शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

माजी मंत्री नार्वेकरसह तिघांची ४.१३ कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 23:01 IST

गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) घोटाळा प्रकरणातील तिन्ही प्रमुख आरोपी तत्कालीन पदाधिकारी व माजी मंत्री दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, बाळू ऊर्फ विनोद फडके आणि अकबर मुल्ला यांच्या एकूण ४.१३ कोटी रुपयांच्या मालमत्ता सक्तवसुली विभागाकडून (ईडी) जप्त केल्या आहेत.

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) घोटाळा प्रकरणातील तिन्ही प्रमुख आरोपी तत्कालीन पदाधिकारी व माजी मंत्री दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, बाळू ऊर्फ विनोद फडके आणि अकबर मुल्ला यांच्या एकूण ४.१३ कोटी रुपयांच्या मालमत्ता सक्तवसुली विभागाकडून (ईडी) जप्त केल्या आहेत. मनी लॉंडरिंगच्या अनुषंगाने इडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जीसीए घोटाळा प्रकरणात ईडीतर्फे धडक कारवाई सुरू करण्यात आली असून आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात अल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून जीसीएसाठी अनुदान म्हणून देण्यात आलेली ६.९५ कोटी रुपयांची रक्कम तिघांकडून लाटण्याच्या प्रकरणात मनी लॉंडरिंगची शक्यताही उघडकीस आल्यामुळे इडीतर्फेही गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि तपास सुरू करण्यात आला होता.  या प्रकरणात काही ठोस पुरावे आढळून आल्यामुळे इडीकडून ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली.या प्रकरणात पोलीस खात्याच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर तिघांना अटकही करण्यात आली होती. नंतर काही दिवसांनी त्यांची जामीनवर सुटका झाली होती. या प्रकरणात एक नव्हे तर तीन वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले होते, त्यातील एका प्रकरणात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे, तर बाकीच्या दोन प्रकरणात अरोपपत्र दाखल करणे बाकी आहे. 

असा केला घोटाळा२००६ -०७ साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ६.९७ कोटी रुपये जीसीएला अनुदान जारी केले होते. या अनुदानाची रक्कम जीसीएच्या अधिकृत खात्यात जमा करण्याऐवजी कुंडई - फोंडा यथील शिरोडा अर्बन सहकारी सोसायटीत जीसीएच्या नावे बोगस खाते खोलून त्यात ही रक्कम जमा करण्यात आली. या बाबतीत एवढी गुप्तता ठेवण्यात आली की जीसीएच्या सर्वसाधरण बैठकीतही त्याचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यानंतर विविध बोगस एजन्सीच्या नावावर टप्प्या टप्प्याने धनादेश जारी करून ही रक्कम लाटण्यात आली. चौकशी दरम्यान ही  रक्कम नार्वेकर यांच्यासह तिन्ही पदाधिकाºयांनीच उकळल्याचे आढळून आले असून ज्या एजन्सींच्या नावे धनादेश वठवले गेले त्यांना रक्कम मिळाली नसल्याचे तसेच त्यांचे जीसीएशी कोणतेही व्यवहार नसल्याचे कबुली जवाबही या एजन्सीकडून देण्यात आले आहेत.