शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

हरित ऊर्जा राज्य बनवण्याकडे लक्ष; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2024 11:52 IST

'अमेझिंग गोवा जागतिक व्यवसाय'चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या व्हिजनला पुढे नेण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहोत. गोवा हे गुंतवणुकीसाठी आणि उद्योगांसाठी भरभराटीचे केंद्र बनत आहे. गोव्याला हरित ऊर्जा राज्य बनवण्यासाठी आमचे सरकार स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. 'व्हायब्रेड गोवा फाउंडेशन'तर्फे श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित केलेल्या 'अमेझिंग गोवा जागतिक व्यावसाय परिषद' या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते.

व्यासपीठांवर वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योजक श्रीनिवास धेंपो, व्हायब्रेट गोवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार कामत, अमेझिंग गोवा जागतिक व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विनय वर्मा, फाउंडेशनचे उपाध्यक्ष मनोज पाटील, अरमान बंक्ले आणि रसिक नाईक उपस्थित होते. परिषदेला देश विदेशातील उद्योजकांनी सहभाग घेतला असून यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार प्रक्रिया सुलभ करणारी धोरणे राबवून व्यवसायासाठी अनुकूल वातावरण विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे. पर्यटन हे उदयोन्मुख उद्योगांचे केंद्र बनणार आहे. सौर, पवन आणि जैवऊर्जा अशा स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांवर आमचे सरकार लक्ष केंद्रित करत आहे.

गुंतवणूकदारांना आमच्या प्रवासात हरित ऊर्जेचा टप्पा बनण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. राज्य सरकार पर्यावरणपूरक प्रकल्प आणून उद्योजकाला चालना देण्याचे काम करत आहे. राज्यात औद्योगिक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. अनेक कंपन्या राज्यात गुंतवणूक करण्यात इच्छुक आहेत.

पर्यटनाबरोबर राज्यात आयुर्वेद तसेच मोर्डने आरोग्य क्षेत्रात प्रगती झाली आहे. जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्था राज्यात आल्या आहेत. उद्योगाबरोबर शिक्षण तसेच क्रीडा क्षेत्रावरही सरकारने भर दिली आहे.

आत्मनिर्भर भारताच्या प्रवासाला गती मिळेल: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला. त्यात त्यांनी व्यवसाय आणि पर्यटनाचे केंद्र म्हणून गोव्याचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले. ही परिषद उद्योजक, एमएसएमई आणि उद्योगातील नेत्यांसाठी सहकार्य, नावीन्यपूर्ण आणि जागतिक संधीचा फायदा घेण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ आहे. शिखर परिषद अधिक समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आमच्या सामूहिक प्रवासाला गती देईल. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री सावंत यांसारख्या व्यक्तींकडून मजबूत नेतृत्व आणि निर्णायक सरकार असलेल्या १.४ अब्ज महत्त्वाकांक्षी व्यक्त्ती चांगल्या दर्जाचे जीवन शोधतात, ज्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी निर्माण होते, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत