शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Goa Election 2022: राज्यातील अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रातून चालना देणार; नव्या पक्षाने मांडले गोव्याचे व्हिजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 10:09 IST

Goa Election 2022: राजकारणात घुसलेल्या जमीन माफियांकडून शेतकऱ्यांना संपविण्याचा डाव आहे, असे आरोप करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : रेवल्युशनरी गोवन्स पक्षाने कृषी व्हिजन जाहीर केले आहे. यात कृषी क्षेत्रातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे असे, पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यातील खाजन जमिनींचे रक्षण करण्यासाठी युवांना कृषी खात्यात आणायचे कधी प्रयत्न झाले नाहीत. राज्यातील शेती नष्ट करण्यात आली. याला सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. राजकारणात घुसलेल्या जमीन माफियांकडून शेतकऱ्यांना संपविण्याचा डाव आहे, असे आरोप परब यांनी केले.

गोव्याचे रक्षण करण्यासाठी कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. राज्यातील शेती लागवडीखाली आणली पाहिजे. २०३० पर्यंत राज्यातील शेती पूर्णपणे सेंद्रिय करण्याचा उद्देश आहे. यासाठी शेतीत युवांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती परब यांनी दिली. राज्यात प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जातील. शेतीला व्यावसायिक रूप दिले जाईल. उत्पादनाचे ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येईल. शेतीक्षेत्र हे उद्योग क्षेत्र म्हणून विकसित झाले पाहिजे. मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत जे युवा शेती करू इच्छितात त्यांना कर्ज दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

खाजन जमिनी पुन्हा लागवडीयोग्य करण्याचा उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक गावात कृषी सेवक असेल. यामुळे शेतकऱ्यांना मुख्य कार्यालयात ये-जा करून वेळ वाया घालवावा लागणार नाही. बांधला तडे पडून खारट पाणी शेतात घुसल्याने शेतीचे नुकसान होते. मुद्दामहून हे प्रकार केले जातात’ असे परब म्हणाले.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Politicsराजकारण