शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लहानपणापासूनच गोव्याविषयी आकर्षण: मनोज जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2024 13:08 IST

राजधानीत सुरू असलेल्या ५५ व्या 'इफ्फी'ला त्यांनी गुरुवारी हजेरी लावली.

नारायण गावस, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लहानपणापासून गोव्यात येत असल्यानेच गोव्याविषयी आकर्षण वाढले आहे. त्यातच गोव्याचा जावई असल्याने येणे-जाणे वाढले. आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा माझ्या करियरचा भाग असल्याने प्रत्येक 'इफ्फी'ला हजेरी लावत असतो. यामुळे आनंद द्विगुणित असा आनंद मिळत असतो, असे मत प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांनी व्यक्त केले.

राजधानीत सुरू असलेल्या ५५ व्या 'इफ्फी'ला त्यांनी गुरुवारी हजेरी लावली. मनोज जोशी हे ज्युरी पॅनलचेही सदस्य आहेत. जोशी म्हणाले, गोव्यात २००४ पासून इफ्फी होत आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षे येथे इफ्फीला येण्याची संधी मिळाली. तसे गोवा हे सर्वांचे आवडते ठिकाण आहे. असे महोत्सव त्यात आणखी भर घालतात. इफ्फी सुरू होण्याअगोदर अनेकवेळा गोव्यात आलो आहे, तसेच गोव्याचा जावई असल्याने गोव्याविषयी आकर्षण आणखी वाढले.

'इफ्फी'त जगभरातील अनेक चित्रपट दाखविले जातात. यात त्यामुळे चांगले दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी मिळत असते. ज्युरी गटाचा भाग असल्याने इफ्फीनिमित्त चांगले चित्रपट पाहण्याची, निवडण्याची संधी मिळाली. चांगल्या दर्जाच्या कथानकाला व्यासपीठ देणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही आता नवनवीन युवा चित्रपट निर्मात्यांना संधी देत असतो, अनेक युवकांनी या क्षेत्रात येऊन चांगले कथानक देणारे चित्रपट तयार करावेत, असे सांगून जोशी म्हणाले, भारत हा असा देश आहे जिथे शेकडो वर्षांपासून चित्रपटांचा इतिहास आहे.

भारताने जगाला चांगले व दर्जेदार असे चित्रपट दिले आहेत. कारण भारतात अनेक आकर्षक असे कथानक तयार होत असते. त्यामुळे चित्रपट चांगला यश मिळते. भारतातील अनेक चित्रपट निर्मात्यांनी दर्जेदार चित्रपट तयार करुन जागतिक स्तरावर झळकले आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपट संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

 

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फी