शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

'मंजुरीनंतर 30 दिवसांत उद्योग उभा राहणे अशक्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 19:54 IST

राज्य गुंतवणूक मंडळाने (आयपीबी) मंजुरी दिल्यानंतर लगेच 30 दिवसांत नव्या उद्योगाचे बांधकाम सुरू होणे अशक्यच आहे अशा प्रकारचा अनुभव विविध खात्यांचे अधिकारी सांगू लागले आहेत.

पणजी - राज्य गुंतवणूक मंडळाने (आयपीबी) मंजुरी दिल्यानंतर लगेच 30 दिवसांत नव्या उद्योगाचे बांधकाम सुरू होणे अशक्यच आहे अशा प्रकारचा अनुभव विविध खात्यांचे अधिकारी सांगू लागले आहेत. यापूवी आयपीबीचा अनुभव ज्या उद्योजकांनी घेतला आहे, त्यांना तर 30 दिवसांत उद्योग उभा करण्याची घोषणा मोठी आश्चर्यकारकच वाटते.

व्हायब्रंट गोवा परिषदेत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात यापुढील काळात गुंतवणूक खूप वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांचा आशावाद स्वागतार्हच आहे. व्हायब्रंट गोवामुळे निदान गोव्यात गुंतवणुकीसाठी अनुकूल असे वातावरण तयार होण्याची सुरूवात झाली. व्हायब्रंट गोव्याने पहिले पाऊल टाकले आहे. अनेक गोमंतकीय व्यवसायिकांना व्हायब्रंट गोवामध्ये स्टॉल मांडण्याची संधी मिळाली. एकदा आयपीबीने एखाद्या उद्योगाचा अर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित उद्योग 30 दिवसांत बांधकाम सुरू करू शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी परिषदेत जाहीर केले. मात्र सरकारच्या विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सोमवारी लोकमतने संवाद साधला तेव्हा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर वस्तूस्थिती सांगितली. मुळात अर्ज आल्यानंतर आयपीबीकडून लगेच प्रकल्पांना मंजुरी मिळत नाही. लगेच मंजुरी देता येत नाही, कारण अगोदर बरेच सोपस्कार पार पाडावे लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे आयपीबीकडून प्रकल्पांना इन प्रिन्सिपल म्हणजे तत्त्वत: मंजुरी दिली जाते. नगर नियोजन (टीसीपी), वन, पंचायत, आरोग्य,अग्नी शामक, सीआरझेड, आयडीसी आदी विविध यंत्रणांची परवानगी अगोदर मिळवावी लागते. या परवानग्या मिळण्यासाठी खूप दिवस जातातच, असे प्रत्यक्ष विविध खात्यांची सुत्रे हाती असलेल्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेकदा सगळे परवाने प्राप्त करून मग आयपीबीने मंजुरी दिली तरी, उद्योग उभा राहतच नाही. उद्योग उभा राहण्यापूर्वी कुणी तरी ग्रामस्थ किंवा एनजीओ संबंधित प्रकल्पाविरुद्ध न्यायालयात जातात व काम ठप्प होते. गेल्या वर्षभरात आयपीबीने मंजूर केलेला एकही नवा उद्योग उभा राहिला नाही.

उद्योगांचे बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतींऐवजी आयपीबीनेच परवाना देणे हे स्तुत्य आहे. ग्रामपंचायतींकडून अडवणूक होऊ नये म्हणून सरकार आयपीबीला अधिकार देऊ पाहते. आयपीबी कायद्यालाच मुळात न्यायालयात आव्हान दिले गेलेले आहे. आयपीबीला बांधकाम परवाना देण्याचा अधिकार बहाल करणो व अन्य प्रकारे आयपीबीला बळकट बनविण्यासाठी सरकारला अगोदर अनेक कायदे व नियम दुरुस्त करावे लागतील. तरीही 30 दिवसांत उद्योग उभा राहणे हे मृगजळच ठरेल असे यापूर्वी आयपीबीशीनिगडीत कामांमध्येही जबाबदारी पार पाडलेले काही अधिकारी सांगतात. आयपीबीने मंजुरी दिली म्हणून काय झाले, आम्ही इथे कशाला बसलो आहोत, असा प्रश्न यापूर्वी आयडीसीच्या एका चेअरमननने एका उद्योजकाला विचारला होता. या प्रश्नामध्ये सर्व काही आले असे एक अधिकारी म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा हेतू शुद्ध आहे पण आता आयपीबीवर असलेले काही मंत्री उद्योजकांना सहजासहजी उद्योग उभे करायला देतील काय असाही प्रश्न गोव्यातील काहीजणांना पडला आहे. सेझ जमिनींच्या लिलावाचे प्रकरण अगोदरच गाजत आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत