शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

तामनार प्रकल्प रद्द करा; विरोधकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 10:28 IST

प्रसंगी कोल्हापूरमधून वीज आणू : ढवळीकर

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: तामनार १२०० केव्ही वीज वाहिन्या प्रकल्पासाठी कर्नाटकातच एलाइन्मेंट निश्चित झालेली नसताना सरकार गोव्यात हा प्रकल्प निश्चित कसा काय करू शकते, असा प्रश्न करून विरोधकांनी तामनार प्रकल्प रद्द करण्याचा रेट धरला, त्यामुळे सरकारला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पडले.

आमदार विजय सरदेसाई यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला पहिलाच प्रश्न उपस्थित केला तो तामनार प्रकल्पासंबंधी कर्नाटकातून वीजवाहिन्या नेमक्या कुठे टाकाव्यात याची निश्चिती झाली नसल्यामुळे गोवा सरकार यासाठी एलायन्मेंट कोणत्या आधारावर करते, असा प्रश्न त्यांनी केला. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे उद्या कर्नाटकात नियोजित भागातून वीजवाहिन्या नेण्यास मज्जाव करण्यात आला तर गोवा सरकारकडून करण्यात आलेली कोटयवधी रुपयांची गुंतवणूक फुकट जाणार नाही, काय असा प्रश्न त्यांना केला.

विरोधी पक्षनेते घरी आलेमाव, कार्लस आल्मेदा, एल्टॉन डिकॉस्टा आणि बेन्झी व्हिएगश यांनीही हाच मुद्दा ताणून धरताना प्रकल्पच रद्द करण्याची मागणी केली. मात्र प्रकल्पासाठी करण्यात आलेले काम वाया जाणार नाही, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. नियोजित भागातन वीज वाहिन्या गोव्यात आणण्यास कर्नाटक अपयशी ठरला तर कोल्हापूरमधून वीज घेण्याचीही सरकारची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, तामनार प्रकल्प हा गोव्याच्या भल्यासाठीच असल्याचे सांगताना वीजमंत्री म्हणाले की कर्नाटकातून वीज आणण्यासाठीचा हा विद्यमान प्रकल्प आंबेवाडी येथून सुरू होतो. तेथून सांगोडा, धारबांदोडा, कुंकळ्ळी, शेल्डे येवून या वीज वाहिन्या ओढल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी १०३ टॉवर पूर्ण झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

सरदेसाई-ढवळीकर यांच्यात जुगलबंदी

तामनार प्रकल्पावर चर्चा सुरु असतानाच वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मूळ मुद्यावरून जरा दुसरीकडे जाताना माणसाने आपली कर्मे चांगली केली पाहिजेत असे म्हटले आणि याच मुद्यावर सभागृहात कर्मवादावर चर्चा सुरु झाली. आपल्या प्रश्नावर अचूक उत्तर न देता मंत्री कर्मावर बोलतात हे पाहून विजय सरदेसाई यांनी मंत्री ढवळीकर यांची निवडणुकीपूर्वी कर्मे वेगळी होती आणि आता सरकारात सामील झाल्यानंतर वेगळी आहेत, असे सांगितले. निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसबरोबर युती केलेले ढवळीकर यांनी सामनार प्रकल्पाला विरोध केला होता, याची आठवण करून दिली. आता सरकारात सामील होऊन मंत्री भलतीच कर्मे करीत असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. सरकारच्या अशा कर्मामुळे गोव्याची वाट लागत असल्याचे सांगितले.

१४ हजार झाडे कापणार, खरे का ?

या प्रकल्पात १४ हजार झाडे कापली जाणार असल्याचे सरकारच्याच प्रतिज्ञापत्रात म्हटल्याचे सरदेसाई यांनी सांगितले, त्यावर झाडे अधिक कापावी लागणार नसल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. परंतु नेमकी किती झाडे कापावी लागणार, असा प्रश्न सरदेसाई यांनी विचारला असता यावर उत्तर देण्यासाठी मंत्र्यांनी वेळ मागितला.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा