शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

coronaVirus News: गोव्यात ६० दिवसांत ७० वर्षांवरील १०० रुग्णांचा कोविडने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 12:43 IST

पणजी : गेल्या साठ दिवसांमध्ये ७० वर्षे व त्याहून जास्त वयाच्या एकूण १०० रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे. आरोग्य खात्याकडे नोंद असलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास दि. १ ओक्टोबरपासून १०० दिवसांत ७०, ७५, ८० व ९० वर्षांच्या मिळून १०० व्यक्तींचा जीव गेला हे स्पष्ट होत आहे. ७० वर्षे झालेल्या तसेच वयाची पंचाहत्तरी, एैंशी पार केलेल्या नागरिकांनी कोविड काळात अधिक काळजी घ्यायला हवी हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण जे एकूण सुमारे तीनशे नागरिक गेल्या दोन महिन्यांत मरण पावले, त्यात १०० नागरिक हे ७० ते ८५ या वयोगटातील आहेत. ९० वर्षांचे दोन रुग्ण मरण पावले. ७२ व ७५ वर्षांचे अनेक नागरिक मरण पावले. अनेक वर्षे डायबेटीस किंवा उच्च रक्तदाब असलेल्या ७५ व ८० वर्षे वयाच्या रुग्णांचा कोविडने जीव घेतला आहे.  ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंंबरमध्ये अशा नागरिकांच्या बळींची संख्या कमी आहे. मात्र सप्टेंबर व ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारच्या रुग्णांचा जास्त संख्येने बळी गेला आहे. मृत्यू प्रमाण सातशेच्या दिशेने  दरम्यान,आतापर्यंत राज्यात ६९० हून अधिक व्यक्तींचे कोविडने बळी घेतले. २२ जून रोजी गोव्यात कोविडचा पहिला बळी नोंद झाला होता. त्यावेळपासून आतापर्यंतचे बळींचेप्रमाण पाहिले तर सातशेचा आकडा गाठण्याच्यादिशेने स्थिती जात आहे हे स्पष्ट होत आहे. मात्र याचबरोबर हेही खरे की, गेल्या सहा महिन्यांत एकूण ४६ हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण ...

पणजी : गेल्या साठ दिवसांमध्ये ७० वर्षे व त्याहून जास्त वयाच्या एकूण १०० रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे. आरोग्य खात्याकडे नोंद असलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास दि. १ ओक्टोबरपासून १०० दिवसांत ७०, ७५, ८० व ९० वर्षांच्या मिळून १०० व्यक्तींचा जीव गेला हे स्पष्ट होत आहे.

७० वर्षे झालेल्या तसेच वयाची पंचाहत्तरी, एैंशी पार केलेल्या नागरिकांनी कोविड काळात अधिक काळजी घ्यायला हवी हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण जे एकूण सुमारे तीनशे नागरिक गेल्या दोन महिन्यांत मरण पावले, त्यात १०० नागरिक हे ७० ते ८५ या वयोगटातील आहेत. ९० वर्षांचे दोन रुग्ण मरण पावले. ७२ व ७५ वर्षांचे अनेक नागरिक मरण पावले. अनेक वर्षे डायबेटीस किंवा उच्च रक्तदाब असलेल्या ७५ व ८० वर्षे वयाच्या रुग्णांचा कोविडने जीव घेतला आहे. 

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंंबरमध्ये अशा नागरिकांच्या बळींची संख्या कमी आहे. मात्र सप्टेंबर व ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारच्या रुग्णांचा जास्त संख्येने बळी गेला आहे.

मृत्यू प्रमाण सातशेच्या दिशेने 

दरम्यान,आतापर्यंत राज्यात ६९० हून अधिक व्यक्तींचे कोविडने बळी घेतले. २२ जून रोजी गोव्यात कोविडचा पहिला बळी नोंद झाला होता. त्यावेळपासून आतापर्यंतचे बळींचेप्रमाण पाहिले तर सातशेचा आकडा गाठण्याच्यादिशेने स्थिती जात आहे हे स्पष्ट होत आहे. मात्र याचबरोबर हेही खरे की, गेल्या सहा महिन्यांत एकूण ४६ हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण आजारातून ठीक झाले.

हजारो ज्येष्ठ नागरिकांनीही कोविडवर यशस्वी मात केली आहे. एकूण ४८ हजार २०० हून जास्त व्यक्तींना गोव्यात कोविडची बाधा झाली. रोज सरासरी दीडशे रुग्ण कोविडवर मात करत आहेत. ९५.७३ टक्के असे आजारातून बरे होण्याचे प्रमाण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा