शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

'म्हादई'च्या अहवालाचे स्पष्टीकरण द्या: आरजी; एनआयओच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 07:26 IST

'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब, आमदार वीरेश बोरकर यांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ) तीन वैज्ञानिकांनी म्हादई वळविली तरी त्याचा गोव्यावर परिणाम होणार नाही, असा अहवाल सादर केला आहे. त्याचा राज्यभर विविध संघटनांकडून निषेध केला जात आहे. गुरुवारी (दि. १५) सकाळी रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षातर्फे 'टुगेदर म्हादई मूव्हमेंट' तर्फे एनआयओ कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. संस्थेला हा अहवाल कोणी करायला सांगितला याविषयी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. 'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब, आमदार वीरेश बोरकर यांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोज परब म्हणाले, 'म्हादई नदी वाचविण्यासाठी गेली अनेक वर्षे लढा सुरू आहे. मात्र, एनआयओचे संशोधक डॉ. अनिल कुमार, डी. शंकर, के. सुप्रित यांनी कार्यालयात बसून याबाबतचा अहवाल तयार केला आहे. त्यांना एक तर केंद्र सरकार किंवा कर्नाटक सरकारचा दबाव आल्याने अशा प्रकारचा अहवाल तयार केला असावा. अहवाल करताना स्थानिक सरकार, प्रशासन, म्हादईविषयी लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना का विश्वासात घेतले नाही? तसे न झाल्यानेच हा अहवाल चुकीचा ठरतो.

स्थानिक संशोधक, कार्यकर्त्यांचा लढा वाया

परब म्हणाले, गेली अनेक वर्षे याविषयी सर्वोच्च न्यायालयामार्फत हा लढा सुरू आहे. राजेंद्र केरकर, निर्मला सावंत डॉ. नंदकुमार कामत, अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हा लढा सुरू केला आहे. आम्ही आरजी पक्षातर्फे टुगेदर म्हादई मूव्हमेंट सुरू केली. सत्तरीत पदयात्रा सुरू केली. पण, सरकारने आमच्याविरोधात खोट्या तक्रारी करून पदयात्रा बंद पाडली. भाजप सरकारला म्हादई कर्नाटकला द्यायची आहे. म्हणून ते आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेत आहेत.

गावागावात जाऊन जागृती करू : आमदार बोरकर

आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, म्हादईसाठी आता आरजी पक्षाच्या वतीने गावागावात जाऊन जागृती करू. सरकारने म्हादई लढ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण अजून त्यांना यश आलेले नाही. आता एनआयओच्या वैज्ञानिकांनी कार्यालयात बसून हा चुकीचा अहवाल सादर केला. तो राज्याच्या विरोधात आहे. याविषयी लोकांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. वैज्ञानिकांनी त्यांची चूक दाखवून दिली पाहिजे. आरजी पक्ष याविषयी शांत बसणार नाही. टुगेदर फॉर म्हादई मूव्हमेंट पुन्हा सुरू करून याविषयी जागृती करू.

अहवाल कर्नाटकधार्जिणा

मनोज परब म्हणाले की, हा अहवाल फक्त कर्नाटकाच्या बाजूने दिला आहे. याविषयी आम्हाला योग्य स्पष्टीकरण पाहिजे. त्यांनी याविषयी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे. हे तिन्ही वैज्ञानिक राज्याबाहेरील आहेत. गोव्यात राहून, म्हादईचे पाणी पिऊन त्यांनी म्हादई विरोधातच गद्दारी केली अशी आमची भावना आहे. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण