शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

म्हापसा अर्बनच्या पूर्ण संचालक मंडळाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 20:18 IST

गेले अनेक दिवस प्रचंड चर्चेत असलेल्या आणि भारतीय रिझव्र्ह बँकेने (आरबीआय) घातलेल्या कडक र्निबधांमुळे मेटाकुटीला आलेल्या म्हापसा अर्बन बँकेवरील पूर्ण संचालक मंडळाने राजीनामा देण्याचा निर्णय मंगळवारी एकमताने घेतला व तसे जाहीरही केले.

पणजी - गेले अनेक दिवस प्रचंड चर्चेत असलेल्या आणि भारतीय रिझव्र्ह बँकेने (आरबीआय) घातलेल्या कडक र्निबधांमुळे मेटाकुटीला आलेल्या म्हापसा अर्बन बँकेवरील पूर्ण संचालक मंडळाने राजीनामा देण्याचा निर्णय मंगळवारी एकमताने घेतला व तसे जाहीरही केले. गुरुदास नाटेकर यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाने आपण राजीनामा देत असल्याचे म्हापसा अर्बन बँकेच्या कर्मचारी वर्गालाही सांगितले. जोर्पयत राजीनामा केंद्रीय सहकार निबंधकांकडून स्वीकारला जात नाही, तोर्पयत हे संचालक मंडळ प्रभारी म्हणून बँकेत राहील.

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप हे या बँकेवर अनेक वर्षे चेअरमन म्हणून होते. सध्या नाटेकर यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळ म्हापसा अर्बनचे व्यवस्थापकीय काम पाहत होते. खलप हेही या बँकेवर संचालक म्हणून होते. खलप यांच्या पुत्रने बँकेवर निवडून आल्यानंतर लगेच काही महिन्यांनी राजीनामा दिला होता. म्हापसा अर्बन बँकेची स्थिती सुधारावी म्हणून गोवा सरकारने थोडी मदत करावी व आरबीआयने काही नियम शिथिल करावेत अशी मागणी बँकेकडून सातत्याने केली जात होती. बँकेच्या खात्यामध्ये हजारो खातेधारकांचे व ठेवीदारांचे पैसे आहेत. तथापि, खात्यामधून फक्त एक हजार रुपयेच काढता येतील अशी अट प्रत्येक खातेधारकाला आरबीआयकडून लागू केली गेल्यानंतर खळबळ उडाली. गेल्या आठवडय़ापासूनच या र्निबधाची अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे शिक्षक, व्यापारी व अन्य बरेच घटक आपले पैसे बँकेतून काढू शकलेले नाहीत. सगळीकडे अस्वस्थता असून काही भागधारक संचालक मंडळाला दोष देऊन राजीनाम्याची मागणी करत होते.

म्हापसा अर्बनच्या संचालक मंडळाची मंगळवारी सायंकाळी बैठक झाली. आम्ही राजीनामा दिल्याचे व उद्या तसे केंद्रीय सहकार निबंधकांना पत्रद्वारे कळविणार असल्याचे चेअरमन नाटेकर यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. सर्वानुमते राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. सरकार आता स्वत:च्या मर्जीतील प्रशासक या बँकेवर नेमू शकतील. तथापि, सहकार निबंधकांनी राजीनामा स्वीकारल्यानंतरच पुढील सोपस्कार सरकार पार पाडू शकेल. 

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या