शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

काँग्रेस दिशाहिन; माझ्याविरुध्दही कट! एल्विस गोम्स यांनी मनातील खदखद केली व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2024 10:50 IST

तिकिटासाठी इच्छुक तरीही छाननी समितीच्या बैठकीला डावलले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून काही तासच उलटले असताना एल्विस गोम्स यांनी पक्षाच्या दिशाहिन कारभारावर आसूड ओढत आपल्याविरुध्द पक्षातच कट कारस्थान चालू असल्याचा आरोप केला आहे.

चार दिवसांपूर्वी पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक मडगाव येथे झाली. कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्री यांनी इच्छुक उमेदवारांना बोलावून 'वन टू वन चर्चा केली. परंतु एल्विस याना बोलावले नाही. त्यामुळे ते कमालीचे नाराज होते.

मनातील खदखद व्यक्त करताना एल्विस म्हणाले की, राज्यात काँग्रेसचा कारभार दिशाहिन झालेला आहे. निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखवूनही मला मुद्दामहून छाननी समितीच्या बैठकीला डावलले. माझ्याविरुध्द पक्षातच कट कारस्थान चालू आहे.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे एल्विस यांनी याआधीच जाहीर केले होते. स्क्रिनिंग कमिटीची बैठक घेण्यासाठी आलेले मिस्री तसेच पक्षाचे नवनियुक्त प्रभारी माणिकराव ठाकरे यांना तिकिटासाठी इच्छुक असलेले विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर भेटले. परंतु एल्विस गोम्स काही आले नाहीत. नंतर त्यांनी आपल्याला कोणी भेटायला बोलावलेच नाही, असे पत्रकारांना सांगितले.

राहुलजींपर्यंत जाणार...

एल्विस म्हणाले की, स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीतून मला बाहेर ठेवल्यानंतर सोमवारी झालेल्या पक्षाच्या दक्षिण जिल्हा समितीच्या बैठकीत काही जणांनी प्रश्न उपस्थित केला व त्यानंतरच इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले. मला बाजूला ठेवले जात असले तरी मी पक्षाबरोबर ठामपणे आहे. मला राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये आणले आहे. मात्र, परिस्थितीत जर का सुधारणा झाली नाही तर मी माझे म्हणणे राहुलजींकडे मांडणार आहे, त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल, असेही गोम्स यांनी यावेळी सांगितले.

तब्बल तीनवेळा पराभूत

एल्विस गोम्स यांना याआधी तीनवेळा पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे कदाचित त्यांना डावलले जात असावे, असा अंदाज आहे. २०१९ साली त्यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला. त्याआधी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करीत कुंकळ्ळी मतदारसंघातून रिंगणात उतरवले. परंतु तेथेही त्यांचा पराभव झाला. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसने पणजीतून उमेदवारी दिली. परंतु या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.

विधानसभा निवडणुकीच्याआधी गिरीश चोडणकर व दिगंबर कामत यांची सद्दी होती आता प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व त्यांच्या साथीदारांची आहे. दोन्ही गटांच्या कारभारात मला काहीच फरक जाणवलेला नाही. गोव्यात काँग्रेस दिशाहीन झाला आहे.  एल्विस गोम्स, काँग्रेस नेते. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस