शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

coronaVirus News: गोव्यात ६० दिवसांत ७० वर्षांवरील १०० रुग्णांचा कोविडने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 12:43 IST

पणजी : गेल्या साठ दिवसांमध्ये ७० वर्षे व त्याहून जास्त वयाच्या एकूण १०० रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे. आरोग्य खात्याकडे नोंद असलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास दि. १ ओक्टोबरपासून १०० दिवसांत ७०, ७५, ८० व ९० वर्षांच्या मिळून १०० व्यक्तींचा जीव गेला हे स्पष्ट होत आहे. ७० वर्षे झालेल्या तसेच वयाची पंचाहत्तरी, एैंशी पार केलेल्या नागरिकांनी कोविड काळात अधिक काळजी घ्यायला हवी हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण जे एकूण सुमारे तीनशे नागरिक गेल्या दोन महिन्यांत मरण पावले, त्यात १०० नागरिक हे ७० ते ८५ या वयोगटातील आहेत. ९० वर्षांचे दोन रुग्ण मरण पावले. ७२ व ७५ वर्षांचे अनेक नागरिक मरण पावले. अनेक वर्षे डायबेटीस किंवा उच्च रक्तदाब असलेल्या ७५ व ८० वर्षे वयाच्या रुग्णांचा कोविडने जीव घेतला आहे.  ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंंबरमध्ये अशा नागरिकांच्या बळींची संख्या कमी आहे. मात्र सप्टेंबर व ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारच्या रुग्णांचा जास्त संख्येने बळी गेला आहे. मृत्यू प्रमाण सातशेच्या दिशेने  दरम्यान,आतापर्यंत राज्यात ६९० हून अधिक व्यक्तींचे कोविडने बळी घेतले. २२ जून रोजी गोव्यात कोविडचा पहिला बळी नोंद झाला होता. त्यावेळपासून आतापर्यंतचे बळींचेप्रमाण पाहिले तर सातशेचा आकडा गाठण्याच्यादिशेने स्थिती जात आहे हे स्पष्ट होत आहे. मात्र याचबरोबर हेही खरे की, गेल्या सहा महिन्यांत एकूण ४६ हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण ...

पणजी : गेल्या साठ दिवसांमध्ये ७० वर्षे व त्याहून जास्त वयाच्या एकूण १०० रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे. आरोग्य खात्याकडे नोंद असलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास दि. १ ओक्टोबरपासून १०० दिवसांत ७०, ७५, ८० व ९० वर्षांच्या मिळून १०० व्यक्तींचा जीव गेला हे स्पष्ट होत आहे.

७० वर्षे झालेल्या तसेच वयाची पंचाहत्तरी, एैंशी पार केलेल्या नागरिकांनी कोविड काळात अधिक काळजी घ्यायला हवी हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण जे एकूण सुमारे तीनशे नागरिक गेल्या दोन महिन्यांत मरण पावले, त्यात १०० नागरिक हे ७० ते ८५ या वयोगटातील आहेत. ९० वर्षांचे दोन रुग्ण मरण पावले. ७२ व ७५ वर्षांचे अनेक नागरिक मरण पावले. अनेक वर्षे डायबेटीस किंवा उच्च रक्तदाब असलेल्या ७५ व ८० वर्षे वयाच्या रुग्णांचा कोविडने जीव घेतला आहे. 

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंंबरमध्ये अशा नागरिकांच्या बळींची संख्या कमी आहे. मात्र सप्टेंबर व ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारच्या रुग्णांचा जास्त संख्येने बळी गेला आहे.

मृत्यू प्रमाण सातशेच्या दिशेने 

दरम्यान,आतापर्यंत राज्यात ६९० हून अधिक व्यक्तींचे कोविडने बळी घेतले. २२ जून रोजी गोव्यात कोविडचा पहिला बळी नोंद झाला होता. त्यावेळपासून आतापर्यंतचे बळींचेप्रमाण पाहिले तर सातशेचा आकडा गाठण्याच्यादिशेने स्थिती जात आहे हे स्पष्ट होत आहे. मात्र याचबरोबर हेही खरे की, गेल्या सहा महिन्यांत एकूण ४६ हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण आजारातून ठीक झाले.

हजारो ज्येष्ठ नागरिकांनीही कोविडवर यशस्वी मात केली आहे. एकूण ४८ हजार २०० हून जास्त व्यक्तींना गोव्यात कोविडची बाधा झाली. रोज सरासरी दीडशे रुग्ण कोविडवर मात करत आहेत. ९५.७३ टक्के असे आजारातून बरे होण्याचे प्रमाण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा