शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्रक्षेत्र निकषात गोवा बसत नाहीच! मुख्यमंत्री, वन्य प्राण्यांबाबत मात्र सरकार गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 13:30 IST

चरावणे धरणाच्या बाबतीत मात्र सरकार पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राखीव व्याघ्रक्षेत्र जाहीर करण्यासाठी गोवा निकषात बसत नाही व तसे सरकारने प्रतिज्ञापत्राव्दारे हायकोर्टाच्या नजरेस आणून ९ दिले आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. चरावणे धरणाच्या बाबतीत मात्र सरकार पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने राखीव व्याघ्रक्षेत्रासाठी जे निकष घालून दिलेले आहेत, त्यात गोवा बसत नाही राज्य सरकारने अर्ज केला. तरी मंजुरी मिळणार नाही. बुधवारी राज्य वन्य प्राणी मंडळाच्या बैठकीत म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्रक्षेत्र जाहीर करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील विधान केले. राष्ट्रीय वन्य प्राणी मंडळाला ही बाब कळवली जाणार आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राखीव व्याघ्र क्षेत्राच्या बाबतीत गोवा निकषात बसत नसला तरी जी सात अभयारण्ये राज्यात आहेत तिथे वाघ म्हणा किंवा अन्य वन्य प्राण्यांच्या बाबतीत आवश्यक ती काळजी सरकार घेत आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करीत आहे.

चरावणे धरण होणार

म्हादई अभयारण्यात प्रस्तावित चरावणे धरणाच्या बाबतीत मुख्यमंत्री म्हणाले. हे धरण झाल्यास थेट २५० कुटूंबांना याचा लाभ होणार आहे. तसेच या भागातील जनावरांनाही पाणी मिळेल. या धरणाची नितांत आवश्यकता आहे आणि सरकारला ते बांधायचे ठरवले आहे.

लोकांचाही तीव्र विरोध

२९ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उपमहानिरीक्षकांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात असे म्हटले होते की, २०२० साली म्हादई अभयारण्यात वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांच्या मृत्यूनंतर प्राधिकरणाने हे अभयारण्य हे राखीव व्याघ्रक्षेत्र जाहीर करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी. असे यावा, असे आवाहन केले होते. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींचा तसेच सत्तरी तालुक्यातील् लोकांचा याला विरोध आहे. अभयारण्यात घरे असल्याने निर्बंध येतील. उद्योग येऊ शकणार नाहीत, खाणी सुरु होऊ शकणार नाहीत, अशी भीती आहे.

वन्य प्राणी मंडळाला अधिकारच नाही : क्लॉड

म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्रक्षेत्र जाहीर करावे या मागणीसाठी गेलेले गोवा फाउंडेशनचे संस्थापक, ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी क्लॉड आल्वारिस यांना राज्य वन्य प्राणी मंडळाने म्हादई राखीव व्याघ्र क्षेत्राचा प्रस्ताव फेटाळल्याबद्दल विचारले असता त्यांनी याप्रश्नी राज्य वन्य प्राणी मंडळाला कोण मंडळाने काहीही निर्णय घेतला तरी फरक पडत नाही. कारण निर्णय घेण्याचा अधिकार मंडळाला नाही, असा दावा केला. क्लॉड म्हणाले की, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि गोवा सरकारने काय ते ठरवायचे आहे. राज्य वन्य प्राणी मंडळ निर्णय घेऊ शकत नाही.

 

टॅग्स :goaगोवाTigerवाघPramod Sawantप्रमोद सावंत