शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

काँग्रेस दिशाहिन; माझ्याविरुध्दही कट! एल्विस गोम्स यांनी मनातील खदखद केली व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2024 10:50 IST

तिकिटासाठी इच्छुक तरीही छाननी समितीच्या बैठकीला डावलले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून काही तासच उलटले असताना एल्विस गोम्स यांनी पक्षाच्या दिशाहिन कारभारावर आसूड ओढत आपल्याविरुध्द पक्षातच कट कारस्थान चालू असल्याचा आरोप केला आहे.

चार दिवसांपूर्वी पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक मडगाव येथे झाली. कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्री यांनी इच्छुक उमेदवारांना बोलावून 'वन टू वन चर्चा केली. परंतु एल्विस याना बोलावले नाही. त्यामुळे ते कमालीचे नाराज होते.

मनातील खदखद व्यक्त करताना एल्विस म्हणाले की, राज्यात काँग्रेसचा कारभार दिशाहिन झालेला आहे. निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखवूनही मला मुद्दामहून छाननी समितीच्या बैठकीला डावलले. माझ्याविरुध्द पक्षातच कट कारस्थान चालू आहे.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे एल्विस यांनी याआधीच जाहीर केले होते. स्क्रिनिंग कमिटीची बैठक घेण्यासाठी आलेले मिस्री तसेच पक्षाचे नवनियुक्त प्रभारी माणिकराव ठाकरे यांना तिकिटासाठी इच्छुक असलेले विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर भेटले. परंतु एल्विस गोम्स काही आले नाहीत. नंतर त्यांनी आपल्याला कोणी भेटायला बोलावलेच नाही, असे पत्रकारांना सांगितले.

राहुलजींपर्यंत जाणार...

एल्विस म्हणाले की, स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीतून मला बाहेर ठेवल्यानंतर सोमवारी झालेल्या पक्षाच्या दक्षिण जिल्हा समितीच्या बैठकीत काही जणांनी प्रश्न उपस्थित केला व त्यानंतरच इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले. मला बाजूला ठेवले जात असले तरी मी पक्षाबरोबर ठामपणे आहे. मला राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये आणले आहे. मात्र, परिस्थितीत जर का सुधारणा झाली नाही तर मी माझे म्हणणे राहुलजींकडे मांडणार आहे, त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल, असेही गोम्स यांनी यावेळी सांगितले.

तब्बल तीनवेळा पराभूत

एल्विस गोम्स यांना याआधी तीनवेळा पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे कदाचित त्यांना डावलले जात असावे, असा अंदाज आहे. २०१९ साली त्यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला. त्याआधी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करीत कुंकळ्ळी मतदारसंघातून रिंगणात उतरवले. परंतु तेथेही त्यांचा पराभव झाला. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसने पणजीतून उमेदवारी दिली. परंतु या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.

विधानसभा निवडणुकीच्याआधी गिरीश चोडणकर व दिगंबर कामत यांची सद्दी होती आता प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व त्यांच्या साथीदारांची आहे. दोन्ही गटांच्या कारभारात मला काहीच फरक जाणवलेला नाही. गोव्यात काँग्रेस दिशाहीन झाला आहे.  एल्विस गोम्स, काँग्रेस नेते. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस