शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

व्याघ्रक्षेत्र निकषात गोवा बसत नाहीच! मुख्यमंत्री, वन्य प्राण्यांबाबत मात्र सरकार गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 13:30 IST

चरावणे धरणाच्या बाबतीत मात्र सरकार पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राखीव व्याघ्रक्षेत्र जाहीर करण्यासाठी गोवा निकषात बसत नाही व तसे सरकारने प्रतिज्ञापत्राव्दारे हायकोर्टाच्या नजरेस आणून ९ दिले आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. चरावणे धरणाच्या बाबतीत मात्र सरकार पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने राखीव व्याघ्रक्षेत्रासाठी जे निकष घालून दिलेले आहेत, त्यात गोवा बसत नाही राज्य सरकारने अर्ज केला. तरी मंजुरी मिळणार नाही. बुधवारी राज्य वन्य प्राणी मंडळाच्या बैठकीत म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्रक्षेत्र जाहीर करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील विधान केले. राष्ट्रीय वन्य प्राणी मंडळाला ही बाब कळवली जाणार आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राखीव व्याघ्र क्षेत्राच्या बाबतीत गोवा निकषात बसत नसला तरी जी सात अभयारण्ये राज्यात आहेत तिथे वाघ म्हणा किंवा अन्य वन्य प्राण्यांच्या बाबतीत आवश्यक ती काळजी सरकार घेत आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करीत आहे.

चरावणे धरण होणार

म्हादई अभयारण्यात प्रस्तावित चरावणे धरणाच्या बाबतीत मुख्यमंत्री म्हणाले. हे धरण झाल्यास थेट २५० कुटूंबांना याचा लाभ होणार आहे. तसेच या भागातील जनावरांनाही पाणी मिळेल. या धरणाची नितांत आवश्यकता आहे आणि सरकारला ते बांधायचे ठरवले आहे.

लोकांचाही तीव्र विरोध

२९ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उपमहानिरीक्षकांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात असे म्हटले होते की, २०२० साली म्हादई अभयारण्यात वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांच्या मृत्यूनंतर प्राधिकरणाने हे अभयारण्य हे राखीव व्याघ्रक्षेत्र जाहीर करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी. असे यावा, असे आवाहन केले होते. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींचा तसेच सत्तरी तालुक्यातील् लोकांचा याला विरोध आहे. अभयारण्यात घरे असल्याने निर्बंध येतील. उद्योग येऊ शकणार नाहीत, खाणी सुरु होऊ शकणार नाहीत, अशी भीती आहे.

वन्य प्राणी मंडळाला अधिकारच नाही : क्लॉड

म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्रक्षेत्र जाहीर करावे या मागणीसाठी गेलेले गोवा फाउंडेशनचे संस्थापक, ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी क्लॉड आल्वारिस यांना राज्य वन्य प्राणी मंडळाने म्हादई राखीव व्याघ्र क्षेत्राचा प्रस्ताव फेटाळल्याबद्दल विचारले असता त्यांनी याप्रश्नी राज्य वन्य प्राणी मंडळाला कोण मंडळाने काहीही निर्णय घेतला तरी फरक पडत नाही. कारण निर्णय घेण्याचा अधिकार मंडळाला नाही, असा दावा केला. क्लॉड म्हणाले की, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि गोवा सरकारने काय ते ठरवायचे आहे. राज्य वन्य प्राणी मंडळ निर्णय घेऊ शकत नाही.

 

टॅग्स :goaगोवाTigerवाघPramod Sawantप्रमोद सावंत