शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

फेरीबोट भाडेवाढीची भाजपलाही 'धग'; प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांशी बोलणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 09:40 IST

काँग्रेस आक्रमक; आरजीकडून खुल्या चर्चेचे आव्हान, आपची निदर्शने.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : फेरीबोट भाडेवाढीची 'धग' सत्ताधारी भाजपलाही लागली आहे. पक्षाच्या काही आमदारांनी स्थानिक नेतृत्वाकडे हा विषय उपस्थित केला असून प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. 

दुसरीकडे काँग्रेसने काल जुने गोवे येथे जोरदार निदर्शने करीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी ही दरवाढ खपवून घेतली जाणार नसल्याचे बजावताना नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांना भाडेवाढप्रश्नी खुल्या व्यासपीठावर चर्चेला येण्याचे जाहीर आव्हान दिले आहे. आम आदमी पक्षाच्या कार्यकत्यांनी सासष्टीत राशोल येथे निदर्शने केली.

लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे फेरीबोट भाडेवाढीच्या प्रश्नावर जनतेचा रोष ओढवून घेऊन चालणार नाही, असे सत्ताधारी भाजपमधील काही आमदार, मंत्री, कोअर कमिटीतील पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांचेही म्हणणे आहे. मयेचे भाजप आमदार प्रेमेंद्र शेट व कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाडेवाढीवर फेरविचार करण्याची मागणी केलेली आहे. पक्षातील अन्य काही आमदार तसेच मंत्र्यांनाही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद नकोय.

येत्या १६ पासून फेरीबोटींमध्ये दुचाक्यांना लागू होणार असलेले शुल्क तसेच एकूणच भाडेवाढीच्या प्रश्नावर संतप्त वातावरण निर्माण झालेले आहे. काँग्रेसच्या कालच्या निदर्शनांमध्ये विरोधी पक्षनेते युरी आलेमाव तसेच काँग्रेसचे अन्य दोन आमदार एल्टन डिकॉस्टा व कार्लुस आल्मेदा हेही सहभागी झाले.

दरम्यान, आरजीचे प्रमुख मनोज परब सरकारवर कठोर हल्लाबोल करताना म्हणाले की, हे सरकार दिवसेंदिवस नवे कर लादले जात आहेत. गळती रोखण्यासाठी तिकीट दरवाढीची गरज नव्हती, अन्य मार्गही आहेत. भाडेवाढ व दुचाक्यांना शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. सरकारी कार्यालयांमध्येही असंख्य कर्मचारी तुटपुंज्या पगारावर कंत्राटावर काम करतात. त्यांना वेतनही वेळेवर मिळत नाहीत.

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे सध्या हैदराबादला आहेत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी ९ रोजी गोव्यात परतणार आहे. त्यामुळे आताच या विषयावर बोलने उचित ठरणार नाही. फेरीबोटबाबत घेतलेल्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलेन त्यानंतरच भूमिका स्पष्ट करीन.

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, पर्रीकर मुख्यमंत्री असताना मंत्री सुदिन ढवळीकर व तत्कालीन नदी परिवहनमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी फेरीबोट प्रवाशांना सूट म्हणून दुचाक्यांना तिकीट माफ केले होते. सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे, त्यामुळे ही सवलत बंद करू नये. दुचाक्यांना मोफत फेरीसेवा चालूच ठेवावी, असे माझे प्रामाणिक मत आहे.

आपची टोलेबाजी

आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगश यांनी राशोल येथे निदर्शनावेळी ही भाडेवाढ त्वरित मागे घेतली जावी, अशी मागणी केली. त्यांनी अशीही टीका केली की, जगात हायड्रोजन पॉवरवर फेरीबोटी चालू असताना गोव्यात नदी परिवहन खात्याला साधी सौर ऊर्जेवर चालणारी फेरीबोट परवडत नाही.

'ते' पाच कोटी वापरा : मनोज परब

आरजीचे प्रमुख मनोज परब सरकारवर कठोर हल्लाबोल करताना म्हणाले की, नदी परिवहन खात्याचे वर्षांचे ५० कोटी रुपये बजेट असते. दरवर्षी ५ कोटी विनावापर ठेवले जातात. भाडेवाढीमुळे ३ ते ४ कोटी रुपये अतिरिक्त तिजोरीत येतील असा जो दावा मंत्री फळदेसाई करीत आहेत. त्यावर एकच सांगायचे • आहे ते म्हणजे दरवर्षी ५ कोटी विनावापर ठेवले जातात ते वापरा. फेरीबोट ही अत्यावश्यक सेवा आहे, धंदा नव्हे!

 

टॅग्स :goaगोवा