शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

'मंजुरीनंतर 30 दिवसांत उद्योग उभा राहणे अशक्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 19:54 IST

राज्य गुंतवणूक मंडळाने (आयपीबी) मंजुरी दिल्यानंतर लगेच 30 दिवसांत नव्या उद्योगाचे बांधकाम सुरू होणे अशक्यच आहे अशा प्रकारचा अनुभव विविध खात्यांचे अधिकारी सांगू लागले आहेत.

पणजी - राज्य गुंतवणूक मंडळाने (आयपीबी) मंजुरी दिल्यानंतर लगेच 30 दिवसांत नव्या उद्योगाचे बांधकाम सुरू होणे अशक्यच आहे अशा प्रकारचा अनुभव विविध खात्यांचे अधिकारी सांगू लागले आहेत. यापूवी आयपीबीचा अनुभव ज्या उद्योजकांनी घेतला आहे, त्यांना तर 30 दिवसांत उद्योग उभा करण्याची घोषणा मोठी आश्चर्यकारकच वाटते.

व्हायब्रंट गोवा परिषदेत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात यापुढील काळात गुंतवणूक खूप वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांचा आशावाद स्वागतार्हच आहे. व्हायब्रंट गोवामुळे निदान गोव्यात गुंतवणुकीसाठी अनुकूल असे वातावरण तयार होण्याची सुरूवात झाली. व्हायब्रंट गोव्याने पहिले पाऊल टाकले आहे. अनेक गोमंतकीय व्यवसायिकांना व्हायब्रंट गोवामध्ये स्टॉल मांडण्याची संधी मिळाली. एकदा आयपीबीने एखाद्या उद्योगाचा अर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित उद्योग 30 दिवसांत बांधकाम सुरू करू शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी परिषदेत जाहीर केले. मात्र सरकारच्या विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सोमवारी लोकमतने संवाद साधला तेव्हा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर वस्तूस्थिती सांगितली. मुळात अर्ज आल्यानंतर आयपीबीकडून लगेच प्रकल्पांना मंजुरी मिळत नाही. लगेच मंजुरी देता येत नाही, कारण अगोदर बरेच सोपस्कार पार पाडावे लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे आयपीबीकडून प्रकल्पांना इन प्रिन्सिपल म्हणजे तत्त्वत: मंजुरी दिली जाते. नगर नियोजन (टीसीपी), वन, पंचायत, आरोग्य,अग्नी शामक, सीआरझेड, आयडीसी आदी विविध यंत्रणांची परवानगी अगोदर मिळवावी लागते. या परवानग्या मिळण्यासाठी खूप दिवस जातातच, असे प्रत्यक्ष विविध खात्यांची सुत्रे हाती असलेल्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेकदा सगळे परवाने प्राप्त करून मग आयपीबीने मंजुरी दिली तरी, उद्योग उभा राहतच नाही. उद्योग उभा राहण्यापूर्वी कुणी तरी ग्रामस्थ किंवा एनजीओ संबंधित प्रकल्पाविरुद्ध न्यायालयात जातात व काम ठप्प होते. गेल्या वर्षभरात आयपीबीने मंजूर केलेला एकही नवा उद्योग उभा राहिला नाही.

उद्योगांचे बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतींऐवजी आयपीबीनेच परवाना देणे हे स्तुत्य आहे. ग्रामपंचायतींकडून अडवणूक होऊ नये म्हणून सरकार आयपीबीला अधिकार देऊ पाहते. आयपीबी कायद्यालाच मुळात न्यायालयात आव्हान दिले गेलेले आहे. आयपीबीला बांधकाम परवाना देण्याचा अधिकार बहाल करणो व अन्य प्रकारे आयपीबीला बळकट बनविण्यासाठी सरकारला अगोदर अनेक कायदे व नियम दुरुस्त करावे लागतील. तरीही 30 दिवसांत उद्योग उभा राहणे हे मृगजळच ठरेल असे यापूर्वी आयपीबीशीनिगडीत कामांमध्येही जबाबदारी पार पाडलेले काही अधिकारी सांगतात. आयपीबीने मंजुरी दिली म्हणून काय झाले, आम्ही इथे कशाला बसलो आहोत, असा प्रश्न यापूर्वी आयडीसीच्या एका चेअरमननने एका उद्योजकाला विचारला होता. या प्रश्नामध्ये सर्व काही आले असे एक अधिकारी म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा हेतू शुद्ध आहे पण आता आयपीबीवर असलेले काही मंत्री उद्योजकांना सहजासहजी उद्योग उभे करायला देतील काय असाही प्रश्न गोव्यातील काहीजणांना पडला आहे. सेझ जमिनींच्या लिलावाचे प्रकरण अगोदरच गाजत आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत