शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी CBI ची कारवाई!
2
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
3
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
4
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
5
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
6
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
7
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
8
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
9
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
10
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
11
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
12
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
13
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
14
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
15
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
16
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
17
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
18
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
19
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
20
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र

'म्हादई'च्या अहवालाचे स्पष्टीकरण द्या: आरजी; एनआयओच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 07:26 IST

'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब, आमदार वीरेश बोरकर यांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ) तीन वैज्ञानिकांनी म्हादई वळविली तरी त्याचा गोव्यावर परिणाम होणार नाही, असा अहवाल सादर केला आहे. त्याचा राज्यभर विविध संघटनांकडून निषेध केला जात आहे. गुरुवारी (दि. १५) सकाळी रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षातर्फे 'टुगेदर म्हादई मूव्हमेंट' तर्फे एनआयओ कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. संस्थेला हा अहवाल कोणी करायला सांगितला याविषयी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. 'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब, आमदार वीरेश बोरकर यांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोज परब म्हणाले, 'म्हादई नदी वाचविण्यासाठी गेली अनेक वर्षे लढा सुरू आहे. मात्र, एनआयओचे संशोधक डॉ. अनिल कुमार, डी. शंकर, के. सुप्रित यांनी कार्यालयात बसून याबाबतचा अहवाल तयार केला आहे. त्यांना एक तर केंद्र सरकार किंवा कर्नाटक सरकारचा दबाव आल्याने अशा प्रकारचा अहवाल तयार केला असावा. अहवाल करताना स्थानिक सरकार, प्रशासन, म्हादईविषयी लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना का विश्वासात घेतले नाही? तसे न झाल्यानेच हा अहवाल चुकीचा ठरतो.

स्थानिक संशोधक, कार्यकर्त्यांचा लढा वाया

परब म्हणाले, गेली अनेक वर्षे याविषयी सर्वोच्च न्यायालयामार्फत हा लढा सुरू आहे. राजेंद्र केरकर, निर्मला सावंत डॉ. नंदकुमार कामत, अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हा लढा सुरू केला आहे. आम्ही आरजी पक्षातर्फे टुगेदर म्हादई मूव्हमेंट सुरू केली. सत्तरीत पदयात्रा सुरू केली. पण, सरकारने आमच्याविरोधात खोट्या तक्रारी करून पदयात्रा बंद पाडली. भाजप सरकारला म्हादई कर्नाटकला द्यायची आहे. म्हणून ते आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेत आहेत.

गावागावात जाऊन जागृती करू : आमदार बोरकर

आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, म्हादईसाठी आता आरजी पक्षाच्या वतीने गावागावात जाऊन जागृती करू. सरकारने म्हादई लढ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण अजून त्यांना यश आलेले नाही. आता एनआयओच्या वैज्ञानिकांनी कार्यालयात बसून हा चुकीचा अहवाल सादर केला. तो राज्याच्या विरोधात आहे. याविषयी लोकांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. वैज्ञानिकांनी त्यांची चूक दाखवून दिली पाहिजे. आरजी पक्ष याविषयी शांत बसणार नाही. टुगेदर फॉर म्हादई मूव्हमेंट पुन्हा सुरू करून याविषयी जागृती करू.

अहवाल कर्नाटकधार्जिणा

मनोज परब म्हणाले की, हा अहवाल फक्त कर्नाटकाच्या बाजूने दिला आहे. याविषयी आम्हाला योग्य स्पष्टीकरण पाहिजे. त्यांनी याविषयी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे. हे तिन्ही वैज्ञानिक राज्याबाहेरील आहेत. गोव्यात राहून, म्हादईचे पाणी पिऊन त्यांनी म्हादई विरोधातच गद्दारी केली अशी आमची भावना आहे. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण