शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सीआरझेड अधिसूचनेविरोधात गोव्यातील मच्छीमार एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 13:42 IST

नव्या सीआरझेड अधिसूचनेला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय मच्छीमार महासंघाने पुकारलेल्या महिनाभराच्या आंदोलनाचा भाग म्हणून गोव्यातील मच्छीमारांनीही येत्या २३ रोजी मडगाव येथील लोहिया मैदानावर मोठ्या संख्येने जमून निदर्शने करण्याचे ठरविले आहे.

पणजी : नव्या सीआरझेड अधिसूचनेला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय मच्छीमार महासंघाने पुकारलेल्या महिनाभराच्या आंदोलनाचा भाग म्हणून गोव्यातील मच्छीमारांनीही येत्या २३ रोजी मडगाव येथील लोहिया मैदानावर मोठ्या संख्येने जमून निदर्शने करण्याचे ठरविले आहे.गोंयच्याच्य रांपणकारांचो एकवोट या संघटनेचे सचिव ओलांसियो सिमोइश यांनी गोव्यात हे आंदोलन पूर्णपणे यशस्वी करू, असा दावा केला आहे.ते म्हणाले की, नवी अधिसूचना मच्छिमारांच्या मुळावर आली असून किनारपट्टी धोक्यात आलेली आहे. भरती रेषेपासून 50 मीटर अंतराच्या आत बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने किनाऱ्यावर काँक्रिटची जंगले उभी राहतील आणि पारंपरिक मच्छीमारांना होड्या ठेवण्यास किंवा मासेमारीचे कोणतेही काम करण्यास अडथळे निर्माण होतील. त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट होईल. गोव्यातील कांदोळी, बागा, नेरूल, माजोर्डा, बाणावली, कोलवा, पाळोळे आदी किनारे नष्ट होतील. गोव्याची किनारपट्टी १०५ किलोमीटरची असली तरी आधीच किनाऱ्याची धूप होऊन २० किलोमीटर किनारा नष्ट झालेला आहे, त्यात भर म्हणून या नव्या अधिसूचनेमुळे काँक्रिटची जंगले झाल्यास उर्वरित किनारेही उद्ध्वस्त होतील.सिमोइश म्हणाले की, लोकसंख्या घनतेचा निकष लावला तर गोव्यातील एकही किनारा 50 मीटर अंतरात बांधकामासाठी खुला होऊ शकणार नाही, असा दावा सरकारी अधिकारी करत आहे तो धादांत खोटा आहे. कांदोळीचे उदाहरण देताना ते म्हणाले की, 2011 च्या जनगणनेनुसार कांदोळीची लोकसंख्या घनता प्रतिचौरस किलोमीटर 1900 इतकी आहे. आता 2021 मध्ये नवी जनगणना होणार आहे त्यावेळी ही संख्या दुपटीने वाढलेली असेल. त्यामुळे कांदोळी 50 मीटर अंतरात बांधकामासाठी खुला होऊ शकतो. कारण या अधिसूचनेत प्रति चौरस किलोमीटर 2164 लोकसंख्या घनता असल्यास भरती रेषेपासून 50 मीटर अंतरात किनारे बांधकामास खुले करण्यात आले आहेत. लोकसंख्या घनतेचा निषेध निकषही पुढेमागे कायदादुरुस्ती आणून काढून टाकणार कशावरून, असा सवाल करून ते म्हणाले की सागरमाला अंतर्गत किनाऱ्यावर औद्योगीकरण तसेच बंदराचा विस्तार करणे आणि पारंपरिक मच्छीमारांना उद्ध्वस्त करणे हाच यामागील हेतू आहे. किनाऱ्यांवर स्वैर बांधकामे येतील. किनाऱ्याला रस्ते टेकतील.या अधिसूचनेचा मच्छीमारांवरच परिणाम होणार आहे असे नव्हे तर पर्यटन उद्योगही मोठ्या प्रमाणात धोक्यात येईल. विदेशी पर्यटक येथील किनारे पसंत करतात. हे झाले तर पर्यटकही बंद होतील आणि जसा खाण उद्योग बंद पडला तसा पर्यटन उद्योगही भविष्यात बंद पडेल आणि त्यामुळे लोकांना उदरनिर्वाहाचे साधनही गमवावे लागेल. कांदोळीसारखी स्थिती अन्य किनाऱ्यांवर ही होणार आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.