शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

उत्तर गोव्याला पुराचा मोठा फटका, शेतीची हानी, 45 कुटुंबांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 18:31 IST

तिळारी धरणासह अन्य ठिकाणचेही पाणी सोडावे लागल्याने उत्तर गोव्यातील तीन तालुक्यांना जास्त फटका बसला.

पणजी - तिळारी धरणासह अन्य ठिकाणचेही पाणी सोडावे लागल्याने उत्तर गोव्यातील तीन तालुक्यांना जास्त फटका बसला. बार्देश, डिचोली व पेडणो तालुक्यातील एकूण 45 कुटूंबांचे तातडीने अन्यत्र स्थलांतर करावे लागले. पाण्याची पातळी सायंकाळीही कमी झालेली नाही. उत्तर गोव्यात शेतीची मोठी हानी झाली आहे.बार्देशचे जुवे बेट, पेडणोतील बैलापूर तसेच डिचोलीतील साळ वगैरे भागातील लोकांच्या घरांमध्ये पाणी  घुसले. लोकांचे खूप हाल झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अशा घरांना गुरुवारी सकाळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाबाहेर पत्रकारांना माहिती दिली. आपण रात्री दीड-दोन वाजेर्पयत विविध शासकीय यंत्रणांच्या संपर्कात होतो. काही आमदारांच्याही संपर्कात होतो. स्थितीवर सरकारचे लक्ष आहे. मदतकार्य सुरू झाले आहे. तीन तालुक्यांमध्ये शेतीचीही मोठी हानी झाली आहे पण मनुष्यहानी झाली नाही. सरकारी यंत्रणांनी तीन तालुक्यांमधील 4क् ते 45 कुटुबांचे अन्यत्र स्थलांतर केले. त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्थाही करून घेण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. सिंधुदुर्गमध्ये  खूप पाऊस पडत असल्याने तिळारी धरणातील पाणी तेथील यंत्रणांनी सोडले.त्यांच्यासमोरही अन्य पर्याय नव्हता, असे मुख्यमंत्री  म्हणाले. सर्वाधिक फटका राणोंच्या जुवे बेटावरील लोकांना बसला. तिथे पंचवीस घरे असून त्या सर्व घरांमध्ये पाणी गेले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, तिसवाडी तालुक्यातील करंजाळे एक इसम त्याच्या वाहनासह जांबोटी येथे प्रवास करताना वाहून गेल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. 

टॅग्स :goaगोवाfloodपूर