शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

गोव्यातील एनजीओंना विदेशी निधी, भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 19:27 IST

पणजी : गोव्यातील काही एनजीओंना विदेशातून निधी मिळत आहे.

पणजी : गोव्यातील काही एनजीओंना विदेशातून निधी मिळत आहे. त्या एनजीओ गोव्यात आणि विशेषत: सासष्टीत कोणताच प्रकल्प येऊ देत नाहीत, असा आरोप भाजपचे माजी आमदार सुभाष फळदेसाई व प्रवक्ते प्रेमानंद म्हांब्रे यांनी येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केला.फळदेसाई म्हणाले, की कोळसा हाताळणी, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, शैक्षणिक वसाहत तसेच आयआयटी वगैरे सर्वच प्रकल्पांना काही एनजीओ विरोध करतात. सासष्टीमध्ये तर काहीजणांना कोणताच प्रकल्प नको. सांगेतील लोकांनी साळावली धरण प्रकल्पासाठी त्याग केला व त्यामुळे सासष्टी, केपे, मुरगाव अशा तालुक्यांना पिण्याचे पाणी मिळते. सांगे तालुक्यातील अनेक पंचायतींना मात्र अजून पाण्याचा पुरवठाच होत नाही. आम्ही या कामाचा सरकारकडे पाठपुरावा करत आहोत.फळदेसाई म्हणाले, की साळावली धरणाशीसंबंधित पुनर्वसनग्रस्तांना नळाद्वारे अजून पाण्याचा थेंब देखील मिळत नाही. त्यामुळेच आयआयटीसारख्या प्रकल्पाला सांगेतील लोकही विरोध करतात. आयआयटीसाठी आम्ही का म्हणून त्याग करावा असा प्रश्न सांगेतील लोक करत आहेत. अगोदर आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवा, मग आयआयटी आणा, असे सांगेतील लोक म्हणतात. आपण आयआयटी प्रकल्पाचे स्वागत करतो, कारण देशाच्या शैक्षणिक नकाशावर त्यामुळे गोव्याचे नाव होईल. मात्र त्याचबरोबर सरकारने सांगेवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. सांगेत शेती व जलसिंचनासाठी देखील पाणी मिळत नाही.फळदेसाई म्हणाले, की सांगेतील लोकांनी त्याग केला म्हणून साळावली धरण साकारले व त्याद्वारे सासष्टीला पाणी मिळते. जोपर्यंत सांगे तालुक्यातील प्रत्येक पंचायत क्षेत्रात पिण्याचे पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत सरकारने साळावलीमधून सासष्टी व अन्य तालुक्यांना पाणी सोडू नये, अशी मागणी सांगेतील युवक करत आहेत.येत्या दोन महिन्यांत सरकारने सांगेतील पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवावा, अन्यथा साळावलीतून अन्य तालुक्यांना पाणी सोडू नये. सासष्टीतील ट्रकवाल्यांची दादागिरीही आम्ही खपवून घेणार नाही. फळदेसाई म्हणाले, की गोव्यातील काही लोकांना वीज हवी पण कोळसा नको. हातात तीन मोबाईल फोन हवे पण मोबाईल टॉवर नको. राहण्यासाठी घर हवे पण गृहनिर्माण वसाहत नको. विकास प्रकल्पांच्या मार्गामध्ये काही एनजीओ अडथळाच आणण्याचे काम करत आहेत.

टॅग्स :goaगोवा