शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर तणाव अन् गोव्यात कार्निव्हलची धूम; सोशल मीडियात टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 13:19 IST

देशाच्या सीमांवर युद्धजन्य स्थिती असूनही गोव्यात मात्र वाईन महोत्सव आणि कार्निव्हलसारख्या उत्सवांची धूम सुरू झाली आहे.

ठळक मुद्देदेशाच्या सीमांवर युद्धजन्य स्थिती असूनही गोव्यात मात्र वाईन महोत्सव आणि कार्निव्हलसारख्या उत्सवांची धूम सुरू झाली आहे. पर्रीकर सरकारने अशा प्रकारचे सगळे महोत्सव तूर्त स्थगित ठेवावेत, अशा प्रकारची मागणी सोशल मीडियावरून देशप्रेमी  नागरिक करू लागले आहेत.सरकारवर या विषयावरून जोरदार टीकाही होऊ लागली आहे.

पणजी - देशाच्या सीमांवर युद्धजन्य स्थिती असूनही गोव्यात मात्र वाईन महोत्सव आणि कार्निव्हलसारख्या उत्सवांची धूम सुरू झाली आहे. पर्रीकर सरकारने अशा प्रकारचे सगळे महोत्सव तूर्त स्थगित ठेवावेत, अशा प्रकारची मागणी सोशल मीडियावरून देशप्रेमी  नागरिक करू लागले आहेत. सरकारवर या विषयावरून जोरदार टीकाही होऊ लागली आहे.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर व अनेक भारतीय जवान त्यात शहीद झाल्यानंतर गोव्यातही चिंतेची स्थिती होती पण गोवा सरकारने सनबर्न क्लासिक हा इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव (ईडीएम) होऊ दिला. हजारो पर्यटक व स्थानिकांच्या सहभागाने वागातोर या किनारी भागात दोन दिवस ईडीएम चालला. मद्य आणि नृत्याच्या सहवासात हे सगळे घडले. याबाबतही सरकारच्या पर्यटन खात्यावर टीका झाली. काही मंत्री व आमदारांनी आपआपल्या मतदारसंघात युवकांना सनबर्न क्लासिक ईडीएमचे पासही वितरित केले. 

कार्निव्हल हा उत्सव गोमंतकीयांना खा, प्या आणि मजा करा असा संदेश देतो. सध्या खाऊन- पिऊन मजा करण्यासारखी स्थिती देशात नाही. मात्र गोवा सरकारला याचे भान राहिलेले नाही. काही नगरपालिकांनाही याचे भान राहिलेले नाही. कार्निव्हल उत्सवाला येत्या 2 मार्च रोजी पणजीहून आरंभ होत आहे. पणजीसह अन्य विविध शहरांमध्ये कार्निव्हलनिमित्ताने चार दिवस चित्ररथ मिरवणुका होतील. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोमंतकीयांना कार्निव्हलचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे. आणखी कोणतेच टेन्शन गोमंतकीयांनी कार्निव्हलच्या काळात न घेता खा, प्या, मजा करा हा संदेश अंमलात आणावा, असे मंत्री आजगावकर यांनी सूचविले आहे.

सोशल मीडियावरून गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर व इतरांनी सरकारवर टीका केली आहे. देशाच्या सीमांवरील स्थितीचा विचार न करता कार्निव्हल वगैरे साजरा करणे हे निषेधार्ह आहे. अशा सोहळ्य़ांशीनिगडीत राजकारण्यांचाही आपण धिक्कार करतो असे वेलिंगकर यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कट्टर स्वयंसेवक व भाजपाच्या पाठीराख्यांनीही सध्या सगळेच सोहळे व महोत्सव स्थगित केले जावेत, असे मत सोशल मीडियावरून मांडले आहे. मात्र सरकारने कान बंद केल्यासारखी स्थिती आहे.

द ग्रेप एस्कपेड हा विविध वाईन्सचा महोत्सव आहे. द्राक्षे व काजूपासून तयार केली जाणारी सगळी मद्ये या महोत्सवावेळी प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवली जातात. सरकारच्या सहभागाने होणारा हा महोत्सव पणजीत गुरुवारी सायंकाळपासून सुरू होत आहे. सरकारने या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले आहे.

टॅग्स :goaगोवा