शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
4
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
5
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
6
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
7
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
8
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
9
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
10
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
11
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
12
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
13
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
14
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
15
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
16
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
17
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
18
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
19
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
20
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक

गोव्याला दर्जेदार पर्यटक हवेत - मायकल लोबो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 14:30 IST

नाताळ, नववर्षानिमित्त येत्या काही दिवसात काळात गोव्यात पर्यटकांची संख्या प्रचंड वाढणार आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गोव्यातील किनारे देशी पर्यटकांनी गजबजून जातील.

पणजी :  नाताळ, नववर्षानिमित्त येत्या काही दिवसात काळात गोव्यात पर्यटकांची संख्या प्रचंड वाढणार आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गोव्यातील किनारे देशी पर्यटकांनी गजबजून जातील. या पार्श्वभूमीवर जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या कळंगुट किनाऱ्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी गोव्यात पर्यटक हवेत, पण ते दर्जेदार असावेत, असे मत व्यक्त केले आहे.

लोबो म्हणाले की, गोव्यात दारू स्वस्तात मिळते म्हणून येणारे पर्यटक लक्षणीय आहेत. शेजारी राज्यामधून असे पर्यटक येतात आणि ते केवळ दारूच खरेदी करून रात्री किनाऱ्यावर मौजमजा करतात  आणि  कचरा सोडून जातात. कचरा उचलण्याचे काम सरकारला आणि स्थानिक पंचायतीला करावे लागते.

लोबो म्हणाले की म्हणाले की, उघड्यावर दारू पिणाऱ्या तसेच अस्वच्छता करणाऱ्यांना दंड तसेच कैदेची कडक तरतूद असलेला कायदा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत असे प्रकार चालूच राहणार असून दर्जेदार पर्यटक गोव्याला मिळू शकणार नाहीत.

रशिया, इंग्लंड  तसेच अन्य राष्ट्रांमधून  विदेशी पर्यटकांना घेऊन येणाऱ्या चार्टर विमानांची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. विद्यमान मंत्री  पर्यटन मंत्री बाबू आजगावकर  यांनाच दोष देऊन चालणार नाही. गेल्या सहा वर्षात  राज्य सरकारचे पर्यटन विषयक  मार्केटिंग धोरण कोलमडले आहे. चुकीच्या धोरणामुळे गोव्याला  दर्जेदार पर्यटक मिळू शकलेले नाहीत.

साफसफाईची समस्या कायम

लोबो म्हणाले की, किनाऱ्यांवर साफ सफाईची समस्या अजून कायम आहे. मधल्या पंधरा दिवसात  कचरा उचलण्याचे काम बंद झाले त्यामुळे दृष्टी लाईफ सेविंग कंपनीचे काही कामगार काम सोडून गावाला गेले . त्यांना परत आणण्याचे तसेच  ही व्यवस्था सुरळीत करण्याचे काम अजून मार्गी लागलेले नाही.  किनारा सफाईचे काम घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे सोपविणे आवश्यक आहे. कारण या मंडळाकडे २२ अभियंते आहेत. पर्यटन खात्याला साफसफाईचे काम करण्याचा  कोणताही अनुभव नाही.

६० कोटींची विकासकामे

एका प्रश्नावर लोबो म्हणाले की, गेल्या चार वर्षांच्या काळात कळंगुट, बागा,कांदोळीत  ६० कोटींहून अधिक खर्चाची विकासकामे झालेली आहेत. कळंगुट- बागा- सिकेरी असा १० कोटींचा पदपथ  बांधण्यात आला असून  पर्यटक तसेच स्थानिकाना  ये, जा करण्यासाठी या पदपथाचा वापर होत आहे. कळंगुट बीच ते सेंट अलेक्स चर्च, नागवा ते हडफडे पदपथ झालेला आहे . याशिवाय किनाऱ्यावर सौंदर्यीकरणाचे काम केले आहे. किनाऱ्यावर पुरेशी प्रसाधनगृहे, कपडे बदलण्यासाठी खोल्या अशी सर्व व्यवस्था केलेली आहे. तरीसुद्धा  काही देशी पर्यटक दारू पिऊन करून किनाऱ्यावरच घाण करतात. बाटल्या किनाऱ्यावर फेकतात. बाटल्या फुटल्यास  किनाऱ्यावर ये-जा करणाऱ्यांना काचा लागून रक्तबंबाळ होतात. त्यामुळे उघड्यावर बाटल्या फेकणार्‍यांना  दहशत बसावी यासाठी कडक शिक्षेची तरतूद असलेली कायदा दुरुस्ती आणणे गरजेचे आहे. याबाबतीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी मी बोललो आहे. ते या गोष्टीला  अनुकूल आहेत.

लोबो म्हणाले की,  थर्टी फर्स्टच्या रात्री खासकरून शेजारील राज्यातून कोल्हापूर, रत्नागिरी तसेच कर्नाटकातील बेळगाव, कारवार, हुबळी भागातून येणारे पर्यटक स्वतःची वाहने घेऊन येतात. जेवण-खाण स्वतःबरोबर आणतात आणि येथे फक्त दारू खरेदी करून रात्रभर किनाऱ्यावर हैदोस घालतात आणि किनाऱ्यावर कचरा सोडून जातात अशा पर्यटकांनाही अद्दल घडली पाहिजे. गोव्यात पर्यटन व्यवसायिकांचे उत्पन्न वाढायचे असेल तर दर्जेदार पर्यटक अपेक्षित आहेत. वरील प्रकारांमुळे कळंगुट, बागा, कांदोळी अंजुना, वागातोर किनाऱ्याची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे आम्हाला दर्जेदार पर्यटक हवेत.

 

टॅग्स :tourismपर्यटनgoaगोवा