शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात 'जी २० ' च्या २०'च्या बैठका झाल्या यशस्वी; आता पाकिस्तानचे पथक दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 10:30 IST

पाकिस्तानचे शिष्टमंडळ या परिषदेच्या बैठकीसाठी मे महिन्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यात 'जी २०' शिखर परिषदेच्या बैठका यशस्वीरीत्या पार पडल्या. या बैठकांमध्ये आरोग्य क्षेत्रावर विशेष चर्चा झाली, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पाकिस्तानचे शिष्टमंडळ या परिषदेच्या बैठकीसाठी मे महिन्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी ही परिषदेसाठी नेमलेली समिती करीत आहे. गोवा सरकार त्यात केवळ जागा ठरवणे व अन्य तयारीत सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, 'जी २०' शिखर परिषदेची पहिली बैठक १७ ते २० एप्रिलदरम्यान गोव्यात पार पडली. यानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, तसेच काही आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी गोव्याला भेट दिली होती. या बैठकीत आरोग्य क्षेत्रातील विविध बदल, तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रातील डिजिटल क्रांती यावर चर्चा झाली. पोलिओ समूळ नष्ट करणे, कोरोना आदी विषयांवरही चर्चा झाली. सदर बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकांसाठी आलेल्या प्रतिनिधींसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोवा हे शिक्षण, आरोग्यप्रमाणेच आता सांस्कृतिक पर्यटनाच्या दिशेनेही पावले टाकत आहे. गोव्यात जी-२० शिखर परिषदेच्या बैठका यशस्वीरीत्या पार पडल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

ई-रिक्षाला हिरवा झेंडा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते २४ रोजी सेवा, सुशासन, जनकल्याण'चा भाग म्हणून पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षाला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींचा प्रवास सुलभ करण्यासाठी राज्य दिव्यांगजन आयोग व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षा सेवा सुरु करत आहे. व्हीलचेअर टॅक्सी सेवांमध्ये अग्रणी असलेल्या ईजी मूव द्वारे हे व्यवस्थापित केले जाईल.

अशी असेल रिक्षा

कामाच्या ठिकाणी, रुग्णालये, शाळा आणि इतर ठिकाणी प्रवास करताना व्हीलचेअर वापरणाऱ्यांांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी आयोग ही सेवा सुरु करत असल्याची माहिती राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिली. या वाहनात दोन सदस्य दिव्यांग प्रवाशासोबत जाऊ शकतात. या रिक्षामध्ये चढताना रिक्षाचा मागचा दरवाजा रॅम्पमध्ये रूपांतरीत होतो. याशिवाय, सुरक्षिततेला अत्यंत महत्त्व दिले असून व्हीलचेअरसाठी चारही बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पावसकर यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत