शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नेते तुपाशी, जनता मात्र उपाशी; आमदार, मंत्र्यांचे भत्ते, पेन्शनवाढीबाबत माजी आमदारही नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 13:24 IST

काही माजी आमदारांनीसुद्धा या भरघोस वाढीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : विधानसभा अधिवेशनात सरकारने मंत्री, आमदारांचे विविध भत्ते, पेन्शनमध्ये भरघोस वाढ केली आहे. पेन्शनची रक्कम तर ज्येष्ठतेनुसार ७५ हजारांहून २ लाख रुपये केली. त्यामुळे जनता उपाशी, नेते तुपाशी अशी टीका लोकांकडून केली जात आहे. काही माजी आमदारांनीसुद्धा या भरघोस वाढीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना एलपीजी सिलिंडर १२०० रुपयांना मिळतो. टोमॅटो १२० रुपये प्रती किलोने घ्यावे लागत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीने जनता हैराण आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारच्या विविध खात्यांमध्ये आजही अनेक कामगार अनेक वर्षांपासून अल्प पगारावर कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. शिक्षक सेवेत कायम करावे म्हणून आंदोलने करीत आहेत.

दुसरीकडे मंत्री, आमदारांच्या भत्ते, पेन्शनमध्ये वाढ केल्याने जनतेमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गोव्याच्या राजकारणात आजही अनेक असे माजी आमदार आहेत, जे खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या स्थिर आहेत. राजकारणापासून अनेक वर्ष दूर असून त्यांनी स्वतःचा व्यवसाय, शेती यात ते गुंतलेले आहेत. काहीजण कन्स्ट्रक्शन व्यवसायही आहेत. भत्ता, पेन्शनमध्ये वाढीची मागणी काही आमदारांनी वारंवार केली. यामुळे सरकारी तिजोरीवर १९ कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. राजकारण्यांना खरेच इतके भत्ते, पेन्शनची गरज आहे का? असा सवाल लोक सोशल मीडियातून करीत आहेत.

इतकी वाढ गरजेची नव्हती

सरकारने आमदार, मंत्र्यांचा भत्ता, पेन्शनमध्ये भरघोस वाढ केली; मात्र खरेच इतक्या वाढीची गरज नव्हती. ही वाढ दुप्पट आहे. आपली कामे व्हावीत, भले व्हावे यासाठी जनता आमदारांना निवडून आणते; मात्र ते जर स्वतःचेच भले करीत असतील तर जनतेकडून टीका होणारच. दुसया राज्यात गेल्यास हॉटेल शुल्कातही वाढ केली आहे. खरेतर त्या-त्या राज्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये आमदार थांबू शकतात. खरेतर आमदार होण्यापूर्वी व झाल्यानंतर त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे, याचा अहवाल तयार व्हायला हवा. - अॅड. रमाकांत खलप, माजी केंद्रीय कायदा मंत्री.

...ही तर उधळपट्टीच

सामान्य जनतेच्या आणि शेती, शिक्षण क्षेत्राच्या गरजा सरकारने अगोदर लक्षात घेणे अपेक्षित आहे. शिक्षण क्षेत्रात, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत; मात्र तसे झालेले नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला उत्पादनाला आधारभूत किंमत मिळत नाही. लोकांना पगार वेळेत मिळत नाहीत. अनेक कामगार १५ ते २० वर्षे काम करूनही सेवेत कायम झाले नाहीत. त्यामुळे मंत्री आमदाराच्या भत्ता, पेन्शनमध्ये एवढी वाढ करायला हवी होती का? असा प्रश्न आहे. ही एक प्रकारे उधळपट्टीच आहे. जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष करुन ही वाढ केली आहे. - लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री.

 

टॅग्स :goaगोवा