शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

'उत्तर भारतीय पर्यटकांना गोव्यात हरियाणा करायचा आहे', पर्यटकांवरील टीकेमुळे गोवा पुन्हा वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 12:19 IST

गोवा पुन्हा वादात सापडले आहे पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपा पक्ष वादापासून जाणीवपूर्वक दूर राहिला आहे.

पणजी : पृथ्वीच्या तळातील मळ उत्तर भारतीय पर्यटकांच्या रुपात गोव्यात येतो अशा प्रकारची टीका पर्रीकर मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे मंत्री विजय सरदेसाई यांनी केल्यामुळे आणि पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनीही काही पर्यटकांना दोष देण्याची भूमिका घेतल्यामुळे गोवा राज्य पुन्हा एकदा देशभर नकारात्मक कारणांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे. गोवा पुन्हा वादात सापडले आहे पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपा पक्ष वादापासून जाणीवपूर्वक दूर राहिला आहे.

बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणो मंत्री सरदेसाई यांच्या भूमिका दिवसेंदिवस वादग्रस्त ठरत आहेत. अगोदर त्यांनी विधानसभेसमोर स्व. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारायला हवा अशी भूमिका घेतली. त्यास सत्ताधारी भाजपाने व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आक्षेप घेतला. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी तर सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ासह अन्य पुतळ्य़ांचेही विषय विधानसभेत येणारच नाहीत याची काळजी घेतली. त्यासाठी त्यांनी त्यांना सादर झालेले ठराव बाद ठरविले. मंत्री सरदेसाई यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. तथापि, भविष्यात कधी तरी नैसर्गिकपणे सिक्वेरा यांचा पुतळा उभा राहीलच अशी भूमिका सरदेसाई यांनी घेऊन प्राप्त राजकीय परिस्थितीत नमते घेणे पसंत केले आहे. 

उत्तर भारतीय पर्यटक गोव्यात घाण करतात, ते गोव्यात दुसरा हरियाणा तयार करू पाहत आहेत अशी टीका मंत्री सरदेसाई यांनी दोन दिवसांपूर्वीच करून जास्त पैसा खर्च करणारेच पर्यटक गोव्यात यायला हवेत असा मुद्दा मांडला होता. त्यावरून सरदेसाई यांच्या या भूमिकेवर देशभरातून टीका सुरू झाली. गोव्याच्या पर्यटन उद्योगानेही मंत्री सरदेसाई यांच्या या विधानाचे स्वागत केले नाही. आपण गोमंतकीयांचीच भावना व्यक्त केली आहे, कारण बसच्या खिडकीमधून एक पर्यटक रस्त्यावर लघवी करत असल्याचा व्हीडीओ आपण पाहिला होता, असे सरदेसाई म्हणाले. काही गोमंतकीयांनी मंत्री सरदेसाई यांच्या भूमिकेला सोशल मिडियावरून पाठींबा दिला. विरोधी काँग्रेस पक्षाने व आम आदमी पक्षाने सरदेसाई यांच्यावर टीका केली व ही विधाने भाटकारशाहीची लक्षणो असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर म्हणाले. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी संपर्क साधला व मंत्री सरदेसाई यांच्या विधानांविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली.

दरम्यान, मंत्री सरदेसाई यांनी आता थोडी वेगळी भूमिका मांडत हरियाणातही काही लोक चांगले आहेत असे नवे विधान केले आहे. आपण सर्व पर्यटकांना दोष देत नाही. फार थोडे पर्यटक गोव्यात नागरी शिस्त पाळत नाहीत, त्यांच्याविषयीच आपण बोललो होतो असे सरदेसाई म्हणाले. गोव्यात जे पर्यटक गोमंतकीयत्व सांभाळणार नाहीत, त्यांना आम्ही गोव्यातून माघारी पाठवू, असे विधान पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी केले. त्यावरही टीका सुरू आहे. गोव्यात येऊन काही पर्यटक अंमली पदार्थाचा व्यवसाय करतात असे  आजगावकर यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :goaगोवा