शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देशभक्तीचे भय, विकासाचा मुद्दा गायब - कुमार केतकर; राजू नायक यांच्या तीन पुस्तकांचे गोव्यात प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 05:08 IST

देशाच्या विकासाचा मुद्दा गायब झाला आणि आता देशभक्तीचे भय पसरवलेले आहे. तुम्ही जर मोदींना मत दिले नाही, तर तुम्ही देशभक्त नाही, असे सध्याचे राजकीय वातावरण आहे.

पणजी : देशाच्या विकासाचा मुद्दा गायब झाला आणि आता देशभक्तीचे भय पसरवलेले आहे. तुम्ही जर मोदींना मत दिले नाही, तर तुम्ही देशभक्त नाही, असे सध्याचे राजकीय वातावरण आहे. अशा वातावरणात तुम्ही मोदी-शहा-डोवाल यांना मत देत आहात, भाजपला नव्हे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांच्या ‘जहाल आणि जळजळीत’, ‘हिरव्या बोलीचे शब्द’ आणि ‘ओस्सय’ या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात केतकर बोलत होेते. येथील मॅकेनिज पॅलेस सभागृहात हा सोहळा झाला. मंचावर राजू नायक, चित्रकार सुभाष अवचट उपस्थित होते.केतकर यांनी सुमारे तासभराच्या भाषणात देशातील राजकीय अवकाशाची मांडणी केली. ती करताना मोदी काळाचा उदय कसा झाला आणि सध्याची राजकीय स्थिती कशी आहे, याची मीमांसा केली.ते म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या निर्मितीपासून त्यांनी भाषणास प्रारंभ केला. यानंतर अण्णा हजारे यांचे आंदोलन ‘एंटरटेन्मेंट शो’ कसा ठरला, ते त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देशभर कशी वातावरणनिर्मिती केली गेली, याची नेमकी माहिती त्यांनी दिली.

गोव्यातील अधिवेशनात लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्यांना न मोजता मोदी यांच्या नावाची घोषणा भावी पंतप्रधान म्हणून करण्यात आली. येथे या राजकीय नाट्याचा पहिला अंक संपला आणि नंतरच्या काळात मोदी पंतप्रधान झाले. भाजपच्या या नेपथ्यरचनेमुळे काँग्रसही गांगरून गेलेली आणि त्यातून ती प्रदीर्घ काळ बाहेर येऊ शकली नव्हती.पत्रकार प्रभाकर ढगे यांनी प्रास्ताविक केले. स्वागत करताना राजू नायक यांनी लेखनामागील भूमिका विषद केली. चित्रकार सुभाष अवचट यांनीही मनोगत व्यक्त केले. मनस्विनी प्रभुणे-नायक यांनी आभार मानले.

टॅग्स :goaगोवा