शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'उत्तर भारतीय पर्यटकांना गोव्यात हरियाणा करायचा आहे', पर्यटकांवरील टीकेमुळे गोवा पुन्हा वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 12:19 IST

गोवा पुन्हा वादात सापडले आहे पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपा पक्ष वादापासून जाणीवपूर्वक दूर राहिला आहे.

पणजी : पृथ्वीच्या तळातील मळ उत्तर भारतीय पर्यटकांच्या रुपात गोव्यात येतो अशा प्रकारची टीका पर्रीकर मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे मंत्री विजय सरदेसाई यांनी केल्यामुळे आणि पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनीही काही पर्यटकांना दोष देण्याची भूमिका घेतल्यामुळे गोवा राज्य पुन्हा एकदा देशभर नकारात्मक कारणांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे. गोवा पुन्हा वादात सापडले आहे पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपा पक्ष वादापासून जाणीवपूर्वक दूर राहिला आहे.

बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणो मंत्री सरदेसाई यांच्या भूमिका दिवसेंदिवस वादग्रस्त ठरत आहेत. अगोदर त्यांनी विधानसभेसमोर स्व. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारायला हवा अशी भूमिका घेतली. त्यास सत्ताधारी भाजपाने व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आक्षेप घेतला. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी तर सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ासह अन्य पुतळ्य़ांचेही विषय विधानसभेत येणारच नाहीत याची काळजी घेतली. त्यासाठी त्यांनी त्यांना सादर झालेले ठराव बाद ठरविले. मंत्री सरदेसाई यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. तथापि, भविष्यात कधी तरी नैसर्गिकपणे सिक्वेरा यांचा पुतळा उभा राहीलच अशी भूमिका सरदेसाई यांनी घेऊन प्राप्त राजकीय परिस्थितीत नमते घेणे पसंत केले आहे. 

उत्तर भारतीय पर्यटक गोव्यात घाण करतात, ते गोव्यात दुसरा हरियाणा तयार करू पाहत आहेत अशी टीका मंत्री सरदेसाई यांनी दोन दिवसांपूर्वीच करून जास्त पैसा खर्च करणारेच पर्यटक गोव्यात यायला हवेत असा मुद्दा मांडला होता. त्यावरून सरदेसाई यांच्या या भूमिकेवर देशभरातून टीका सुरू झाली. गोव्याच्या पर्यटन उद्योगानेही मंत्री सरदेसाई यांच्या या विधानाचे स्वागत केले नाही. आपण गोमंतकीयांचीच भावना व्यक्त केली आहे, कारण बसच्या खिडकीमधून एक पर्यटक रस्त्यावर लघवी करत असल्याचा व्हीडीओ आपण पाहिला होता, असे सरदेसाई म्हणाले. काही गोमंतकीयांनी मंत्री सरदेसाई यांच्या भूमिकेला सोशल मिडियावरून पाठींबा दिला. विरोधी काँग्रेस पक्षाने व आम आदमी पक्षाने सरदेसाई यांच्यावर टीका केली व ही विधाने भाटकारशाहीची लक्षणो असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर म्हणाले. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी संपर्क साधला व मंत्री सरदेसाई यांच्या विधानांविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली.

दरम्यान, मंत्री सरदेसाई यांनी आता थोडी वेगळी भूमिका मांडत हरियाणातही काही लोक चांगले आहेत असे नवे विधान केले आहे. आपण सर्व पर्यटकांना दोष देत नाही. फार थोडे पर्यटक गोव्यात नागरी शिस्त पाळत नाहीत, त्यांच्याविषयीच आपण बोललो होतो असे सरदेसाई म्हणाले. गोव्यात जे पर्यटक गोमंतकीयत्व सांभाळणार नाहीत, त्यांना आम्ही गोव्यातून माघारी पाठवू, असे विधान पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी केले. त्यावरही टीका सुरू आहे. गोव्यात येऊन काही पर्यटक अंमली पदार्थाचा व्यवसाय करतात असे  आजगावकर यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :goaगोवा