शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तामनार प्रकल्प रद्द करा; विरोधकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 10:28 IST

प्रसंगी कोल्हापूरमधून वीज आणू : ढवळीकर

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: तामनार १२०० केव्ही वीज वाहिन्या प्रकल्पासाठी कर्नाटकातच एलाइन्मेंट निश्चित झालेली नसताना सरकार गोव्यात हा प्रकल्प निश्चित कसा काय करू शकते, असा प्रश्न करून विरोधकांनी तामनार प्रकल्प रद्द करण्याचा रेट धरला, त्यामुळे सरकारला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पडले.

आमदार विजय सरदेसाई यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला पहिलाच प्रश्न उपस्थित केला तो तामनार प्रकल्पासंबंधी कर्नाटकातून वीजवाहिन्या नेमक्या कुठे टाकाव्यात याची निश्चिती झाली नसल्यामुळे गोवा सरकार यासाठी एलायन्मेंट कोणत्या आधारावर करते, असा प्रश्न त्यांनी केला. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे उद्या कर्नाटकात नियोजित भागातून वीजवाहिन्या नेण्यास मज्जाव करण्यात आला तर गोवा सरकारकडून करण्यात आलेली कोटयवधी रुपयांची गुंतवणूक फुकट जाणार नाही, काय असा प्रश्न त्यांना केला.

विरोधी पक्षनेते घरी आलेमाव, कार्लस आल्मेदा, एल्टॉन डिकॉस्टा आणि बेन्झी व्हिएगश यांनीही हाच मुद्दा ताणून धरताना प्रकल्पच रद्द करण्याची मागणी केली. मात्र प्रकल्पासाठी करण्यात आलेले काम वाया जाणार नाही, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. नियोजित भागातन वीज वाहिन्या गोव्यात आणण्यास कर्नाटक अपयशी ठरला तर कोल्हापूरमधून वीज घेण्याचीही सरकारची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, तामनार प्रकल्प हा गोव्याच्या भल्यासाठीच असल्याचे सांगताना वीजमंत्री म्हणाले की कर्नाटकातून वीज आणण्यासाठीचा हा विद्यमान प्रकल्प आंबेवाडी येथून सुरू होतो. तेथून सांगोडा, धारबांदोडा, कुंकळ्ळी, शेल्डे येवून या वीज वाहिन्या ओढल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी १०३ टॉवर पूर्ण झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

सरदेसाई-ढवळीकर यांच्यात जुगलबंदी

तामनार प्रकल्पावर चर्चा सुरु असतानाच वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मूळ मुद्यावरून जरा दुसरीकडे जाताना माणसाने आपली कर्मे चांगली केली पाहिजेत असे म्हटले आणि याच मुद्यावर सभागृहात कर्मवादावर चर्चा सुरु झाली. आपल्या प्रश्नावर अचूक उत्तर न देता मंत्री कर्मावर बोलतात हे पाहून विजय सरदेसाई यांनी मंत्री ढवळीकर यांची निवडणुकीपूर्वी कर्मे वेगळी होती आणि आता सरकारात सामील झाल्यानंतर वेगळी आहेत, असे सांगितले. निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसबरोबर युती केलेले ढवळीकर यांनी सामनार प्रकल्पाला विरोध केला होता, याची आठवण करून दिली. आता सरकारात सामील होऊन मंत्री भलतीच कर्मे करीत असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. सरकारच्या अशा कर्मामुळे गोव्याची वाट लागत असल्याचे सांगितले.

१४ हजार झाडे कापणार, खरे का ?

या प्रकल्पात १४ हजार झाडे कापली जाणार असल्याचे सरकारच्याच प्रतिज्ञापत्रात म्हटल्याचे सरदेसाई यांनी सांगितले, त्यावर झाडे अधिक कापावी लागणार नसल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. परंतु नेमकी किती झाडे कापावी लागणार, असा प्रश्न सरदेसाई यांनी विचारला असता यावर उत्तर देण्यासाठी मंत्र्यांनी वेळ मागितला.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा