शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

काँग्रेस दिशाहिन; माझ्याविरुध्दही कट! एल्विस गोम्स यांनी मनातील खदखद केली व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2024 10:50 IST

तिकिटासाठी इच्छुक तरीही छाननी समितीच्या बैठकीला डावलले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून काही तासच उलटले असताना एल्विस गोम्स यांनी पक्षाच्या दिशाहिन कारभारावर आसूड ओढत आपल्याविरुध्द पक्षातच कट कारस्थान चालू असल्याचा आरोप केला आहे.

चार दिवसांपूर्वी पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक मडगाव येथे झाली. कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्री यांनी इच्छुक उमेदवारांना बोलावून 'वन टू वन चर्चा केली. परंतु एल्विस याना बोलावले नाही. त्यामुळे ते कमालीचे नाराज होते.

मनातील खदखद व्यक्त करताना एल्विस म्हणाले की, राज्यात काँग्रेसचा कारभार दिशाहिन झालेला आहे. निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखवूनही मला मुद्दामहून छाननी समितीच्या बैठकीला डावलले. माझ्याविरुध्द पक्षातच कट कारस्थान चालू आहे.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे एल्विस यांनी याआधीच जाहीर केले होते. स्क्रिनिंग कमिटीची बैठक घेण्यासाठी आलेले मिस्री तसेच पक्षाचे नवनियुक्त प्रभारी माणिकराव ठाकरे यांना तिकिटासाठी इच्छुक असलेले विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर भेटले. परंतु एल्विस गोम्स काही आले नाहीत. नंतर त्यांनी आपल्याला कोणी भेटायला बोलावलेच नाही, असे पत्रकारांना सांगितले.

राहुलजींपर्यंत जाणार...

एल्विस म्हणाले की, स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीतून मला बाहेर ठेवल्यानंतर सोमवारी झालेल्या पक्षाच्या दक्षिण जिल्हा समितीच्या बैठकीत काही जणांनी प्रश्न उपस्थित केला व त्यानंतरच इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले. मला बाजूला ठेवले जात असले तरी मी पक्षाबरोबर ठामपणे आहे. मला राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये आणले आहे. मात्र, परिस्थितीत जर का सुधारणा झाली नाही तर मी माझे म्हणणे राहुलजींकडे मांडणार आहे, त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल, असेही गोम्स यांनी यावेळी सांगितले.

तब्बल तीनवेळा पराभूत

एल्विस गोम्स यांना याआधी तीनवेळा पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे कदाचित त्यांना डावलले जात असावे, असा अंदाज आहे. २०१९ साली त्यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला. त्याआधी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करीत कुंकळ्ळी मतदारसंघातून रिंगणात उतरवले. परंतु तेथेही त्यांचा पराभव झाला. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसने पणजीतून उमेदवारी दिली. परंतु या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.

विधानसभा निवडणुकीच्याआधी गिरीश चोडणकर व दिगंबर कामत यांची सद्दी होती आता प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व त्यांच्या साथीदारांची आहे. दोन्ही गटांच्या कारभारात मला काहीच फरक जाणवलेला नाही. गोव्यात काँग्रेस दिशाहीन झाला आहे.  एल्विस गोम्स, काँग्रेस नेते. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस