शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

गोव्यात काजू कलम सबसिडीसाठी कृषी कार्डाची सक्ती काढली; २२ हजार शेतक-यांना होणार लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 20:03 IST

यापुढे शेतक-याची १ हजार चौरस मिटर जमीन असली आणि कमीत कमी २0 कलमे त्याने घेतली तरी कृषी कार्ड नसतानाही सबसिडीचा लाभ दिला जाईल. 

पणजी : काजू कलम खरेदीसाठी सबसिडीकरिता कृषी कार्डाची सक्ती गोवा सरकारने काढून टाकली आहे. त्याचबरोबर यापुढे शेतक-यांना सबसिडीसाठी महिनोन्महिने वाटही पाहावी लागणार नाही. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी कृषिमंत्री या नात्याने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात २२ हजार शेतकरी अजूनही असे आहेत की त्यांच्याकडे कृषी कार्डे नाहीत. ते या सबसिडीपासून वंचित राहिले होते. यापुढे शेतक-याची १ हजार चौरस मिटर जमीन असली आणि कमीत कमी २0 कलमे त्याने घेतली तरी कृषी कार्ड नसतानाही सबसिडीचा लाभ दिला जाईल. 

कवळेकर म्हणाले की, राज्यात काजू उत्पादन वाढविण्यासाठी ही सक्ती काढून टाकली आहे. अधिकाधिक काजू लागवड केली जावे तसेच पडीक जमिनीही लागवडीखाली याव्यात यासाठी उपाय केले जात आहेत. ते पुढे म्हणाले की, राज्यात केवळ १३ हजार शेतक-यांकडेच कृषी कार्डे आहेत. स्वत:च्या मालकीची शेतजमीन नसल्यास कृषी कार्डे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी अनेक कृषी योजनांपासून वंचित राहतो. काजू कलमे खरेदी करण्यासाठी ७५ टक्के सबसिडी दिली जाते. आतापर्यंत अशी व्यवस्था होती की, आधी कलमे शेतक-यांनी स्वत:च्या खिशातून खर्च करून खरेदी करावी लागायची आणि बिले सादर केल्यानंतर काही महिने वाट पाहावी लागत असे आता खरेदीच्यावेळी शेतक-यांनी केवळ २५ टक्के रक्कम भरावी आणि कलमे घेऊन जावीत. यामुळे शेतकरी अधिकाधिक कलमे खरेदी करतील, अशी अपेक्षा सरकारने ठेवली आहे. कवळेकर म्हणाले की, सुशिक्षित बेकार युवकांनी शेतीकडे वळावे, शेतीबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलावा यासाठी सरकारचे प्रयत्न असून आवश्यक त्या साधनसुविधा पुरविण्याची सरकारची तयारी आहे. 

यावर्षी काजू उत्पादकांनी १५0 कोटी रुपयांची उलाढाल केली यावरून पिक चांगले होते हे स्पष्ट होत असल्याचे कवळेकर म्हणाले. काजूसाठी सरकारने आधारभूत दर प्रति किलो १२५ रुपये केला आहे. किती शेतक-यांनी या आधारभूत दराचा लाभ घेतला यावरून यंदाची ही काजू उलाढाल स्पष्ट झालेली आहे. दरम्यान, खरिपासाठी भातबियाणी आणि भाजी बियाणी मिळून ५२0 टन बियाणी कृषी खात्याकडून वितरित झाल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोंसो हेही उपस्थित होते.