शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
5
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
6
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
8
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
9
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
10
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
11
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
13
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
14
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
15
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
16
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
17
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
18
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
19
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
20
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन

coronaVirus News: गोव्यात ६० दिवसांत ७० वर्षांवरील १०० रुग्णांचा कोविडने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 12:43 IST

पणजी : गेल्या साठ दिवसांमध्ये ७० वर्षे व त्याहून जास्त वयाच्या एकूण १०० रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे. आरोग्य खात्याकडे नोंद असलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास दि. १ ओक्टोबरपासून १०० दिवसांत ७०, ७५, ८० व ९० वर्षांच्या मिळून १०० व्यक्तींचा जीव गेला हे स्पष्ट होत आहे. ७० वर्षे झालेल्या तसेच वयाची पंचाहत्तरी, एैंशी पार केलेल्या नागरिकांनी कोविड काळात अधिक काळजी घ्यायला हवी हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण जे एकूण सुमारे तीनशे नागरिक गेल्या दोन महिन्यांत मरण पावले, त्यात १०० नागरिक हे ७० ते ८५ या वयोगटातील आहेत. ९० वर्षांचे दोन रुग्ण मरण पावले. ७२ व ७५ वर्षांचे अनेक नागरिक मरण पावले. अनेक वर्षे डायबेटीस किंवा उच्च रक्तदाब असलेल्या ७५ व ८० वर्षे वयाच्या रुग्णांचा कोविडने जीव घेतला आहे.  ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंंबरमध्ये अशा नागरिकांच्या बळींची संख्या कमी आहे. मात्र सप्टेंबर व ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारच्या रुग्णांचा जास्त संख्येने बळी गेला आहे. मृत्यू प्रमाण सातशेच्या दिशेने  दरम्यान,आतापर्यंत राज्यात ६९० हून अधिक व्यक्तींचे कोविडने बळी घेतले. २२ जून रोजी गोव्यात कोविडचा पहिला बळी नोंद झाला होता. त्यावेळपासून आतापर्यंतचे बळींचेप्रमाण पाहिले तर सातशेचा आकडा गाठण्याच्यादिशेने स्थिती जात आहे हे स्पष्ट होत आहे. मात्र याचबरोबर हेही खरे की, गेल्या सहा महिन्यांत एकूण ४६ हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण ...

पणजी : गेल्या साठ दिवसांमध्ये ७० वर्षे व त्याहून जास्त वयाच्या एकूण १०० रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे. आरोग्य खात्याकडे नोंद असलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास दि. १ ओक्टोबरपासून १०० दिवसांत ७०, ७५, ८० व ९० वर्षांच्या मिळून १०० व्यक्तींचा जीव गेला हे स्पष्ट होत आहे.

७० वर्षे झालेल्या तसेच वयाची पंचाहत्तरी, एैंशी पार केलेल्या नागरिकांनी कोविड काळात अधिक काळजी घ्यायला हवी हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण जे एकूण सुमारे तीनशे नागरिक गेल्या दोन महिन्यांत मरण पावले, त्यात १०० नागरिक हे ७० ते ८५ या वयोगटातील आहेत. ९० वर्षांचे दोन रुग्ण मरण पावले. ७२ व ७५ वर्षांचे अनेक नागरिक मरण पावले. अनेक वर्षे डायबेटीस किंवा उच्च रक्तदाब असलेल्या ७५ व ८० वर्षे वयाच्या रुग्णांचा कोविडने जीव घेतला आहे. 

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंंबरमध्ये अशा नागरिकांच्या बळींची संख्या कमी आहे. मात्र सप्टेंबर व ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारच्या रुग्णांचा जास्त संख्येने बळी गेला आहे.

मृत्यू प्रमाण सातशेच्या दिशेने 

दरम्यान,आतापर्यंत राज्यात ६९० हून अधिक व्यक्तींचे कोविडने बळी घेतले. २२ जून रोजी गोव्यात कोविडचा पहिला बळी नोंद झाला होता. त्यावेळपासून आतापर्यंतचे बळींचेप्रमाण पाहिले तर सातशेचा आकडा गाठण्याच्यादिशेने स्थिती जात आहे हे स्पष्ट होत आहे. मात्र याचबरोबर हेही खरे की, गेल्या सहा महिन्यांत एकूण ४६ हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण आजारातून ठीक झाले.

हजारो ज्येष्ठ नागरिकांनीही कोविडवर यशस्वी मात केली आहे. एकूण ४८ हजार २०० हून जास्त व्यक्तींना गोव्यात कोविडची बाधा झाली. रोज सरासरी दीडशे रुग्ण कोविडवर मात करत आहेत. ९५.७३ टक्के असे आजारातून बरे होण्याचे प्रमाण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा