शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

चार हजार कामगार रस्त्यावर; विविध मागण्यांसाठी रॅली, सरकारविरोधात घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 12:39 IST

कामगारविरोधी सरकारच्या धोरणाचा निषेध करत आपल्या विविध मागण्यांबाबत कामगारांनी घोषणा दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: वेगवेगळे कारखाने,  व्यावसायिक आस्थापने, शिपयार्ड, खाणींवरील तसेच बंदर कामगार मिळून ४ हजार कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल, सोमवारी कामगार दिनी शहरात रॅली काढली. यावेळी कामगारविरोधी सरकारच्या धोरणाचा निषेध करत आपल्या विविध मागण्यांबाबत कामगारांनी घोषणा दिल्या.

येथील कदंब बसस्थानकाकडून निघालेली रॅली शहरात फिरून आझाद मैदानावर आली व तेथे जाहीर सभेत रूपांतर झाले. महिला कामगारांनीही या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित लावली. आझाद मैदानावरील जाहीर सभेत आयटकचे प्रदेश सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका, अॅड. सुहास नाईक व प्रसन्न उटगी यांची भाषणे झाली.

किमान वेतनात वाढ करण्याच्या मागणीबरोबरच अन्य मागण्यांचा ठराव संमत करण्यात आला. अकुशल कामगारांना दिवशी ७५० रुपये, निमकुशल कामगारांना दिवशी ८२५ रुपये, कुशल कामगारांना दिवशी ९१० रुपये व अति कुशल कामगारांना दिवशी १,००० रुपये किमान वेतन दिले जावे, अशी मागणी करण्यात आली.

खाण व्यवसाय त्वरित सुरू करा, बांधकाम खात्यात पीडब्ल्यूडी लेबर सप्लाय सोसायटीअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित करा, त्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, पूर्व प्राथमिक हेल्परना किमान दहा हजार रुपये वेतन द्या, वीज खात्यातील ३८० लाइन हेल्पर्सना सेवेत कायम करा, अंगणवाडी सेविकांचे वेतन वाढवा, वेर्णा येथील फार्म उद्योगांतील काही जणांचे केलेले निलंबन, सेवा बडतर्फी तसेच बदल्या मागे घ्या, संजीवनी सहकारी साखर कारखान्यातील ३२ कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा, कॅसिनोंवरील कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवा, आदी मागण्या करण्यात आल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवा