शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गोवा २०५० पूर्वीच कार्बन उत्सर्जनमुक्त; मुख्यमंत्र्यांची मुक्तीदिनी घोषणा

By वासुदेव.पागी | Updated: December 19, 2023 13:27 IST

४० हजार नवीन रोजगार संधीची निर्मिती

पणजी: गोवा वेगाने हरित उर्जेच्या मार्गाने  जात असल्यामुळे २०५० पूर्वीच गोव्यात १०० टक्के कार्बन उत्सर्जन थांबणार असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी  गोवा विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या गोवा मुक्तीदिन सोहळ्यात बोलताना सांगितले. 

गोव्यात सार्वजनिक बसगाड्या या वीजेवर धावतात. वीजेवरील अधिकाधिक वाहने घेण्यासाठी प्रोत्साहन देणारे गोव्याचे धोरण आहे. यामुळे वर्ष २०५०  पूर्वीच गोवा पूर्णपणे कार्बन उत्सर्जन मुक्त होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने गोव्यात ४० हजार रोजगाराच्या संधींची निर्मिती होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. गोव्याचे दर डोई उ्पन्न ३० टक्क्यांनी वाढल्याची माहितीही त्यांनी दिली. 

कूळ कायद्याचे अनेक दावे महसूल न्यायालयात प्रलंबीत आहेत याची सरकारला जाणीव आहे, परंतु हे जलद तत्वावर निकालात काढले जातील आणि कुळांना त्यांचे जमीन हक्क दिले जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या ज्या मुलांना अजून सरकारी नोकरी देणे राहिले आहे त्या सर्वांना येत्या २६ जानेवारीपर्यंत नोकऱ्या दिल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

विश्वकर्मा योजने अंतर्गत पारंपरिक व्यवसायिकांना कमीत कमी व्याजदरासह कर्जे दिले जातील तसेच त्यांना प्रशिक्षणही दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रातही कल्याणकारी योजना आणल्या जातील. राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ७०० कोटींचे प्रकल्पाचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविले असून केंद्राने या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. केंद्र सरकार या प्रकल्पासठी गोव्याला ६० टक्के अर्थसहाय्य करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पर्यटन वाढत आहे आणि त्या अनुशंगाने दर डोई उत्पन्नही वाढले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गोव्यात टप्प्या टप्याने अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या शिक्षण प्रशिक्षण संस्थांची स्थापना केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.