शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी ३० पर्यंत मुदत द्या; सरकारची न्यायालयात विनंती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2024 12:56 IST

सर्व कामांचा अहवाल सादर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने आता ३१ मे ची मुदत संपल्यानंतर कामे पूर्ण करण्यासाठी आणखी मुदत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे मागितली आहे.

३० जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण करणार, असे कॉर्पोरेशनने म्हटले आहे. स्मार्ट सिटीची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देऊनही ती पूर्ण करण्यात आलेली नाहीत. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने न्यायालयात आणखी मुदत मागितली आहे. स्मार्ट सिटीची उर्वरित कामे ३० जून पर्यंत पूर्ण केली जातील. तेवढी मुदत द्यावी, असे कॉर्पोरेशनने म्हटले आहे.

कामांची दिली माहिती

दरम्यान, स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने ठराविक मुदतीत स्मार्ट सिटीची काम पूर्ण करू शकलेले नाही. वाढवून दिलेल्या मुदतीतही कामे पूर्ण झालेली नाहीत. दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करू न शकल्याची कबुली कॉर्पोरेशनने न्यायालयाला दिली आहे. सादर केलेल्या अंमलबजावणी अहवालात स्मार्ट सिटीची पूर्ण झालेली कामे आणि अर्धवट राहिलेली कामे याची माहितीही सादर करण्यात आली आहे.

१८ जून रोजी होणार सुनावणी

कॉर्पोरेशनच्या मुदतवाढीच्या मागणीवर १८ जून रोजी सुनावणी होणार आहे. या संबंधीच्या याचिका या १८ जूनला सुनावणीस येणार आहेत. त्यावेळी या याचिकेवरही सुनावणी केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

कंत्राटदार, सल्लागारांवर कारवाई करा : मोन्सेरात

पणजी स्मार्ट सिटीच्या चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामांना काही कंत्राटदार व सल्लागार जबाबदार आहेत. चुकीच्या पद्धतीने स्मार्ट सिटीची कामे केली जात आहेत. चुकीच्या व निकृष्ट पद्धतीने करणाऱ्या कंत्राटदार व सल्लागारांवर कारवाई झाली पाहिजे, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.

ताडमाड येथील गटाराची संरक्षक भिंत कोसळली या घटनेलाही मोन्सेरात यांनी कंत्राटदाराला जबाबदार धरले आहे. स्मार्ट सिटीचे काम हे निकृष्ट दर्जाचे कंत्राटदार करत आहेत. पावसाळा सुरू झाला तरी स्मार्ट सिटीची कामे अजून अपूर्ण स्थितीत आहेत. त्यामुळे ही कामे केव्हापर्यंत पूर्ण होतील? असा प्रश्न बाबूश मोन्सेरात यांना विचारला असता आम्ही वेळ आणि तारीख व्यवस्थापकीय संचालकाच्या सांगण्यावरून देत असल्याचे स्पष्ट केले. शिवाय कामांच्या दर्जाबाबत मी बोलत नाही कारण आता पाऊस आहे आणि काम करताना पाऊस आल्याने कामात कमतरता भासू शकते. तरीही पावसाने पणजी परिसरात थोडी उसंत घेतल्याने दिलासा मिळाला आहे. त्या तुलनेत अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाउस पडत आहे. एकदा काम पूर्ण झाले आणि नंतर काही कोसळले, तर मात्र त्यावर आम्ही नक्की कारवाई करू. स्मार्ट सिटीच्या कामांना उशीर होणे. कामांचा दर्जा खालावला याबाबतची विविध कारणे असतील; परंतु आम्ही प्राथमिक स्तरावर ज्या सल्लागारामुळे कामाला उशीर झाला त्याला काढून टाकले आहे. शिवाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे, असेही मोन्सेरात म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी