शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

Goa: लोकप्रतिनिधी म्हणून या कार्यकाळात स्वच्छ व सुंदर प्रियोळ ला प्राधान्य - मंत्री गोविंद गावडे

By आप्पा बुवा | Updated: June 12, 2023 19:37 IST

Goa: कचरा निर्मूलनावर आज कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. हे रुपये खरे तर नागरिकांच्या हक्काचे आहेत जे इतर विकासात्मक कामाला वापरायला मिळतील  जर कचराच तयार नाही झाला तर. असे मत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले .

फोंडा - स्वच्छ व सुंदर प्रियोळ ही संकल्पना घेऊन या कार्यकाळात पुढे जात असून, आपला परिसर स्वच्छ ठेवायची जबाबदारी ही एकट्या सरकारची नसून, प्रत्येकाने आपण आपला परिसर स्वच्छ ठेवणार अशी शपथ घ्यायला हवी. पाश्चात्य देशात स्वच्छतेवर एवढा कटाक्ष असतो मग आम्ही भारतीय त्यात मागे का राहूया. कचरा निर्मूलनावर आज कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. हे रुपये खरे तर नागरिकांच्या हक्काचे आहेत जे इतर विकासात्मक कामाला वापरायला मिळतील  जर कचराच तयार नाही झाला तर. असे मत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले .

वेलिंग पंचायतीच्या वतीने बायोगास प्रकल्प सोमवारी त्यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच हर्षा गावडे ,पंचायतीचे उपसंचालक प्रसिद्ध नाईक, गटविकास अधिकारी अश्विन देसाई, उपसरपंच रुपेश नाईक, इतर पंच सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की उघड्यावर कचरा टाकण्यावर अंकुश यावा म्हणून सरकारने नवीन कायदा चालीस लावायचे ठरवले असून ह्या कायद्याच्या अंतर्गत एक पंच सदस्य सुद्धा कचरा टाकणाऱ्या वर कारवाई करू शकतो. नागरीक सुसंस्कारी झाले असते तर सदरचा कायदा लावायची पाळी सरकारवर आलीच नसती.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात टाकण्यात आलेल्या दारूच्या बाटल्या संदर्भात ते म्हणाले की ज्यावेळी गृहमंत्री अमित शहा आले होते त्यावेळेस सगळा परिसर स्वच्छ करण्यात आला होता. परंतु काही  दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा जागोजागी दारूच्या बाटल्यांचे खच पडलेले असून, आम्ही पोलिसांना ह्या बाबतीत सक्त होण्याचे आदेश दिलेले आहेत. यापुढे सदर परिसरात दारूच्या बाटल्या टाकणाऱ्या लोकांवर पोलीस कडक कारवाई करतील.

शिक्षित लोकांवर ताशेरे ओडताना ते म्हणाले की ग्रामीण भागातील लोकांना आपल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हे ज्ञान असते .परंतु जे स्वतःला शिकलेले आहेत असे समजतात ते शहरी भागातील लोक मात्र मिळेल तिकडे कचरा टाकून परिसर विद्रूप करण्याचे काम करतात.उघड्यावर कचरा टाकताना निदान आपण घेतलेल्या शिक्षणाचा तरी आठवण केली तरी खूप होईल.

कचऱ्याच्या बाबतीत लोक करत असलेली बेजबाबदारपणा पाहता सरकारचा सुद्धा सहनशक्ती संपलेली असून आता सरकार सुद्धा कठोर होणार आहे.

टॅग्स :goaगोवा