शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

गोव्यात भाजपाच्या खासदारांचे उपोषण, कार्यकर्तेही सहभागी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 19:48 IST

संसेदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ माजवून काँग्रेसी खासदारांनी कामकाज बंद पाडल्याच्या निषेधार्थ गोव्यातही पक्षाच्या तिन्ही खासदारांनी दिवसभर उपोषण केले. 

पणजी : संसेदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ माजवून काँग्रेसी खासदारांनी कामकाज बंद पाडल्याच्या निषेधार्थ गोव्यातही पक्षाच्या तिन्ही खासदारांनी दिवसभर उपोषण केले. आझाद मैदानावर झालेल्या या उपोषणाच्या कार्यक्रमात खासदारांबरोबर शंभरेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. पालिकामंत्री फ्र ान्सिस डिसोझा, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही उपस्थिती लावून पाठिंबा दर्शविला. 

काँग्रेसचे अलोकशाही वर्तन : श्रीपाद याप्रसंगी बोलताना केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी काँग्रेसी खासदारांनी अलोकशाही वर्तन चालवले असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘देश स्वतंत्र होऊन ७0 वर्षे उलटली. देशात आजवर सर्वात जास्त सत्ता काँग्रेसचीच होती तर मग या देशाचा विकास का झाला नाही, असा सवाल त्यांनी केला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २३ दिवस गोंधळ घालून काँग्रेसी खासदारांनी कामकाज बंद पाडले. सभापतींनी सजम देऊनही त्यांचे काही ऐकले नाही. एकेका राज्यात सत्तेपासून दूर होतोय याचे शल्य काँग्रेसला असून त्याच वैफल्यग्रस्ततेतून या गोष्टी घडत आहेत.’

गोव्यात काँग्रेसने सत्तेची स्वप्ने पाहू नयेत : तेंडुलकर भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलक र यांनी ‘गोव्यात काँग्रेसने सत्तेची स्वप्ने पाहू नयेत, असे नमूद केले. २0१७ च्या निवडणुकीत संधीचे सोने करण्यास काँग्रेसला अपयश आले. उलट नंतर त्यांचा एक आमदारही कमी झाला, असे ते म्हणाले. देशभरात काँग्रेसची पीछेहाट चालली आहे त्यामुळे पक्षाचे आमदार, खासदार वैफल्यग्रस्त बनले आहेत, अशी टीका त्यांनी केली. पर्रीकरांच्या अनुपस्थितीत प्रशासन ढेपाळल्याची जो आरोप होत आहे तो तेंडुलकर यांनी फेटाळून लावला. सरकार चांगल्या पध्दतीने चालले आहे. तीन मंत्र्यांची मंत्रिमंडळ सल्लागार समिती प्रशासन चालवत आहे, असे ते म्हणाले. 

दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी काँग्रेस समाजात फूट घालत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘तब्बल २२ राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे ते काँग्रेसला बघवत नाही. संसदेत दीड तास काँग्रेसी खासदारांनी गोंधळ घातला परंतु विकास आणि जन कल्याणाचा ध्यास घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न डगमगता आपले भाषण चालूच ठेवले. केंद्र सरकारने लोकांना अनेक योजना दिल्या. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी ५६ हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली. काँग्रेस या सर्व चांगल्या गोष्टींना अपशकून करण्याचा प्रयत्न केला आहे.’

काही आमदारांची अनुपस्थितीकाही आमदारांची अनुस्थिती दिसून आली. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक, आमदार निलेश काब्राल, आमदार एलिना साल्ढाना, माजी आमदार किरण कांदोळकर, उत्तर जिल्हा पंचायत अध्यक्ष अंकिता नावेलकर, आमदार ग्लेन तिकलो, दामू नाईक, सदानंद तानावडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात घोषणाही दिल्या.   

दरम्यान, सायंकाळी ५ वाजता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अविनाश धाकणकर यांच्या हस्ते तिन्ही खासदारांना लिंबू सरबत देऊन हे उपोषण समाप्त करण्यात आले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा