शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सीमेवर तणाव अन् गोव्यात कार्निव्हलची धूम; सोशल मीडियात टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 13:19 IST

देशाच्या सीमांवर युद्धजन्य स्थिती असूनही गोव्यात मात्र वाईन महोत्सव आणि कार्निव्हलसारख्या उत्सवांची धूम सुरू झाली आहे.

ठळक मुद्देदेशाच्या सीमांवर युद्धजन्य स्थिती असूनही गोव्यात मात्र वाईन महोत्सव आणि कार्निव्हलसारख्या उत्सवांची धूम सुरू झाली आहे. पर्रीकर सरकारने अशा प्रकारचे सगळे महोत्सव तूर्त स्थगित ठेवावेत, अशा प्रकारची मागणी सोशल मीडियावरून देशप्रेमी  नागरिक करू लागले आहेत.सरकारवर या विषयावरून जोरदार टीकाही होऊ लागली आहे.

पणजी - देशाच्या सीमांवर युद्धजन्य स्थिती असूनही गोव्यात मात्र वाईन महोत्सव आणि कार्निव्हलसारख्या उत्सवांची धूम सुरू झाली आहे. पर्रीकर सरकारने अशा प्रकारचे सगळे महोत्सव तूर्त स्थगित ठेवावेत, अशा प्रकारची मागणी सोशल मीडियावरून देशप्रेमी  नागरिक करू लागले आहेत. सरकारवर या विषयावरून जोरदार टीकाही होऊ लागली आहे.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर व अनेक भारतीय जवान त्यात शहीद झाल्यानंतर गोव्यातही चिंतेची स्थिती होती पण गोवा सरकारने सनबर्न क्लासिक हा इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव (ईडीएम) होऊ दिला. हजारो पर्यटक व स्थानिकांच्या सहभागाने वागातोर या किनारी भागात दोन दिवस ईडीएम चालला. मद्य आणि नृत्याच्या सहवासात हे सगळे घडले. याबाबतही सरकारच्या पर्यटन खात्यावर टीका झाली. काही मंत्री व आमदारांनी आपआपल्या मतदारसंघात युवकांना सनबर्न क्लासिक ईडीएमचे पासही वितरित केले. 

कार्निव्हल हा उत्सव गोमंतकीयांना खा, प्या आणि मजा करा असा संदेश देतो. सध्या खाऊन- पिऊन मजा करण्यासारखी स्थिती देशात नाही. मात्र गोवा सरकारला याचे भान राहिलेले नाही. काही नगरपालिकांनाही याचे भान राहिलेले नाही. कार्निव्हल उत्सवाला येत्या 2 मार्च रोजी पणजीहून आरंभ होत आहे. पणजीसह अन्य विविध शहरांमध्ये कार्निव्हलनिमित्ताने चार दिवस चित्ररथ मिरवणुका होतील. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोमंतकीयांना कार्निव्हलचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे. आणखी कोणतेच टेन्शन गोमंतकीयांनी कार्निव्हलच्या काळात न घेता खा, प्या, मजा करा हा संदेश अंमलात आणावा, असे मंत्री आजगावकर यांनी सूचविले आहे.

सोशल मीडियावरून गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर व इतरांनी सरकारवर टीका केली आहे. देशाच्या सीमांवरील स्थितीचा विचार न करता कार्निव्हल वगैरे साजरा करणे हे निषेधार्ह आहे. अशा सोहळ्य़ांशीनिगडीत राजकारण्यांचाही आपण धिक्कार करतो असे वेलिंगकर यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कट्टर स्वयंसेवक व भाजपाच्या पाठीराख्यांनीही सध्या सगळेच सोहळे व महोत्सव स्थगित केले जावेत, असे मत सोशल मीडियावरून मांडले आहे. मात्र सरकारने कान बंद केल्यासारखी स्थिती आहे.

द ग्रेप एस्कपेड हा विविध वाईन्सचा महोत्सव आहे. द्राक्षे व काजूपासून तयार केली जाणारी सगळी मद्ये या महोत्सवावेळी प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवली जातात. सरकारच्या सहभागाने होणारा हा महोत्सव पणजीत गुरुवारी सायंकाळपासून सुरू होत आहे. सरकारने या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले आहे.

टॅग्स :goaगोवा