शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

5 मिनिटांत गुंडाळले गोवा विधानसभेचे अधिवेशन

By admin | Updated: February 28, 2017 15:10 IST

गोवा विधानसभेची बरखास्ती टाळण्यासाठी मंगळवारी विधानसभेचे अधिवेशन पार पडले. विशेष म्हणजे सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण केवळ तीन मिनिटांत आणि अधिवेशन फक्त पाच मिनिटांत आटोपले.

 ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 28 - गोवा विधानसभेची बरखास्ती टाळण्यासाठी मंगळवारी विधानसभेचे अधिवेशन पार पडले. विशेष म्हणजे सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण केवळ तीन मिनिटांत आणि अधिवेशन फक्त पाच मिनिटांत आटोपले. देशातील बहुधा हा पहिलाच प्रकार असावा असे मानले जात आहे.
 
सरकारने लोकशाहीची आज थट्टा केली अशी टीका विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनी अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना केली. घटनेतील तरतुदीनुसार दर सहा महिन्यांनी  विधानसभा अधिवेशन बोलवणे गरजेचे असते. यावेळी विधानसभा निवडणूक आली व त्यामुळे निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत सरकार अधिवेशन घेऊ शकले नाही.
 
यापूर्वी शेवटचे अधिवेशन झाल्यास येत्या 3 मार्च रोजी सहा महिने झाले असते. त्यामुळे विधानसभेवर बरखास्ती ओढावली असती. यावर उपाय म्हणून घटनात्मक तरतुदीची गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने मंगळवारी तातडीने एक दिवसाचे अधिवेशन  बोलावले. फक्त 27 आमदार त्यास उपस्थित राहू शकले. 
 
नव्या विधानसभेसाठी मतदान झालेले असताना मावळत्या विधानसभेचे अधिवेशन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. नव्या वर्षातील पहिले अधिवेशन असल्यामुळे राज्यपालांनी अभिभाषण केले. अजून निवडणूक निकाल जाहीर झालेला नाही व आचारसंहिता कायम असल्यामुळे  आपण सरकारच्या धोरणांवर बोलणे टाळते, असे राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी सांगितले.  घटनात्मक तरतुदीच्या पालनासाठी हे अधिवेशन बोलवावे लागले असे राज्यपालांनी नमूद करून तीन मिनिटांत अभिभाषण संपवले.
 
राज्यपाल सभागृहातून बाहेर गेल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनी उठून ही लोकशाहीची थट्टा चालली आहे, असा उल्लेख केला. एवढ्यात सभापतींनी राष्ट्रगीत पुकारले व राष्ट्रगीत संपताच आता विधानसभेसमोर कोणतेच कामकाज नसल्याचे सांगून अधिवेशन गुंडाळले. त्यामुळे विरोधकांना बोलण्याची संधीच मिळाली नाही.
 
दरम्यान अधिवेशन बोलवत असल्याची पूर्व सूचना देखील सरकारने विरोधकांना दिली नाही. सर्व  नियमांचे सरकारने उल्लंघन केले व लोकशाहीची थट्टा केली अशी टीका राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. विधानसभेसमोर कामकाज काहीच नव्हते. तांत्रिक सोपस्कार पार पाडण्यासाठीच अधिवेशन होते असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत  पार्सेकर यांनी पत्रकारांना सांगितले. विधानसभेची बरखास्ती होणे हा आमदारांवरील अन्याय ठरला असता, असे मुख्यमंत्री म्हणाले.