शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

पूर्ण दारूबंदीमुळे प्रश्न सुटत नसतात

By admin | Updated: January 31, 2015 02:32 IST

पोपटराव पवार : व्यसनांविषयी शालेय स्तरापासून प्रबोधनाची गरज

पणजी : पूर्ण दारूबंदी केल्यामुळे प्रश्न सुटत नसतात, त्याऐवजी नियंत्रण महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केले. ते रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट परिषदेच्या निमित्ताने येथे आले होते. हिवरेबाजार (जि. अहमदनगर, महाराष्ट्र) येथे जलसंवर्धन आणि अन्य विकासकामांमुळे पोपटराव पवार यांचे नाव सामाजिक क्षेत्रात सर्वदूर झालेले आहे. येथे कला अकादमीत त्यांनी ‘रोटरीशिवाय जग’ या विषयावर रोटरियन्सना मार्गदर्शन केले. गोवा आणि दारू याविषयी जगभर निश्चित काही प्रतिमा आहे. गोवा म्हणजे मौजमजा, असे समीकरणही झालेले आहे. या पर्यटन राज्याची ती ओळख आहे. पोपटराव पवार यांनी व्यसनमुक्तीसाठीही काम केलेले आहे. त्यामुळे दारू या विषयावर त्यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्र असो नाहीतर गोवा, आपल्याकडे देशातच दारू पिण्याचे प्रमाण आणि पध्दत अयोग्य असल्याचा त्यांच्या बोलण्याचा सूर जाणवला. युरोपीयन देशांत सर्व कुटुंब एकत्र बसून दारू पितात. युरोपीयन देशामध्ये दारू कशी प्यावी, हे शिकवले जाते. आपणही तसे शिकवावे असे नव्हे, असे पवार यांनी स्पष्ट केले. अन्य देश आणि आपणात सर्व प्रकारचे मोठे अंतर असल्याचेही त्यांनी नमूद केले. आनंद झाला म्हणून दारू प्यायची, मग नोकरी मिळाली यासारखी कारणेही पुरेशी ठरतात. दु:ख झाले म्हणून दारू पिली जाते. दोन्हीही बाबी अयोग्य आहेत. नानाविध कारणांमुळे विषादाचे (त्यांचा शब्द डिप्रेशन) प्रमाण वाढल्यामुळेही लोक व्यसनाच्या आहारी जातात, असे त्यांनी स्पष्ट केले. शालेय स्तरावर व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगायला पाहिजेत. तसे हिवरेबाजार या गावात आम्ही समाजावून सांगतो, अशी माहिती त्यांनी दिली. प्रबोधन करणे हा उत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले. शालेय मुलांना, तरुणांना काही वर्षांपूर्वी शाळा, व्यायामशाळा, क्रीडांगणे, मनोरंजनाची सशक्त साधने यांसारखे खूप पर्याय होते. त्यामुळे या अन्य क्षेत्रांमध्ये तरुणाई गुंतली जात होती. मात्र, आता अनेक ठिकाणचे चित्र बदलले आहे. अनेक औषधांमध्येही दारूचा वापर केलेला असतो, त्यामुळे पूर्ण दारूबंदीपेक्षा नियंत्रण महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पूर्ण दारूबंदीने प्रश्न सुटत नसतात, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. (विशेष प्रतिनिधी)