शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाच्या भीतीने लोकशाहीचा खून; पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर केतन भाटीकरांची भाजपावर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 07:12 IST

सरकारची नामुष्की उघड.

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे फोंडा विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निवाडा देण्यात आला. कार्यकर्त्यांनी १५ दिवस प्रचार केला, कष्ट घेतले. त्यांनी जो वेळ, आर्थिक खर्च केला, तो कोण परत देणार, असे प्रश्न काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांनी केलेत. जो निवाडा आला आहे, त्यावरून केंद्र व राज्य सरकारची नामुष्की उघड झाली. हा त्यांचा नैतिक पराभव आहे. विविध सर्वेमधून भाजपला आपला पराभव स्पष्ट दिसू लागला होता. त्यांचा पराभव अटळ असल्याचे लक्षात येताच लोकशाहीचा खून करण्यात आला, अशी टीका भाटीकर यांनी केली.

न्यायालयाच्या निकालानंतर भाटीकर यांनी सांगितले, पोटनिवडणूक रद्द होणे म्हणजे लोकशाहीचा खून केल्यासारखे आहे. निवडणूक रद्द व्हावी म्हणून जी याचिका दाखल करण्यात आली होती. ती भाजपच्याच प्रितम हरमलकर यांनी केली होती. विश्वनाथ दळवी यांचे ते खास मित्र असल्याचे त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून समजून येते. जर कायद्यात या संदर्भाची तरतूद करण्यात आली आहे तर निवडणूक आयोगाने वेळीच पावले का उचलली नाहीत. तरतूद करण्यात आलेली मुदत संपण्याची प्रतीक्षा ते का करत राहिले.

'भाजपने ती आश्वासने पूर्ण करावीत'

या निवडणुकीत भाजपने ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्या त्यांना आता पूर्ण कराव्याच लागतील. हॉस्पिटलला जिल्हा इस्पितळाचा दर्जा न दिल्यास फोंडा बंद आंदोलन करण्यात येईल. स्मार्ट सिटीचे जे स्वप्न दाखवले आहे, त्याचा प्लान मुख्यमंत्र्यांना दाखवावा लागेल. फोंड्यात साडेआठशे युवकांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. आता त्यांनी आपले वचन पूर्ण करावे, असे भाटीकर यांनी सांगितले.

ते अधिवेशन पुन्हा बोलावणार का ? : मनोज परब

फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. मनोज यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'सरकारने पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दिवस कमी करून ते गुंडाळले. आता अधिवेशन पुन्हा पूर्ण क्षमतेने बोलावणार का ? असा प्रश्न त्यांनी केला. केवळ अधिवेशन टाळण्यासाठीच सरकारने या पोटनिवडणुकीचा सोयीस्कर वापर केल्याची टीका त्यांनी केली. गोव्यातील स्थलांतरित मतदारांच्या मुद्द्यावर आयोगाने जशी निष्क्रियता दाखवली, तसेच अपयश या पोटनिवडणुकीच्या बाबतीतही आयोगाला आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमच्या कार्यकर्त्यांची धास्ती

भाटीकर म्हणाले, की प्रचारादरम्यान आमच्या कार्यकर्त्यांची धास्ती घेतल्यामुळेच संपूर्ण मंत्रिमंडळ व भाजपचे सर्व नेते फोंड्यात प्रचाराला आले. आमच्या कार्यकर्त्यांना फोडण्यासाठी अनेक कूटनीती वापरण्यात आल्या. नगरपालिका व पंचायतीकडून त्यांना नोटिसासुद्धा पाठविण्यात आल्या. मात्र, माझे स्वाभिमानी कार्यकर्ते डगमगले नाहीत. कार्यकर्ते माझ्या पाठीशी ठाम राहिले. भाजपच्या प्रचार सभेत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केलेल्या आरोपांवर भाटीकर म्हणाले की, मी श्रीपादभाऊंचा आदर करतो, मात्र ते चुकीचे बोलले. माझ्यावर केलेले आरोप खरे असल्याचे श्रीपादभाऊंनी श्री देव झरेश्वराच्या मंदिरात येऊन सांगावे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Criticized After Fonda Bypoll Cancellation: Democracy Murdered by Fear

Web Summary : Congress candidate Ketan Bhatikar slams BJP after Fonda bypoll cancellation, alleging fear of defeat led to democracy's murder. He demands BJP fulfill promises made during campaigning, including hospital upgrades and job creation.
टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूक 2026congressकाँग्रेस