शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

मुलाबाळांना घेऊन पळालो!

By admin | Updated: September 1, 2014 02:07 IST

पणजी : पावसाच्या उच्छादामुळे कामराभाट, पीटरभाट येथून रातोरात स्थलांतरित व्हावे लागलेले लोक अजून शाळांच्या छताखालीच आहेत.

पणजी : पावसाच्या उच्छादामुळे कामराभाट, पीटरभाट येथून रातोरात स्थलांतरित व्हावे लागलेले लोक अजून शाळांच्या छताखालीच आहेत. त्यांच्या घरातील पाणी ओसरले आहे; परंतु थरकाप उडविणारी भीती मात्र गेलेली नाही. जोरदार पाऊस पडत होता, असा पाऊस आम्हाला नवीन नसल्यामुळे निश्चिंत झोपलो होतो. समुद्राची एक लाट यावी, असे झोपलेल्या ठिकाणी पाण्याचा हलका प्रवाह अंथरुणावर आला आणि काय घडते आहे, हे कळण्यापूर्वीच घराचे तळे झालेले. आवरा-आवर आणि सावरा-सावर करायलाही वेळ नव्हता. संसार तेथेच टाकून मुलाबाळांना घेऊन घरातून बाहेर पडलो, ही प्रतिक्रिया होती पिटरभाटात राहणाऱ्या परशुराम अनावार यांची. परशुराम यांचे कुटुंब येथील आयडीएल हायस्कूलमध्ये वस्तीला आहे. त्यांच्याबरोबर आणखी किमान ६० कुटुंबे येथे राहात आहेत. रामा खोलकर यांनी सांगितलेला प्रसंग असाच शहारे आणणारा. अचानक आलेल्या पाण्यामुळे कुठे पूर आला की काय झाले हे त्यांना समजले नव्हते आणि विचार करायलाही वेळ नव्हता. कुटुंबीयांना घेऊन घराबाहेर पळणे एवढाच पर्याय त्यांच्याजवळ होता, असे ते म्हणाले. घरातील धान्य नष्ट झाल्याचे ते म्हणाले. याच वस्तीत राहणारे अशोक हुनचिलेटी म्हणाले की, आपला जन्मच पिटरभाटमध्ये झाला. असा प्रसंग कधीच आला नव्हता. पावसात पूर येईल आणि तो घरात येईल, अशी कधी कल्पनाही केली नव्हती. बाउला खोलकर या महिलेने तर आता पुन्हा असे घडू नये, असे म्हणत देवाला साकडेच घातले. आता घरातील पाणी ओसरले आहे; पण राहायला जाण्यासारखी स्थिती नाही. साचलेला गाळ काढणे, सफाई करणे, जमीन सुकणे या गोष्टी केव्हा होतील तेव्हाच घरे राहण्यालायक होतील. परंतु घरात परत केव्हा जाणार, असे विचारले असता प्रवीण गिरप यांनी सोमवारी जाणार, असे सांगितले. जी गोष्ट पीटरभाटची तीच गोष्ट कामराभाटमधील लोकांची. येथील लोकांनी कामराभाट येथील सरकारी विद्यालयाच्या इमारतीचा आसरा घेतला आहे. (प्रतिनिधी)