शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

गोवा : सां जुझे दि आरियालमध्ये बाहेरून येऊन तणाव निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 17:20 IST

ग्रामसभा ३ मार्च होजी होणार असल्याचे सांगण्यात आले. 

मडगाव : शिवजयंतीच्या पूर्वी आणि शिवजयंतीच्या दिवशी सां जुझे आरियल गावात घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करावी, गावाबाहेरून आलेल्या व तणाव निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली. सां जुझे आरियलच्या ग्रामस्थांनी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारल्याप्रश्नी काल, २५ फेब्रुवारी रोजी खास ग्रामसभा घ्यावी अशी मागणी केली होती. परंतु गट विकास अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे ग्रामसभा झाली नाही. आता ही ग्रामसभा ३ मार्च होजी होणार असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी गावाबाहेरील लोकांनी येऊन जो बेकायदा जमाव जमवला. मंत्र्यांच्या उपस्थितीत गावात तणाव निर्माण केला, त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी असे पंचायतीला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्रामसभा घेण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु त्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्र पाठवून खास ग्रामसभा घेण्याची परवानगी पंचायतीला देण्यात नकार दिल्याचे पंचायतीला कळविण्यात आले.

गावातील लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु गावाबाहेरून आलेल्यांवर गुन्हे का दाखल केलेले नाही, अशी विचारणा करत ग्रामस्थांनी पंचायतीला हे निवेदन दिले आहे. गुन्हे नोंद करताना बेकायदा जमाव जमवल्याचे कारण देण्यात आले आहे. मात्र गावातील लोक हे येथे होणाऱ्या बेकायदा कामाला विरोध करण्यासाठी एकत्र आले होते. गावा बाहेरून येऊन ज्या लोकांनी बेकायदेशीर कामे केली, त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्न ग्रामस्थानी उपस्थित केला आहे.

प्रशासनाने केवळ सां जुझे आरियल गावातील लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली. बाहेरील लोकांनी गावात येऊन तणावाचे वातावरण निर्माण केले. प्रशासनाने गावातील लोकांवर गुन्हे दाखल केले त्यामुळे पंचायतीने गावातील लोकांचे प्रश्न मांडावेत अशी मागणी पंच जॉयसी फर्नांडिस यांनी केली आहे.

टॅग्स :goaगोवा