शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

सरकारकडून फसवणूक

By admin | Updated: February 21, 2015 02:19 IST

बार्देस : सुरक्षा रक्षकांची भाजप सरकारने आतापर्यंत फसवणूकच केल्याचा आरोप कामगार नेते अ‍ॅड. अजितसिंग राणे आणि स्वाती केरकर यांनी

बार्देस : सुरक्षा रक्षकांची भाजप सरकारने आतापर्यंत फसवणूकच केल्याचा आरोप कामगार नेते अ‍ॅड. अजितसिंग राणे आणि स्वाती केरकर यांनी शुक्रवारी येथे केला. निवडणुकीसाठी सुरक्षा रक्षकांना वापरल्याचा आरोपही त्यांनी केला. सकाळी ११.३० वा. श्री बोडगेश्वर मंदिराकडून हुतात्मा चौकाला वळसा घेऊन टॅक्सी स्थानकावर सुमारे ३५० सुरक्षा रक्षकांनी मोर्चा काढून सभा घेतली. या वेळी राणे व केरकर यांनी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. राणे यांनी सांगितले, की पूर्वी भाजपचे सरकार काही वर्षे होते. त्या वेळी आरोग्यमंत्री सुरेश आमोणकर यांनी लोकल भरती व रोजगार सोसायटी या नावे एक सोसायटी स्थापन केली होती आणि त्या वेळी सुरक्षा रक्षकांना कायम करण्याचे आश्वासन दिले होते; पण १४ ते १५ वर्षे झाली तरी त्यावर काहीच केले नाही. त्यांना फक्त राबवून घेतले. त्यानंतर गोवा मनुष्यबळ विकास महामंडळ सरकारने स्थापन केले; पण त्यातूनही कामगार वर्गाचा फायदा झाला नाही. भाजप सरकारने फक्त यातून लोकांच्या तिजोरीतून आपली मतपेटी तयार केली आणि इतर लोकांबरोबरच युवा-युवतींची फसवणूक केली आणि त्यांना नोकरी कायम करण्याचे आश्वासन देऊन निवडणुकीवेळी फक्त त्यांची मते घेतली आणि दिलेली आश्वासने विसरले. या वेळी काँग्रेस पक्षाचे म्हापसा गटाध्यक्ष विजय भिकेही उपस्थित होते. त्यांनी त्यांना आपला पाठिंबा दिला. सभेनंतर या सर्वांनी म्हापसा शहरात रॅली काढून सह्यांची मोहीम सुरू केली. त्या वेळी त्यांनी ५ हजार सह्यांचे टारगेट होते ते ७५०० एवढे झाले. तसेच सरकारचा पैसा या आंदोलनासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी आर्थिक मदतीसाठीही लोकांकडे फंडपेटी फिरविली, त्यास त्यांना चांगला प्रतिसाद लाभला. (प्रतिनिधी)