शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘एसटीं’चा अपेक्षाभंग!

By admin | Updated: November 28, 2014 00:22 IST

पणजी : वन कायद्याखाली जमिनीचा मालकी हक्क मिळावा म्हणून गेल्या पाच वर्षांत शासकीय दरबारी एकूण १० हजार ४० अर्ज आले.

पणजी : वन कायद्याखाली जमिनीचा मालकी हक्क मिळावा म्हणून गेल्या पाच वर्षांत शासकीय दरबारी एकूण १० हजार ४० अर्ज आले. त्यापैकी आतापर्यंत फक्त दोनच अर्ज मंजूर झाले आहेत. दुसऱ्या बाजूने ट्रायबल सब प्लानसाठी २०१४-१५ साली एकूण ३२२ कोटी रुपये सरकारने उपलब्ध केले; पण त्यातील केवळ ३४ कोटी रुपये (८९.४४ टक्के) एवढेच पैसे एसटींपर्यंत पोहोचविण्यात सरकारी खात्यांना यश आले. यावरून सरकार अनुसूचित जमातींच्या (एसटी) हिताबाबत गंभीर आहे काय, असा प्रश्न अनुसूचित जमातीतील कार्यकर्त्यांना पडला आहे. सरकार कूळ कायद्यातील तरतुदींचा लाभ आपण अनुसूचित जमातीतील लोकांना देणार असल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात गेल्या २००६ साली लागू झालेल्या वनवासी हक्क कायद्याचा लाभही जमातीतील लोकांना मिळालेला नाही. वन कायद्याखाली सनद म्हणजे मालकी कागदपत्र मिळावे म्हणून एकूण १० हजार ४० अर्ज आले. त्यापैकी आतापर्यंत केवळ दोनच अर्ज मंजूर झाले आहेत. ही आकडेवारी माहिती हक्क कायद्याखाली अनुसूचित जमाती संचालनालयाकडून उपलब्ध झाली आहे. अनुसूचित जमातीतील बहुतांश लोक हे वन क्षेत्रांच्या भागात राहतात. त्यांच्या हितासाठी २००६ साली वनवासी हक्क कायदा लागू केला गेला. या लोकांची उपजीविका चालावी म्हणून त्यांना जमिनीची सनद मिळावी, अशी तरतूद केली गेली; पण शासकीय यंत्रणा या कायद्याचा लोकांना लाभच देऊ शकलेली नाही. ट्रायबल सब-प्लॅनखाली दरवर्षी सरकार तीनशे कोटींपेक्षा जास्त निधी अनुसूचित जमातींकरीता देते. त्यांच्यासाठी अनेक योजना सरकारकडे आहेत. सर्व खात्यांनी एसटींसाठी हा निधी वापरणे अपेक्षित असते. काँग्रेसचे सरकार अधिकारावर असलेल्या काळातही या निधीचा वापर होत नव्हता व आताही होत नाही. या वर्षी तर ३२२ कोटी ९२ लाख रुपये सरकारने उपलब्ध केले होते. एकूण पंचवीस सरकारी खात्यांनी त्यापैकी केवळ ३४ कोटी ४७ लाख रुपये खर्च केले आहेत व २८८.४५ कोटी रुपये विनावापर ठेवले आहेत. ही माहिती देखील माहिती हक्क कायद्याखाली प्राप्त झाली आहे. एसटी समाजातील लोकांनी घरे बांधण्यासाठी व दुरुस्तीसाठी अटल आसरा योजनेखाली एकूण १६१३ अर्ज केले, त्यापैकी केवळ २९७ अर्ज मंजूर झाले आहेत. सरकारी पैसा उपलब्ध असूनही तो एसटींपर्यंत पोहोचतच नाही, ही गोष्ट सरकारी आकडेवारीच दाखवून देते. (खास प्रतिनिधी)