शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

5 मिनिटांत गुंडाळले गोवा विधानसभेचे अधिवेशन

By admin | Updated: February 28, 2017 15:10 IST

गोवा विधानसभेची बरखास्ती टाळण्यासाठी मंगळवारी विधानसभेचे अधिवेशन पार पडले. विशेष म्हणजे सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण केवळ तीन मिनिटांत आणि अधिवेशन फक्त पाच मिनिटांत आटोपले.

 ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 28 - गोवा विधानसभेची बरखास्ती टाळण्यासाठी मंगळवारी विधानसभेचे अधिवेशन पार पडले. विशेष म्हणजे सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण केवळ तीन मिनिटांत आणि अधिवेशन फक्त पाच मिनिटांत आटोपले. देशातील बहुधा हा पहिलाच प्रकार असावा असे मानले जात आहे.
 
सरकारने लोकशाहीची आज थट्टा केली अशी टीका विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनी अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना केली. घटनेतील तरतुदीनुसार दर सहा महिन्यांनी  विधानसभा अधिवेशन बोलवणे गरजेचे असते. यावेळी विधानसभा निवडणूक आली व त्यामुळे निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत सरकार अधिवेशन घेऊ शकले नाही.
 
यापूर्वी शेवटचे अधिवेशन झाल्यास येत्या 3 मार्च रोजी सहा महिने झाले असते. त्यामुळे विधानसभेवर बरखास्ती ओढावली असती. यावर उपाय म्हणून घटनात्मक तरतुदीची गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने मंगळवारी तातडीने एक दिवसाचे अधिवेशन  बोलावले. फक्त 27 आमदार त्यास उपस्थित राहू शकले. 
 
नव्या विधानसभेसाठी मतदान झालेले असताना मावळत्या विधानसभेचे अधिवेशन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. नव्या वर्षातील पहिले अधिवेशन असल्यामुळे राज्यपालांनी अभिभाषण केले. अजून निवडणूक निकाल जाहीर झालेला नाही व आचारसंहिता कायम असल्यामुळे  आपण सरकारच्या धोरणांवर बोलणे टाळते, असे राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी सांगितले.  घटनात्मक तरतुदीच्या पालनासाठी हे अधिवेशन बोलवावे लागले असे राज्यपालांनी नमूद करून तीन मिनिटांत अभिभाषण संपवले.
 
राज्यपाल सभागृहातून बाहेर गेल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनी उठून ही लोकशाहीची थट्टा चालली आहे, असा उल्लेख केला. एवढ्यात सभापतींनी राष्ट्रगीत पुकारले व राष्ट्रगीत संपताच आता विधानसभेसमोर कोणतेच कामकाज नसल्याचे सांगून अधिवेशन गुंडाळले. त्यामुळे विरोधकांना बोलण्याची संधीच मिळाली नाही.
 
दरम्यान अधिवेशन बोलवत असल्याची पूर्व सूचना देखील सरकारने विरोधकांना दिली नाही. सर्व  नियमांचे सरकारने उल्लंघन केले व लोकशाहीची थट्टा केली अशी टीका राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. विधानसभेसमोर कामकाज काहीच नव्हते. तांत्रिक सोपस्कार पार पाडण्यासाठीच अधिवेशन होते असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत  पार्सेकर यांनी पत्रकारांना सांगितले. विधानसभेची बरखास्ती होणे हा आमदारांवरील अन्याय ठरला असता, असे मुख्यमंत्री म्हणाले.