शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Formalin In Fish : गोव्यात मासळी आयातीवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 14:26 IST

गोवा सरकारने पुढील पंधरा दिवसांसाठी इतर राज्यांमधून होणाऱ्या मासळी आयातीवर बंदी घातली आहे.

पणजी :  गोवा सरकारने पुढील पंधरा दिवसांसाठी इतर राज्यांमधून होणाऱ्या मासळी आयातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पुढील 15 दिवस गोव्यातील खवय्ये तसेच येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना मासळीपासून वंचित राहावे लागणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ तसेच अन्य मासळी राज्यांमधून आयात केलेल्या मासळीत फॉर्मेलिन हे घातक रसायन आढळल्यानं गेले काही दिवस राज्यात खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशचे 17 ट्रक जप्त करून मासळी ताब्यात घेतली आणि चाचणी केली असता काही प्रमाणात फॉर्मेलिन सापडले होते. परंतु व औषध प्रशासनाने त्याच दिवशी सायंकाळी आपला अहवाल बदलून फॉर्मेलिन मर्यादित स्वरूपात असल्याचे जाहीर केले होते. परंतु गोव्यातील लोकांनी मासळी खरेदीची एवढी धास्ती घेतली होती की गेले आठ दिवस मासे बाजार ओस पडले होते. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज आयात बंदीचा निर्णय जाहीर करताना फळे तसेच आयात होणाऱ्या भाज्या प्रशासनाच्या स्कॅनरखाली असतील, कृत्रिमरित्या पिकविलेली फळे तसेच भाज्या  घेऊन येणारे ट्रक तपासले जातील, असेही सांगितले. आंध्र प्रदेश, केरळ व अन्य राज्यांमधून रोज सुमारे 200 टन मासळी गोव्याच्या बाजारपेठेत येते. गोव्यात सध्या पावसाळ्यात मासेमारी बंदी असून 1 ऑगस्टला ती उठणार आहे. त्यानंतर गोव्याचे ट्रॉलर्स समुद्रात जाऊन मासेमारी करू शकतात त्यामुळे स्थानिक मासे उपलब्ध होणार असून आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही असे पर्रीकर म्हणाले.

 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाfishermanमच्छीमार