शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

'उत्तर भारतीय पर्यटकांना गोव्यात हरियाणा करायचा आहे', पर्यटकांवरील टीकेमुळे गोवा पुन्हा वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 12:19 IST

गोवा पुन्हा वादात सापडले आहे पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपा पक्ष वादापासून जाणीवपूर्वक दूर राहिला आहे.

पणजी : पृथ्वीच्या तळातील मळ उत्तर भारतीय पर्यटकांच्या रुपात गोव्यात येतो अशा प्रकारची टीका पर्रीकर मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे मंत्री विजय सरदेसाई यांनी केल्यामुळे आणि पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनीही काही पर्यटकांना दोष देण्याची भूमिका घेतल्यामुळे गोवा राज्य पुन्हा एकदा देशभर नकारात्मक कारणांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे. गोवा पुन्हा वादात सापडले आहे पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपा पक्ष वादापासून जाणीवपूर्वक दूर राहिला आहे.

बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणो मंत्री सरदेसाई यांच्या भूमिका दिवसेंदिवस वादग्रस्त ठरत आहेत. अगोदर त्यांनी विधानसभेसमोर स्व. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारायला हवा अशी भूमिका घेतली. त्यास सत्ताधारी भाजपाने व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आक्षेप घेतला. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी तर सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ासह अन्य पुतळ्य़ांचेही विषय विधानसभेत येणारच नाहीत याची काळजी घेतली. त्यासाठी त्यांनी त्यांना सादर झालेले ठराव बाद ठरविले. मंत्री सरदेसाई यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. तथापि, भविष्यात कधी तरी नैसर्गिकपणे सिक्वेरा यांचा पुतळा उभा राहीलच अशी भूमिका सरदेसाई यांनी घेऊन प्राप्त राजकीय परिस्थितीत नमते घेणे पसंत केले आहे. 

उत्तर भारतीय पर्यटक गोव्यात घाण करतात, ते गोव्यात दुसरा हरियाणा तयार करू पाहत आहेत अशी टीका मंत्री सरदेसाई यांनी दोन दिवसांपूर्वीच करून जास्त पैसा खर्च करणारेच पर्यटक गोव्यात यायला हवेत असा मुद्दा मांडला होता. त्यावरून सरदेसाई यांच्या या भूमिकेवर देशभरातून टीका सुरू झाली. गोव्याच्या पर्यटन उद्योगानेही मंत्री सरदेसाई यांच्या या विधानाचे स्वागत केले नाही. आपण गोमंतकीयांचीच भावना व्यक्त केली आहे, कारण बसच्या खिडकीमधून एक पर्यटक रस्त्यावर लघवी करत असल्याचा व्हीडीओ आपण पाहिला होता, असे सरदेसाई म्हणाले. काही गोमंतकीयांनी मंत्री सरदेसाई यांच्या भूमिकेला सोशल मिडियावरून पाठींबा दिला. विरोधी काँग्रेस पक्षाने व आम आदमी पक्षाने सरदेसाई यांच्यावर टीका केली व ही विधाने भाटकारशाहीची लक्षणो असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर म्हणाले. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी संपर्क साधला व मंत्री सरदेसाई यांच्या विधानांविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली.

दरम्यान, मंत्री सरदेसाई यांनी आता थोडी वेगळी भूमिका मांडत हरियाणातही काही लोक चांगले आहेत असे नवे विधान केले आहे. आपण सर्व पर्यटकांना दोष देत नाही. फार थोडे पर्यटक गोव्यात नागरी शिस्त पाळत नाहीत, त्यांच्याविषयीच आपण बोललो होतो असे सरदेसाई म्हणाले. गोव्यात जे पर्यटक गोमंतकीयत्व सांभाळणार नाहीत, त्यांना आम्ही गोव्यातून माघारी पाठवू, असे विधान पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी केले. त्यावरही टीका सुरू आहे. गोव्यात येऊन काही पर्यटक अंमली पदार्थाचा व्यवसाय करतात असे  आजगावकर यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :goaगोवा