शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मी एसटींचा आक्रोश व्यक्त करतोय...; मंत्री गोविंद गावडे यांनी मांडली भूमिका

By समीर नाईक | Updated: May 27, 2024 08:20 IST

लोकहिताच्या कामांना उशीर

समीर नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'अनुसूचित जाती, जमातीबाबत सरकार गंभीर नाही, हे हळूहळू स्पष्ट व्हायला लागले आहे. मी जे काही प्रेरणा दिन कार्यक्रमात बोललो, ती माझी नाराजी नाही; तर आमच्या समाजातील लोकांची नाराजी व्यक्त केली,' असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

एससी, एसटी समाजांतील लोकहिताच्या कुठल्याच गोष्टी वेळेत होत नाहीत. ज्या 'उटा' आंदोलनामुळे भाजपचे सरकार बनले, त्या लोकांच्या भावनांशी खेळू नका, एवढेच मला म्हणायचे होते, असे ते म्हणाले. 

गावडे म्हणाले, 'एससी, एसटींच्या विविध विषयांवरून मुख्यमंत्र्यांकडे दोन ते तीन वर्षे पाठपुरावा सुरू आहे. मी पूर्वीदेखील खासगीत मुख्यमंत्र्यांना भेटून नाराजी व्यक्त केली; पण काहीच झालेले नाही. मुख्यमंत्र्यांचाही यात दोष नाही. त्यांच्याकडे अनेक खाती आहेत, त्यामुळे ते जास्त लक्ष देऊ शकत नाहीत; पण त्यांनी निर्देश दिल्यानंतर खात्याकडून त्वरित गोष्टी झाल्या पाहिजेत. पण तसे होत नाही. माझ्याकडे खाते असताना एससी, एसटींना २० दिवसांत योजनांचा लाभ मिळायचा; पण आता यासाठी महिने लागत आहेत.'

मीदेखील सरकारचा भाग आहे; पण ज्या गोष्टीची लोकांना गरज आहे, ती गोष्ट काम आहे. मिळवून देणेही माझेच सरकारच मागण्या पूर्ण करत नसेल तर लोक पुन्हा आंदोलन उभारण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, हे अडथळे आणणाऱ्याऱ्यांनी लक्षात ठेवावे,'

मंत्रिमंडळ फेरबदल अफवाच

मंत्रिमंडळ फेरबदल केवळ अफवाच आहे. यात कुणाचे राजकारण आहे आणि कोणाला याचा फायदा आहे, हे मला माहीत नाही, असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले. याबाबत त्यांनी सांगितले, 'प्रदेशाध्यक्षांनी याबाबत स्पष्टीकरण देत ही केवळ अफवा असल्याचे जाहीर केले आहे. भविष्यात काहीही होवो; पण मी नेहमीच लोकांसोबत असणार आहे, हे मात्र निश्चित.' 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण