समित्यांवर जुन्या, तसेच मूळ कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. कार्यकर्त्यांच्या मनात खदखद होती. काल मी पक्ष सोडल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आपापले राजीनामे अध्यक्षांकडे पाठवून दिले. मला पक्षाने गृहीत धरले. तिकीट नाही दिले तरी मी कुठेही जाणार नाही, असे पक्ष नेत्यांना वाटले होते. परंतु, त्यांचा अंदाज चुकला, असे पार्सेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, गेली ३० वर्षे हा पक्ष मी वाढविला आणि मोठ्या जड अंतःकरणाने मला पक्ष सोडावा लागला. पक्षाच्या भरवंशावर राहिलो. मला तिकीट मिळेल याची खात्री होती. परंतु, मला डावलण्यात आले आणि जे बेभरवंशाचे होते त्यांना पक्षाने उमेदवारी दिली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Politicsराजकारण