शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

'उत्तर भारतीय पर्यटकांना गोव्यात हरियाणा करायचा आहे', पर्यटकांवरील टीकेमुळे गोवा पुन्हा वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 12:19 IST

गोवा पुन्हा वादात सापडले आहे पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपा पक्ष वादापासून जाणीवपूर्वक दूर राहिला आहे.

पणजी : पृथ्वीच्या तळातील मळ उत्तर भारतीय पर्यटकांच्या रुपात गोव्यात येतो अशा प्रकारची टीका पर्रीकर मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे मंत्री विजय सरदेसाई यांनी केल्यामुळे आणि पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनीही काही पर्यटकांना दोष देण्याची भूमिका घेतल्यामुळे गोवा राज्य पुन्हा एकदा देशभर नकारात्मक कारणांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे. गोवा पुन्हा वादात सापडले आहे पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपा पक्ष वादापासून जाणीवपूर्वक दूर राहिला आहे.

बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणो मंत्री सरदेसाई यांच्या भूमिका दिवसेंदिवस वादग्रस्त ठरत आहेत. अगोदर त्यांनी विधानसभेसमोर स्व. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारायला हवा अशी भूमिका घेतली. त्यास सत्ताधारी भाजपाने व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आक्षेप घेतला. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी तर सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ासह अन्य पुतळ्य़ांचेही विषय विधानसभेत येणारच नाहीत याची काळजी घेतली. त्यासाठी त्यांनी त्यांना सादर झालेले ठराव बाद ठरविले. मंत्री सरदेसाई यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. तथापि, भविष्यात कधी तरी नैसर्गिकपणे सिक्वेरा यांचा पुतळा उभा राहीलच अशी भूमिका सरदेसाई यांनी घेऊन प्राप्त राजकीय परिस्थितीत नमते घेणे पसंत केले आहे. 

उत्तर भारतीय पर्यटक गोव्यात घाण करतात, ते गोव्यात दुसरा हरियाणा तयार करू पाहत आहेत अशी टीका मंत्री सरदेसाई यांनी दोन दिवसांपूर्वीच करून जास्त पैसा खर्च करणारेच पर्यटक गोव्यात यायला हवेत असा मुद्दा मांडला होता. त्यावरून सरदेसाई यांच्या या भूमिकेवर देशभरातून टीका सुरू झाली. गोव्याच्या पर्यटन उद्योगानेही मंत्री सरदेसाई यांच्या या विधानाचे स्वागत केले नाही. आपण गोमंतकीयांचीच भावना व्यक्त केली आहे, कारण बसच्या खिडकीमधून एक पर्यटक रस्त्यावर लघवी करत असल्याचा व्हीडीओ आपण पाहिला होता, असे सरदेसाई म्हणाले. काही गोमंतकीयांनी मंत्री सरदेसाई यांच्या भूमिकेला सोशल मिडियावरून पाठींबा दिला. विरोधी काँग्रेस पक्षाने व आम आदमी पक्षाने सरदेसाई यांच्यावर टीका केली व ही विधाने भाटकारशाहीची लक्षणो असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर म्हणाले. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी संपर्क साधला व मंत्री सरदेसाई यांच्या विधानांविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली.

दरम्यान, मंत्री सरदेसाई यांनी आता थोडी वेगळी भूमिका मांडत हरियाणातही काही लोक चांगले आहेत असे नवे विधान केले आहे. आपण सर्व पर्यटकांना दोष देत नाही. फार थोडे पर्यटक गोव्यात नागरी शिस्त पाळत नाहीत, त्यांच्याविषयीच आपण बोललो होतो असे सरदेसाई म्हणाले. गोव्यात जे पर्यटक गोमंतकीयत्व सांभाळणार नाहीत, त्यांना आम्ही गोव्यातून माघारी पाठवू, असे विधान पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी केले. त्यावरही टीका सुरू आहे. गोव्यात येऊन काही पर्यटक अंमली पदार्थाचा व्यवसाय करतात असे  आजगावकर यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :goaगोवा