शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेते तुपाशी, जनता मात्र उपाशी; आमदार, मंत्र्यांचे भत्ते, पेन्शनवाढीबाबत माजी आमदारही नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 13:24 IST

काही माजी आमदारांनीसुद्धा या भरघोस वाढीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : विधानसभा अधिवेशनात सरकारने मंत्री, आमदारांचे विविध भत्ते, पेन्शनमध्ये भरघोस वाढ केली आहे. पेन्शनची रक्कम तर ज्येष्ठतेनुसार ७५ हजारांहून २ लाख रुपये केली. त्यामुळे जनता उपाशी, नेते तुपाशी अशी टीका लोकांकडून केली जात आहे. काही माजी आमदारांनीसुद्धा या भरघोस वाढीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना एलपीजी सिलिंडर १२०० रुपयांना मिळतो. टोमॅटो १२० रुपये प्रती किलोने घ्यावे लागत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीने जनता हैराण आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारच्या विविध खात्यांमध्ये आजही अनेक कामगार अनेक वर्षांपासून अल्प पगारावर कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. शिक्षक सेवेत कायम करावे म्हणून आंदोलने करीत आहेत.

दुसरीकडे मंत्री, आमदारांच्या भत्ते, पेन्शनमध्ये वाढ केल्याने जनतेमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गोव्याच्या राजकारणात आजही अनेक असे माजी आमदार आहेत, जे खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या स्थिर आहेत. राजकारणापासून अनेक वर्ष दूर असून त्यांनी स्वतःचा व्यवसाय, शेती यात ते गुंतलेले आहेत. काहीजण कन्स्ट्रक्शन व्यवसायही आहेत. भत्ता, पेन्शनमध्ये वाढीची मागणी काही आमदारांनी वारंवार केली. यामुळे सरकारी तिजोरीवर १९ कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. राजकारण्यांना खरेच इतके भत्ते, पेन्शनची गरज आहे का? असा सवाल लोक सोशल मीडियातून करीत आहेत.

इतकी वाढ गरजेची नव्हती

सरकारने आमदार, मंत्र्यांचा भत्ता, पेन्शनमध्ये भरघोस वाढ केली; मात्र खरेच इतक्या वाढीची गरज नव्हती. ही वाढ दुप्पट आहे. आपली कामे व्हावीत, भले व्हावे यासाठी जनता आमदारांना निवडून आणते; मात्र ते जर स्वतःचेच भले करीत असतील तर जनतेकडून टीका होणारच. दुसया राज्यात गेल्यास हॉटेल शुल्कातही वाढ केली आहे. खरेतर त्या-त्या राज्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये आमदार थांबू शकतात. खरेतर आमदार होण्यापूर्वी व झाल्यानंतर त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे, याचा अहवाल तयार व्हायला हवा. - अॅड. रमाकांत खलप, माजी केंद्रीय कायदा मंत्री.

...ही तर उधळपट्टीच

सामान्य जनतेच्या आणि शेती, शिक्षण क्षेत्राच्या गरजा सरकारने अगोदर लक्षात घेणे अपेक्षित आहे. शिक्षण क्षेत्रात, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत; मात्र तसे झालेले नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला उत्पादनाला आधारभूत किंमत मिळत नाही. लोकांना पगार वेळेत मिळत नाहीत. अनेक कामगार १५ ते २० वर्षे काम करूनही सेवेत कायम झाले नाहीत. त्यामुळे मंत्री आमदाराच्या भत्ता, पेन्शनमध्ये एवढी वाढ करायला हवी होती का? असा प्रश्न आहे. ही एक प्रकारे उधळपट्टीच आहे. जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष करुन ही वाढ केली आहे. - लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री.

 

टॅग्स :goaगोवा