शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

देशभक्तीचे भय, विकासाचा मुद्दा गायब - कुमार केतकर; राजू नायक यांच्या तीन पुस्तकांचे गोव्यात प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 05:08 IST

देशाच्या विकासाचा मुद्दा गायब झाला आणि आता देशभक्तीचे भय पसरवलेले आहे. तुम्ही जर मोदींना मत दिले नाही, तर तुम्ही देशभक्त नाही, असे सध्याचे राजकीय वातावरण आहे.

पणजी : देशाच्या विकासाचा मुद्दा गायब झाला आणि आता देशभक्तीचे भय पसरवलेले आहे. तुम्ही जर मोदींना मत दिले नाही, तर तुम्ही देशभक्त नाही, असे सध्याचे राजकीय वातावरण आहे. अशा वातावरणात तुम्ही मोदी-शहा-डोवाल यांना मत देत आहात, भाजपला नव्हे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांच्या ‘जहाल आणि जळजळीत’, ‘हिरव्या बोलीचे शब्द’ आणि ‘ओस्सय’ या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात केतकर बोलत होेते. येथील मॅकेनिज पॅलेस सभागृहात हा सोहळा झाला. मंचावर राजू नायक, चित्रकार सुभाष अवचट उपस्थित होते.केतकर यांनी सुमारे तासभराच्या भाषणात देशातील राजकीय अवकाशाची मांडणी केली. ती करताना मोदी काळाचा उदय कसा झाला आणि सध्याची राजकीय स्थिती कशी आहे, याची मीमांसा केली.ते म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या निर्मितीपासून त्यांनी भाषणास प्रारंभ केला. यानंतर अण्णा हजारे यांचे आंदोलन ‘एंटरटेन्मेंट शो’ कसा ठरला, ते त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देशभर कशी वातावरणनिर्मिती केली गेली, याची नेमकी माहिती त्यांनी दिली.

गोव्यातील अधिवेशनात लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्यांना न मोजता मोदी यांच्या नावाची घोषणा भावी पंतप्रधान म्हणून करण्यात आली. येथे या राजकीय नाट्याचा पहिला अंक संपला आणि नंतरच्या काळात मोदी पंतप्रधान झाले. भाजपच्या या नेपथ्यरचनेमुळे काँग्रसही गांगरून गेलेली आणि त्यातून ती प्रदीर्घ काळ बाहेर येऊ शकली नव्हती.पत्रकार प्रभाकर ढगे यांनी प्रास्ताविक केले. स्वागत करताना राजू नायक यांनी लेखनामागील भूमिका विषद केली. चित्रकार सुभाष अवचट यांनीही मनोगत व्यक्त केले. मनस्विनी प्रभुणे-नायक यांनी आभार मानले.

टॅग्स :goaगोवा