शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

‘एसटीं’चा अपेक्षाभंग!

By admin | Updated: November 28, 2014 00:22 IST

पणजी : वन कायद्याखाली जमिनीचा मालकी हक्क मिळावा म्हणून गेल्या पाच वर्षांत शासकीय दरबारी एकूण १० हजार ४० अर्ज आले.

पणजी : वन कायद्याखाली जमिनीचा मालकी हक्क मिळावा म्हणून गेल्या पाच वर्षांत शासकीय दरबारी एकूण १० हजार ४० अर्ज आले. त्यापैकी आतापर्यंत फक्त दोनच अर्ज मंजूर झाले आहेत. दुसऱ्या बाजूने ट्रायबल सब प्लानसाठी २०१४-१५ साली एकूण ३२२ कोटी रुपये सरकारने उपलब्ध केले; पण त्यातील केवळ ३४ कोटी रुपये (८९.४४ टक्के) एवढेच पैसे एसटींपर्यंत पोहोचविण्यात सरकारी खात्यांना यश आले. यावरून सरकार अनुसूचित जमातींच्या (एसटी) हिताबाबत गंभीर आहे काय, असा प्रश्न अनुसूचित जमातीतील कार्यकर्त्यांना पडला आहे. सरकार कूळ कायद्यातील तरतुदींचा लाभ आपण अनुसूचित जमातीतील लोकांना देणार असल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात गेल्या २००६ साली लागू झालेल्या वनवासी हक्क कायद्याचा लाभही जमातीतील लोकांना मिळालेला नाही. वन कायद्याखाली सनद म्हणजे मालकी कागदपत्र मिळावे म्हणून एकूण १० हजार ४० अर्ज आले. त्यापैकी आतापर्यंत केवळ दोनच अर्ज मंजूर झाले आहेत. ही आकडेवारी माहिती हक्क कायद्याखाली अनुसूचित जमाती संचालनालयाकडून उपलब्ध झाली आहे. अनुसूचित जमातीतील बहुतांश लोक हे वन क्षेत्रांच्या भागात राहतात. त्यांच्या हितासाठी २००६ साली वनवासी हक्क कायदा लागू केला गेला. या लोकांची उपजीविका चालावी म्हणून त्यांना जमिनीची सनद मिळावी, अशी तरतूद केली गेली; पण शासकीय यंत्रणा या कायद्याचा लोकांना लाभच देऊ शकलेली नाही. ट्रायबल सब-प्लॅनखाली दरवर्षी सरकार तीनशे कोटींपेक्षा जास्त निधी अनुसूचित जमातींकरीता देते. त्यांच्यासाठी अनेक योजना सरकारकडे आहेत. सर्व खात्यांनी एसटींसाठी हा निधी वापरणे अपेक्षित असते. काँग्रेसचे सरकार अधिकारावर असलेल्या काळातही या निधीचा वापर होत नव्हता व आताही होत नाही. या वर्षी तर ३२२ कोटी ९२ लाख रुपये सरकारने उपलब्ध केले होते. एकूण पंचवीस सरकारी खात्यांनी त्यापैकी केवळ ३४ कोटी ४७ लाख रुपये खर्च केले आहेत व २८८.४५ कोटी रुपये विनावापर ठेवले आहेत. ही माहिती देखील माहिती हक्क कायद्याखाली प्राप्त झाली आहे. एसटी समाजातील लोकांनी घरे बांधण्यासाठी व दुरुस्तीसाठी अटल आसरा योजनेखाली एकूण १६१३ अर्ज केले, त्यापैकी केवळ २९७ अर्ज मंजूर झाले आहेत. सरकारी पैसा उपलब्ध असूनही तो एसटींपर्यंत पोहोचतच नाही, ही गोष्ट सरकारी आकडेवारीच दाखवून देते. (खास प्रतिनिधी)