शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

गोव्यात काजू कलम सबसिडीसाठी कृषी कार्डाची सक्ती काढली; २२ हजार शेतक-यांना होणार लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 20:03 IST

यापुढे शेतक-याची १ हजार चौरस मिटर जमीन असली आणि कमीत कमी २0 कलमे त्याने घेतली तरी कृषी कार्ड नसतानाही सबसिडीचा लाभ दिला जाईल. 

पणजी : काजू कलम खरेदीसाठी सबसिडीकरिता कृषी कार्डाची सक्ती गोवा सरकारने काढून टाकली आहे. त्याचबरोबर यापुढे शेतक-यांना सबसिडीसाठी महिनोन्महिने वाटही पाहावी लागणार नाही. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी कृषिमंत्री या नात्याने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात २२ हजार शेतकरी अजूनही असे आहेत की त्यांच्याकडे कृषी कार्डे नाहीत. ते या सबसिडीपासून वंचित राहिले होते. यापुढे शेतक-याची १ हजार चौरस मिटर जमीन असली आणि कमीत कमी २0 कलमे त्याने घेतली तरी कृषी कार्ड नसतानाही सबसिडीचा लाभ दिला जाईल. 

कवळेकर म्हणाले की, राज्यात काजू उत्पादन वाढविण्यासाठी ही सक्ती काढून टाकली आहे. अधिकाधिक काजू लागवड केली जावे तसेच पडीक जमिनीही लागवडीखाली याव्यात यासाठी उपाय केले जात आहेत. ते पुढे म्हणाले की, राज्यात केवळ १३ हजार शेतक-यांकडेच कृषी कार्डे आहेत. स्वत:च्या मालकीची शेतजमीन नसल्यास कृषी कार्डे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी अनेक कृषी योजनांपासून वंचित राहतो. काजू कलमे खरेदी करण्यासाठी ७५ टक्के सबसिडी दिली जाते. आतापर्यंत अशी व्यवस्था होती की, आधी कलमे शेतक-यांनी स्वत:च्या खिशातून खर्च करून खरेदी करावी लागायची आणि बिले सादर केल्यानंतर काही महिने वाट पाहावी लागत असे आता खरेदीच्यावेळी शेतक-यांनी केवळ २५ टक्के रक्कम भरावी आणि कलमे घेऊन जावीत. यामुळे शेतकरी अधिकाधिक कलमे खरेदी करतील, अशी अपेक्षा सरकारने ठेवली आहे. कवळेकर म्हणाले की, सुशिक्षित बेकार युवकांनी शेतीकडे वळावे, शेतीबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलावा यासाठी सरकारचे प्रयत्न असून आवश्यक त्या साधनसुविधा पुरविण्याची सरकारची तयारी आहे. 

यावर्षी काजू उत्पादकांनी १५0 कोटी रुपयांची उलाढाल केली यावरून पिक चांगले होते हे स्पष्ट होत असल्याचे कवळेकर म्हणाले. काजूसाठी सरकारने आधारभूत दर प्रति किलो १२५ रुपये केला आहे. किती शेतक-यांनी या आधारभूत दराचा लाभ घेतला यावरून यंदाची ही काजू उलाढाल स्पष्ट झालेली आहे. दरम्यान, खरिपासाठी भातबियाणी आणि भाजी बियाणी मिळून ५२0 टन बियाणी कृषी खात्याकडून वितरित झाल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोंसो हेही उपस्थित होते.