शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

सरकारकडून फसवणूक

By admin | Updated: February 21, 2015 02:19 IST

बार्देस : सुरक्षा रक्षकांची भाजप सरकारने आतापर्यंत फसवणूकच केल्याचा आरोप कामगार नेते अ‍ॅड. अजितसिंग राणे आणि स्वाती केरकर यांनी

बार्देस : सुरक्षा रक्षकांची भाजप सरकारने आतापर्यंत फसवणूकच केल्याचा आरोप कामगार नेते अ‍ॅड. अजितसिंग राणे आणि स्वाती केरकर यांनी शुक्रवारी येथे केला. निवडणुकीसाठी सुरक्षा रक्षकांना वापरल्याचा आरोपही त्यांनी केला. सकाळी ११.३० वा. श्री बोडगेश्वर मंदिराकडून हुतात्मा चौकाला वळसा घेऊन टॅक्सी स्थानकावर सुमारे ३५० सुरक्षा रक्षकांनी मोर्चा काढून सभा घेतली. या वेळी राणे व केरकर यांनी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. राणे यांनी सांगितले, की पूर्वी भाजपचे सरकार काही वर्षे होते. त्या वेळी आरोग्यमंत्री सुरेश आमोणकर यांनी लोकल भरती व रोजगार सोसायटी या नावे एक सोसायटी स्थापन केली होती आणि त्या वेळी सुरक्षा रक्षकांना कायम करण्याचे आश्वासन दिले होते; पण १४ ते १५ वर्षे झाली तरी त्यावर काहीच केले नाही. त्यांना फक्त राबवून घेतले. त्यानंतर गोवा मनुष्यबळ विकास महामंडळ सरकारने स्थापन केले; पण त्यातूनही कामगार वर्गाचा फायदा झाला नाही. भाजप सरकारने फक्त यातून लोकांच्या तिजोरीतून आपली मतपेटी तयार केली आणि इतर लोकांबरोबरच युवा-युवतींची फसवणूक केली आणि त्यांना नोकरी कायम करण्याचे आश्वासन देऊन निवडणुकीवेळी फक्त त्यांची मते घेतली आणि दिलेली आश्वासने विसरले. या वेळी काँग्रेस पक्षाचे म्हापसा गटाध्यक्ष विजय भिकेही उपस्थित होते. त्यांनी त्यांना आपला पाठिंबा दिला. सभेनंतर या सर्वांनी म्हापसा शहरात रॅली काढून सह्यांची मोहीम सुरू केली. त्या वेळी त्यांनी ५ हजार सह्यांचे टारगेट होते ते ७५०० एवढे झाले. तसेच सरकारचा पैसा या आंदोलनासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी आर्थिक मदतीसाठीही लोकांकडे फंडपेटी फिरविली, त्यास त्यांना चांगला प्रतिसाद लाभला. (प्रतिनिधी)